Tag Archives: varsha gaikwad

रमेश चेन्नीथला यांचा विश्वास, मविआमध्ये कोणतेही वाद नाहीत मैत्रिपूर्ण लढत नाही महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपायुतीचा दावा फसवा व खोटा; प्रगती महाराष्ट्राची नाही तर युतीतील धोकेबाजांची-नाना पटोले

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरु असून त्यावरही लवकरच निर्णय होईल. महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपा युतीत मात्र जागावाटपावरून प्रचंड …

Read More »

शिंदे गटाचे माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांनी आज मुंबई काँग्रेस अधयक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी वर्षा गायकवाड यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खा. वर्षा …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, धारावीकरांचा उपयोग करुन मुंबईत व्होट जिहाद वर्षा गायकवाड यांना पुढे करून अडचणीत आणू नका

शहरी नक्षलवादांच्या मार्गदर्शनानुसार उबाठा सेनेची लढाई ही अदानी साठी आहे. आमची लढाई धारावीतील गरिबांच्या घरासाठी आहे. धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबई व्होटजिहाद केला जातोय, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. धारावीबाबत आज पुन्हा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचे आशिष शेलार यांना आव्हान, धारावी प्रकरणी चर्चेची तयारी धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईत सर्वात मोठा जमीन घोटाळा, भाजपा नेते अदानीचे एजंट आहेत का ?

पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला मुंबई विकण्याचे षडयंत्र असून मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठका ह्या अदानीला जमीन देण्यासाठीच घेतल्या का, अशी शंका येत आहे. मुंबईतील हा मोठा जमीन घोटाळा असून एका व्यक्तीसाठी केंद्र व राज्य सरकार काम करत आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांचा धारावी प्रकल्पाचा अभ्यास नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावे …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका,… पराभवाच्या भितीमुळेच मुंबईतील टोल माफी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवरील (MTHL) कार आणि लाईट मोटार वाहनांच्या टोल माफीचे काय?

मुंबईतील टोल नाक्यावर होत असेलल्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती पण या मागणीकडे भाजपा युती सरकारने जाणीवपूर्वक कानाडोळा केला. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही पराभव अटळ असल्याची जाणीव झाल्यानेच हादरलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांवर टोल माफी जाहीर केली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महाभ्रष्टयुती सरकारमुळे मुंबईसह महाराष्ट्र जंगलराज बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या ही महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना

राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारी आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या लोकप्रतिनिधीला वांद्र्यासारख्या भागात खुलेआम गोळ्या घातल्या जातात ही गंभीर बाब आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे कुठे? असा संतप्त सवाल करत भाजपा-शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबईसह महाराष्ट्र …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपा-शिंदे सरकारची अदानीला दसरा दिवाळीची भेट बोरिवलीतील भूखंडही अदानीच्या घशात

भारतीय जनता पक्ष शिंदे सरकारची निरोपाची वेळ आली तरी त्यांची मुंबई लुटण्याची भूक काही संपत नाहीत. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई विकण्याचा सपाटा सुरुच आहे. मुंबईचा पर्यावरणीय समतोल रहावा यासाठी काँग्रेस सरकारने मुंबईत ना विकास क्षेत्र (NDZ ) निश्चित केली होती त्यातील मढ आयलंडची जमिनही भाजपा सरकारने अदानीला देण्याचा घाट घातला …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, सत्तेतील ‘सावत्र भाऊ’ माताभगिनींच्या अब्रुचे रक्षण…. मुंबईसह महाराष्ट्रातील महिला असुरक्षित; फडणवीस सर्वात निष्क्रीय व अकार्यक्षम गृहमंत्री

मुंबईच्या वांद्र्यातील निर्मलनगरमध्ये १८ वर्षाच्या तरुणीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबई हादरली आणि महाभ्रष्ट युती सरकारच्या काळात माताभगिनी सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पुण्याच्या बोपदेव भागात विद्यार्थीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला, त्याचे आरोपी अद्याप सापडले नाहीत तोच मुंबईत घटना घडली. दररोज कुठे ना कुठे महिलेवर अत्याचार केल्याच्या …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा विश्वास, परिस्थिती वेगळी, महाराष्ट्रात मविआचे सरकार येणार लाडकी बहिण योजना केवळ निवडणुकीत महिलांची मते मिळवण्यासाठी

हरियाणा विधानसभेच्या निकालाने काँग्रेस पक्ष निराश झालेला नाही. हरियाणा व महाराष्ट्रातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्रातील भाजपा शिंदे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार असून या भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी जनता तयार आहे. राज्यातील जनतेचे समर्थन महाविकास आघाडीला मिळून मविआचे सरकार येईल, असा विश्वास महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, दोन धारावी बनवण्याचा भाजपा सरकारचा इरादा… धारावीकरांना मिठागरे व डंपींग ग्राऊंडच्या जमिनीवर हाकलण्याचे षडयंत्र

धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली धारावीकरांना विस्थापित करून अदानीचे टॉवर उभे करण्याचा भाजपा-शिंदे सरकारचा प्रयत्न आहे. धारावीकरांचा तीव्र विरोध असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत भाजपा सरकारने अपात्र लोकांना भाडेतत्वावरील घरे देण्याचा जीआर काढला असून दोन धारावी करण्याचा सरकारचा इरादा असून एक अदानीसाठी व दुसरी गरीबांसाठी, असा घणाघाती हल्ला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार …

Read More »