Tag Archives: varsha gaikwad

वर्षा गायकवाड यांची मागणी, अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध करा मुंबईच्या मतदार याद्यांतील त्रुटी दूर करण्याची केली मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. परंतु मतदारयाद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. या मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची संख्या तब्बल ११ लाख असून दुबार नावे असलेल्या मतदारांना शपथपत्र द्यावे लागणार आहे. हा मतदारांना नाहक त्रास असून यामुळे मतदानासाठी मोठ्या रांगा लागतील हे सर्व टाळून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी मतदार याद्यातील …

Read More »

वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत उपस्थित केला मुंबईतील हवा प्रदुषणाचा प्रश्न मुंबईतील हवा प्रदुषण अत्यंत घातक, श्वसनाचे आजार वाढले, तातडीने उपाययोजना करा..

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व जागतिक कीर्तीचे शहर आहे. आज मुंबईत हवा प्रदुषणाने उच्चांक गाठला असून श्वसनाच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत AQI १५० ते २०० पर्यंत आहे तर काही भागात तो ३०० आहे. विषारी वायुच वाढलेलं हे प्रमाण मुंबईकरांसाठी मोठे संकट बनले आहे. मुंबईकरांना स्वच्छ हवा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपा सरकारच्या काळातच दलित, वंचित व महिलांवर अत्याचार वाढले मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही वेळेवर मिळत नाही

केंद्रात व राज्यात मनुवादी विचाराचे सरकार आल्यापासून दलित, मागास समाजावरील अत्याचारांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. महिला व मुलींवरील अत्याचार वाढले आहेत.ऑनर किलिंगच्या घटनाही वाढल्या आहेत. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही वेळेवर मिळत नाही. सामाजिक न्याय विभागाचा निधी दुसऱ्या योजनांसाठी वळवला जातो. सरकारकडे तक्रार करूनही त्यात सुधारणा होत नाही. भाजपा सरकार जाणीव …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा पीएपीPAP घोटाळा मालाड पूर्वला ८.७१ लाख चौरस फुटाचा ५ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा

भाजपा महायुती सरकारने मुंबईत एक नवीन बिझनेस मॉडेल उदयास आणले असून यातून ‘लाडक्या बिल्डरांचा फायदा करुन दिला जात आहे. मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा PAP घोटाळा करण्यात आला आहे. मालाड पूर्वच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या डोंगराळ भागात ८.७१ लाख चौरस फुटाच्या भूखंडाचा महाघोटाळा केला असून हा मालाड पीएपी PAP घोटाळा तब्बल …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, फडणवीसांच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ रोहित आर्या प्रकरणात माजी मंत्री व काही अधिकाऱ्यांची नावे, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे दलित, वंचित, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला न्याय देत नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. सर्वात जास्त दलित अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना नागपूर आणि विदर्भात घडल्या असून भाजपा महायुती सरकार हे दलित विरोधी आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नाही तर हत्याच, उच्चस्तरीय चौकशी करा डॉ. संपदा मुंडे प्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लिन चिट देण्याची मुख्यमंत्र्यांना घाई का, ते कोणाला व का वाचवत आहेत

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी राजकीय दबाव, ब्लॅकमेलिंग व त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. भाजपाचा माजी खासदार, प्रशासन व पोलीस यांच्या त्रासाला कंटाळून तीला आयुष्य संपवावे लागले. पण ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. या प्रकरणाची सीबीआय, एसआयटी अथवा स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, जातीय आणि धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा भाजपा डाव भाजपा सरकार फक्त लाडके उद्योगपती व कंत्राटदारांचे

निवडणुका आल्या की भारतीय जनता पक्ष जातीय आणि धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवत असते. लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजपा समाजात विष कालवण्याचे काम करत आहे. दिवाळीच्या आनंदाच्या सणातही भाजपा द्वेषाचे विष कालवत आहे. भाजपाच्या कटेंगे, बटेंगे, एक है तो सेफ है, अशा विषारी प्रचाराला बळू पडू नका, …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईतीलपालिकेची रुग्णालये व्हेंटिलेटरवर, ७ हजार कोटींचा आरोग्य निधी जातो कुठे ? विलेपार्लेच्या आर. एन. कूपर रुग्णालयाला भेट , रुग्णांसाठी मुलभूत सुविधा, औषधे व कर्मचा-यांचा तुटवडा

भाजपा महायुती सरकार व मुंबई महानगरपालिकेचा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणे हे सरकार आणि महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी असताना, मुंबईत अनेक महापालिका रुग्णालये सुविधांअभावी अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहेत. गरीब कुटुंबांतील रुग्णांचे हाल होत आहेत. महानगरपालिकेचा तब्बल ७ हजार कोटींचा आरोग्य विभागाचा निधी नक्की जातो कुठे? असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रयत्न सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या निषेधार्ह मुंबई काँग्रेसची निषेध रॅली

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच एका वकीलाने हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न हा एखाद्या व्यक्तीवरचा किंवा पदावरचा हल्ला नाही, तर तो संविधानावरचा हल्ला आहे. देशात सरन्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा संतप्त प्रश्न करून सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा उघड प्रकार आहे. या हल्लेखोरावर रासुका कायद्याखाली करवाई करा जेणेकरून …

Read More »

वर्षा गायकवाड यांचे जुहू गल्लीतील भूखंड घोटाळ्यावरील चर्चेचे शेलारांना आव्हान आशिष शेलारांनी वेळ व ठिकाण सांगावे, सरकारचे पाप लपविण्यासाठी बिनबुडाचे आरोप करू नका

जुहू गल्ली येथील बीएमसीच्या मालकीचा शेकडो कोटींचा आरक्षित भूखंड देवाभाऊ सरकारने, शासन आणि बीएमसी अधिकाऱ्यांना हाताशी धरून, आपल्या लाडक्या बिल्डर मित्राला भेट चढवल्याचा महाघोटाळा मुंबई काँग्रेसने उघडकीस आणल्या नंतर भाजपचे धाबे दणाणले आहेत. भाजपा नेते आशिष शेलार आणि अमित साटम यांनी मूळ मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठी बिनबुडाचे व अर्थहीन आरोप केले …

Read More »