जुहू गल्ली येथील बीएमसीच्या मालकीचा शेकडो कोटींचा आरक्षित भूखंड देवाभाऊ सरकारने, शासन आणि बीएमसी अधिकाऱ्यांना हाताशी धरून, आपल्या लाडक्या बिल्डर मित्राला भेट चढवल्याचा महाघोटाळा मुंबई काँग्रेसने उघडकीस आणल्या नंतर भाजपचे धाबे दणाणले आहेत. भाजपा नेते आशिष शेलार आणि अमित साटम यांनी मूळ मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठी बिनबुडाचे व अर्थहीन आरोप केले …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांच्या बिल्डर मित्रावर सरकार मेहरबान जुहूचा ८०० कोटींचा महापालिकेचा भूखंड बिल्डरच्या घशात
देवभाऊचे सरकार आपल्या लाडक्या बिल्डर मित्रासाठी सर्व नियम व कायदे बाजूला ठेवून सरकारी भूखंड बहाल करत सुटले आहे. जुहूतील एक मोठा भूखंड या सरकारने आपल्या मर्जीतल्या बिल्डर मित्राला बेकायदेशीरपणे दिला आहे. हा भूखंड विशेष माणसाला देण्यासाठी बीएमसीने बुलेट ट्रेनच्या वेगाने मंजुरी देत अवघ्या ४ दिवसात निर्णय घेतला. विशेष म्हणजे एसआरए …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, बीएमसीच्या कामात आधी कंत्राटदार ठरतो नंतर टेंडर निघते गुंदवली टनेल शाफ्ट ते मोडकसागर वाय जंक्शन डोम पर्यंतच्या पाईपलाईनच्या कामात मोठा भ्रष्टाचार, २५०० कोटींचे काम ३५०० कोटींना.- सचिन सावंत
मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून मुंबईकरांचा पैसा लुटला जात आहे. सत्ताधारी पक्षातील नेते, पालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला जात आहे. नगरविकास खात्यातून टेंडर निघत असून हे काम कोणाला द्यायचे ते आधीच ठरलेले असते. मर्जीतील कंत्राटदारांनाच टेंडर मिळावे यासाठी काम केले जात असून मुंबईकरांचे …
Read More »उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांची ग्वाही, राज्यघटनेचे संरक्षण करणार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंब्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या खासदारांना पत्र पाठवणार
उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती हे पद सअत्यंत महत्वाचे असून विविध भाषा, जात, धर्म व पंथाचे प्रतिबिंब राज्यसभेत दिसले पाहिजे. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर राज्यघटनेचे संरक्षण करेन, असा विश्वास उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांनी व्यक्त केला. उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे …
Read More »काँग्रेसच्या आंदोलनावेळी भेट नाकारणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांचा अखेर १ कोटी रूपयांचा निधी रोहिंग्या बांग्लादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?
मागील आठवड्यात मालवणी येथील मुंबई महानगरपालिकेची शाळा खाजगी व्यक्तीच्या खिशात घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी करत आंदोलन केले. तसेच पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना भेटून याप्रश्नी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काँग्रेसच्या आंदोलकांना भेट …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, बीएमसीच्या शाळा खाजगी लोकांच्या घशात घालण्याचा घाट मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेस आक्रमक, मंत्री लोढा व सरकारला बांगड्यांचा आहेर
शिक्षण व आरोग्य हे जनतेचे मुलभूत अधिकार आहेत परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरिब जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे. मुंबई महानगर पालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून १०० कोटी रुपये खर्च केले आहेत.भाजपा सरकार मात्र स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली या शाळा खाजगी लोकांच्या हाती देत आहे. …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईकरांची जीवघेण्या प्रवासातून सुटका करण्यासाठी काय केले? लोकसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केंद्राला केला सवाल
मुंबईची उपनगरीय रेल्वे ही लाईफलाईन आहे. परंतु दररोज होणारे अपघात आणि असुरक्षित प्रवासाने ती डेथलाईन बनली. लोकलने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेल्वे विभाग व सरकारकडे सातत्याने लोकल सेवेबद्दल तक्रार करूनही त्यात काही फरक पडलेला नाही. मुंबईतील लोकल सेवेसाठी सरकारने काय काय उपाययोजना केल्या, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष …
Read More »वर्षा गायकवाड म्हणाल्या, उत्तर भारतीय समाजाला जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ अभियान उत्तर भारतीयांच्या विकासात काँग्रेसचे योगदान
उत्तर भारतीय समाज, मुंबई व काँग्रेस पक्ष यांचे एक घट्ट नाते आहे. मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय समाजाला काँग्रेस हा मोठा आधार राहिलेला आहे. आजही काही लोक उत्तर भारतीयांविरोध आग ओकत असताना काँग्रेस मात्र या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि आगामी काळात उत्तर भारतीय समाजाला काँग्रेस पक्षाशी मजबूतपणे जोडण्याचे काम …
Read More »इम्रान प्रतापगढी यांचा इशारा, भाजपा युतीचे सरकार चोरीचे, काँग्रेस पक्ष मुंबईला लुटू देणार नाही मुंबई काँग्रेस आयोजित संविधान जिंदाबाद जनसभेला मोठा प्रतिसाद
महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार मतांची चोरी करून स्थापन झालेले आहे. विधानसभा प्रचारावेळी राज्यात भाजपा कुठेच दिसली नाही पण मतचोरी करुन सरकार आणले आहे. राहुल गांधी यांनी या मतचोरीचा जाब निवडणूक आयोगाला विचारला पण अद्याप आयोगाने उत्तर दिले नाही. विधानसभेची निवडणूक पराभूत झालो याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, देवनार एम ईस्ट वार्डात पुनर्वसन प्रकल्पात १२५१ कोटींचा घोटाळा मुंबई काँग्रेसकडून बीएमसी मधील भ्रष्टाचाराची व मुंबईकरांना लुटणाराऱ्यांची पुन्हा पोलखोल
मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार कसा बोकळला आहे व सत्ताधारी पक्षातील लोक अधिकाऱ्यांशी संगनमत मुंबईची कशी लुट करत आहेत याचा मुंबई काँग्रेसने पुन्हा पोलखोल केली आहे. देवनार एम ईस्ट वार्डातील एका पुनर्वसन प्रकल्पात बीएमसीने बिल्डरवर मेहरबानी करत सर्व नियमांन बदल देत मुंबईचा पैसा लुटला आहे. हा संपूर्ण घोटाळा १२५१ कोटी रुपयांचा असून …
Read More »
Marathi e-Batmya