Editor

इम्तियाज जलील यांचा आरोप, ते सरकार ४० टक्के तर हे २० टक्के… कामं पाहिजे तर मंत्रालयात पैसे द्यावे लागतात

नुकत्याच झालेल्या कर्नाटकातील विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सरकारमधील मंत्री ४० टक्के कमिशन घेतात हा प्रमुख मुद्दा प्रचारात बनला होता. तसेच या आरोपामुळे बोम्मई सरकार चांगलेच बदनामही झाले. आता त्याच धर्तीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री २० टक्के कमिशन घेत असल्याचा खळबळजनक आरोप केला. …

Read More »

आदित्य ठाकरे यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट दोनदा झाली भेट, संभाव्य राजकिय आघाडीबाबत चर्चा झाल्याची माहिती

कर्नाटकातील निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्यानंतर विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची आज पुन्हा भेट झाली. २४ फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर आले होते. तेव्हाही त्यांनी ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर, लागलीच तीन, …

Read More »

परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना संधी देणारे डॉ. राम ताकवले याचं निधन नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरु, एमकेसीएलचे संस्थापक, पुणे विद्यापाठीचे कुलगुरु

ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व राष्ट्रसेवा दल व समाजवादी विचारसरणीचे विचारवंत प्रो. राम ताकवले यांचे आज निधन झाले. मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू, सोबतच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले होते. महाराष्ट्र ज्ञानमंडळाची स्थापना (एमकेसीएल) झाली त्यामध्ये संस्थापक संचालक म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली होती. …

Read More »

अॅड आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर,…त्यांच्या प्रतिक्रियेला फार महत्व देत नाही घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातील प्रतिक्रिया देणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचे कौतुक करत भाजपाचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. दरम्यान, राज ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात …

Read More »

संजय राऊत यांच्यावर त्या वक्तव्यावरून गुन्हा दाखल ? पोलिसांकडून तपास सुरु सकाळीच्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरून नाशिकमध्ये गुन्हा दाखल

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यापासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर टीका करत आरोपही करत असतात तर कधी स्वतःवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तरही देतात. बऱ्याचदा ते सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु अशाच एका पत्रकार …

Read More »

काँग्रेसच्या विजयानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, आमचं कोणीच… असं समजणाऱ्यांचा पराभव उगाच आता कोणाला धडे शिकवू नका

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांची फौज तळ ठोकून होती. तसेच भाजपाला निर्विवाद बहुमत मिळणार, नाही मिळाले तर आमच्याकडे प्लॅन बी तयार असल्याच्याही वल्गना करण्यात येत होत्या. मात्र जनतेने या कोणत्याही गोष्टींचा विचार न करता काँग्रेसच्या पारड्यात मतांचे दान भरभरून टाकत एकहाती सत्ता …

Read More »

उध्दव ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया,…. शहाण्या जनतेचं अभिनंदन कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी होत निकाल जाहिर झाला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी ६४ जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसला २० आणि अपक्षांना ४ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस बहुमताचा आकडा सहजपणे पार करेल, अशी …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमची मते आहे तशीच, फक्त पाच टक्के मते… वाटलं होतं कल आम्ही तोडू

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि जनता दल ( धर्मनिपेक्षक ) यांचा धुव्वा उडवत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला. विधानसभेच्या २२४ जागांपैकी तब्बल १३५ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत काँग्रेसने कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावर नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, आमची फक्त ५ टक्के मते …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, चुकीचे वातावरण पसरविणाऱ्यांना धडा… उध्दव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार

गेल्या आठ-दहा दिवसांत जाहीर सभांमध्ये मी बोलून दाखवले की कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचा पराभव होईल. त्यांचे सरकार जरी असले, देशातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक ठिकाणी सभा, रोड शो असे कार्यक्रम जरी केले असले तरी तेथील जनतेचा जो रोष आहे तो मतांमधून व्यक्त केला जाईल अशी खात्री आम्हाला होती. तसेच मोदी …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, नफरत की दुकान बंद, प्रेम की दुकान शुरूः ती आश्वासने लगेच… काँग्रेसचा बहुमताचा आकडा पार करताना राहुल गांधी यांची घोषणा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३७ जागांवर आघाडी घेतल्यानंतर देशभरातील काँग्रेसजनांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमवीर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील आनंद व्यक्त करत म्हणाले, नफरत की दुकान बंद प्रेम की दुकान शुरू असे सांगत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जी पाच आश्वासने दिली होती, ती पहिल्या कॅबिनेटमध्ये पूर्ण करू, अशी …

Read More »