अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे आता श्री विजय पुरम असे नामकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर ट्विट करत जाहिर केले. तसेच स्पष्ट केले की, देशाला वसाहतवादी जोखडातून मुक्त आणि वसाहतवादीचा गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त झाल्याचे दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टीकोन साकार करण्यासाठी म्हणून पोर्ट ब्लेअरचे नामांतर श्री विजय पुरम असे करण्यात आल्याचे सांगितले.
अमित शाह पुढे म्हणाले की, श्री विजय पुरमचे “आमच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि इतिहासात अतुलनीय स्थान आहे”. हे नाव स्वातंत्र्य लढ्यात मिळालेल्या विजयाचे प्रतीक आहे. आधीच्या नावाला औपनिवेशिक वारसा होता, श्री विजय पुरम हे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात मिळालेल्या विजयाचे आणि त्यात अंदमान आणि निकोबार बेटांच्या अद्वितीय भूमिकेचे प्रतीक असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे आपल्या अमित शाह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस जी यांनी आपला तिरंगा (तिरंगा) फडकवण्याचे पहिले ठिकाण आणि सेल्युलर जेल ज्यामध्ये वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारत राष्ट्रासाठी संघर्ष केला ते देखील हे ठिकाण आहे, असेही सांगितले.
पोर्ट ब्लेअरचे नाव पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे ब्रिटिश वसाहती नौदलाचे अधिकारी कॅप्टन आर्चीबाल्ड ब्लेअर यांच्या नावावर होते.
Inspired by the vision of PM @narendramodi Ji, to free the nation from the colonial imprints, today we have decided to rename Port Blair as "Sri Vijaya Puram."
While the earlier name had a colonial legacy, Sri Vijaya Puram symbolises the victory achieved in our freedom struggle…
— Amit Shah (@AmitShah) September 13, 2024
अमित शाह पुढे म्हणाले की, आमच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि इतिहासात अंदमान आणि निकोबार बेटांचे अतुलनीय स्थान आहे. एकेकाळी चोल साम्राज्याचा नौदल तळ म्हणून काम केलेला बेटाचा प्रदेश आज आमच्या धोरणात्मक आणि विकासाच्या आकांक्षांसाठी महत्त्वाचा तळ बनला आहे, असल्याचेही यावेळी सांगितले.
२०१८ मध्ये, पंतप्रधान मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली म्हणून अंदमान आणि निकोबार बेटांच्या तीन बेटांचे नामकरण केले. रॉस आयलंड, नील आयलंड आणि हॅवलॉक बेट या तीन बेटांची अनुक्रमे नेताजी सुभाषचंद्र बोस द्विप, शहीद द्विप आणि स्वराज द्विप अशी नावे ठेवण्यात आली आहेत. भूतकाळात, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने वसाहतींचा वारसा मोडून काढण्यासाठी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांची नावे बदलली.