Tag Archives: vidhan bhavan

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मारामारीचे प्रायश्चित म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी राजानीमा द्यावा पावसाळी अधिवेशनात शेतकरी, कष्टकरी, महिला, बेरोजगारांच्या प्रश्नांना सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. हे अधिवेशन लक्षात राहिल …

Read More »

पडळकर-आव्हाड प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय अधिवेशन काळात अभ्यागंताना प्रवेश बंदी, पडळकर-आव्हाडांना खेद व्यक्त करायला लावला

काल संध्याकाळी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी विधिमंडळाच्या इतिहासतील काळी घटना घडवून आणली. त्यानंतर विधिमंडळातील सुरक्षा रक्षकांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी पडळकर-आव्हाड यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करून अटक केली. आज सकाळी विधिमंडळाचे कामकाज सुरु झाले. तेव्हा विधान परिषदेतही या प्रश्नी विरोधकांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, कोणाच्या हातात दिलात महाराष्ट्र ? भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया

काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ‘ काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?’ असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड …

Read More »

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आगीच्या दुर्घटनेमुळे धुराचे साम्राज्य शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाजः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली घटनास्थळी धाव

राज्यातील जनतेच्या हिताचे कायदे आणि राज्याचे सार्वभौम दोन्ही सभागृह असलेल्या विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरच आज अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र त्यामुळे विधान भवनाच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असताना विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची घटना …

Read More »

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यपालांनी अभिभाषणात कोणते मुद्दे मांडले? अर्थसंकल्पिय अधिवेशनाला अभिभाषणाने सुरुवातः महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा पहिल्यांदाच उल्लेख

राज्यात महायुती सत्तास्थानी विराजमान झाल्यानंतर या महायुती सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पिय अधिवेशन पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सदस्यांसमोर अभिभाषण करत राज्य सरकारच्या पुढील वाटचालीबाबतच्या धोरणाची माहिती दिली. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन पुढे म्हणाले की, शेतकरी, महिला,समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी त्याचसोबत …

Read More »

टीम जुनीच पण अजित पवार यांची खुर्ची…एकनाथ शिंदे यांचा टोला, तर अजित पवार म्हणाले…. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत संवाद

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी शेतकरी विरोधी आणि विसंवादी सरकार अशी टीका करत बहिष्कार टाकला. चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही आवर्जून उपस्थित राहिले. मात्र या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, शेतकरी विरोधी, विसंवादी सरकार म्हणून चहापानावर बहिष्कार मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक आक्रमक

सरकार हे शेतकरी विरोधी असून तीन बाजूला तीन तोंड असणारे हे विसंवादी सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावत नसल्यामुळे आणि सत्ताधारी पक्ष सातत्याने विरोधी पक्षाला सापत्निकतेची वागणूक देत असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याचे विरोधी …

Read More »

राहुल गांधींच्या कारवाईवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन… सभात्याग केल्यानंतर विरोधक दिवसभर कामकाजात सहभागी झाले नाहीत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाई आणि विधानसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आलेल्या जोडे मारो आंदोलन करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही त्यावर चकार शब्द बोलू दिले नसल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठाण मांडत …

Read More »

उध्दव ठाकरे यांची तैलचित्रावरून टीका, चांगली गोष्ट, मात्र तुमचा हेतू वाईट पवारांचे फोनवरून मार्गदर्शन घेतो, मग आम्ही काय करत होतो?

आगामी मुंबई महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवत शिंदे-फडणवीस सरकारकडून आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेना पक्षमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे तैलचित्र बसविण्यात आले. या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून (ठाकरे गट) एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख …

Read More »

विधान भवनातील शिवसेना कार्यालयातून शिंदे गटाने ठाकरे गटाला बाहेर काढले नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात शिंदे गटाच्या आमदारांची दांडगाई

शिवसेना नेमकी कोणाची याचा वाद जरी सध्या सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जरी अद्याप प्रलंबित असला तरी नागपूरातील गारठलेल्या वातावरणात शिवसेनेतील शिंदे गटात आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपल्याने थंडीच्या वातावरणातही विधानभवनातील वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्याचे झाले असेल की, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने जरा जास्तच …

Read More »