Editor

संसद सुरक्षेच्या मुद्यावरून निलंबित खासदारांचे आंदोलन सुरुच

संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद न देता निवेदन अद्याप केले नाही. उलट विरोधकांच्या गैरहजेरीतच राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज चालविले जात आहे. या पार्श्वभूमीवर संसदेतील दोन्ही सभागृहाच्या निलंबित सदस्यांनी महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर लोकशाही वाचवा अशी मागणी करणाऱे फलक …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र तर फडणवीस म्हणाले, NCRB ने फक्त …

मागील १० दिवसांपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभेत विरोधी पक्षाने मांडलेल्या २९२ अन्वयेखाली अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विरोधी पक्ष गोंधळलेला असल्याचे वक्तव्य भाषणाच्या सुरुवातीलाच केले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर जयंत पाटील …

Read More »

कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. अकादमीचे सचिव के.श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कॉपर्निकसमार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष २०२३ साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे …

Read More »

अंबादास दानवे यांचा टीका, राज्यातील आरोग्यव्यवस्था मरणपंथाला

नांदेड, कोल्हापूर, संभाजीनगर, ठाणे व कळवा येथील शासकीय रुग्णालयात औषधं व डॉक्टरांअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला,या घटना राज्याला लाज वाटेल अशा आहेत. असे म्हणत राज्यातील आरोग्य व्यवस्था मरणपंथाला आली असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अंबादास दानवे म्हणाले, खासगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची घोषणा …

Read More »

जयंत पाटील यांचा खोचक टोला, जसा “उडता पंजाब” तसा “उडता महाराष्ट्र”

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्या देखील मागे पडला आहे. उपराजधानी नागपुरातही तीच परिस्थिती आहे. त्यामूळे फडतूस नाही, काडतूस आहे म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांचाही दरारा नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सरकारवर केली. आज हिवाळी अधिवेशनादरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावर जयंत पाटील …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणवतात मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी शेतकऱ्याच्या मुलासारखं उत्तर दिले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लागतील अशी अपेक्षा होती. संत्रा, धान, कापूस, सोयाबीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला नाही. १९४ तालुक्यांना केंद्राकडून मदत मिळेल अशी अपेक्षा होती, पण तिथेही अपेक्षाभंग झाला आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या मदतीपासून …

Read More »

विद्युत शुल्कातील माफीमुळे मेट्रो प्रवाशांना नेमका किती फायदा होणार?

मेट्रोला विद्युत शुल्क माफ करताना मेट्रोच्या प्रवाशांना किती फायदा होणार? तिकीट दर नेमका किती कमी होणार? असे सवाल विधान परिषदेतील कॉंगेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. तसेच मुंबई, नवी मुंबई मधील मेट्रोच्या तिकीट दरातील तफावतीबद्दल खुलासा करण्याची मागणीही त्यानी केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरातील …

Read More »

हसन मुश्रीफ यांचा इशारा, बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी विशेष मोहीम

बनावट पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शोधण्यात येईल. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अजय चौधरी, प्रताप सरनाईक, …

Read More »

राहुल गांधी यांचा पलटवार,… तो तर माझ्या फोन मध्ये, चर्चा मात्र माध्यमांमध्ये

संसद सुरक्षा भंग प्रश्नी काल मंगळवारी लोकसभेतील विरोधकांच्या ४९ खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षांचे खासदार संसदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होते. त्यावेळचे आंदोलन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतानाचा दुसरा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावरून भाजपा आणि राज्यसभेचे उपराष्ट्रपती तथा पदसिध्द …

Read More »

संसद सुरक्षा भंग प्रश्नी सत्ताधारी निलंबनाचे सत्र सुरूचः आज २ जणांचे निलंबन

संसद सुरक्षा भंग प्रश्नी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा सभागृहात निवेदन करण्याची मागणी आजही १४१ खासदारांच्या निलंबनानंतर राहिलेल्या विरोधी बाकावरील दोन खासदारांनी संसदेत केली. त्यावरून सीपीआय एम आणि केरळ काँग्रेसच्या दोघांना आज निलंबित केले. लोकसभेतून काल संध्याकाळपर्यंत इंडिया आघाडीतील १४१ खासदारांना …

Read More »