पंतप्रधानांसोबतच्या त्या घटनेची चौकशी करा, अन्यथा संशयाला वाव मिळेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणे हा गंभीर विषय आहे त्यामुळे याप्रकरणी केंद्र किंवा राज्य सरकारने तपास न करता उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसने राजकारण करायला सुरुवात केली आहे. मात्र या सुरक्षेची जबाबदारी एसपीजी, आयबी आणि राज्य सरकार पोलिस या तिघांची असते. त्यामुळे चूक कुणाकडून झाली हे जेव्हा उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास होईल तेव्हा सत्य काय आहे हे देशाच्या जनतेसमोर येईल असेही ते म्हणाले.

केंद्र सरकार व राज्य सरकार चौकशी करेल त्यावेळी संशयाला वाव निर्माण होईल अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

Video: स्टेडियमचे उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितला फुटबॉलचा “हा” किस्सा आणि आमचं गल्लीतलं क्रिकेट कधी रस्त्यावर आलंच नाही

मराठी ई-बातम्या टीम सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येत असलेल्या फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *