शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यासंदर्भात उद्धव ठाकरेंची कोणतीही प्रतिक्रिया कालपासून समोर आली नव्हती. तसेच लोक माझे सांगाती या पुस्तकात मुख्यमंत्री पदी असताना उध्दव ठाकरे यांच्या कारभारावरून केलेल्या टीकेवर अखेर आज दुपारी मातोश्रीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर आणि पुस्तकातील उल्लेखावरून …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडाळ्याची चावी पुन्हा शरद पवार यांच्याच हाती; दोन दिवसात अधिकृत निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाही, पुन्हा असं बसावं लागणार नाही
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहिर केल्यापासून मागील सलग दोन दिवसापासून निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. आज दुपारी खासदार सुप्रिया सुळे यांनी ठिय्या आंदोलन कऱणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि महिला व विद्यार्थीं आंदोलकांनाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु …
Read More »ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना शिंदे सरकारच्या समितीतून वगळले जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी पशु व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविले पत्र
आरेच्या सर्वांकष विकासाबरोबर आरेतील आदिवासी व बिगर आदिवासी रहिवाशांना मुलभूत सुविधा देण्यासाठी सातत्याने दिवस-रात्र प्रयत्न करणारे तसेच वेळोवेळी लोकशाहीच्या विविध आयुधांचा वापर करुन विधानसभेत आरेतील विविध प्रश्न मांडणारे ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीतून वगळण्यात आल्याने विधानसभा क्षेत्रातआश्चर्य व्यक्त करण्यात येत असून आरेतील रहिवाशांमध्ये असंतोष …
Read More »मोठी बातमीः सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार दस्त नोंदणी अर्थात दुय्यम निबंधक कार्यालये नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे महसूल मंत्र्यांचे आवाहन
सामान्य जनतेच्या सोयीसाठी जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीत अडचण निर्माण होणार नाही आणि यापुढे नॉनस्टॉप दस्त नोंदणी होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. खरेदी -विक्री व्यवहारामध्ये वाढ होत …
Read More »शरद पवार यांच्या राजीनामा प्रकरणाचा सस्पेन्स कायम आणखी दोन दिवसानंतर राजीनामा निर्णयावर शक्यता
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी पक्षातून दबाव वाढला असला तरी या संदर्भात पक्षीय स्तरावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. राजीनामा मागे घेण्याबाबत पवार यांनी पक्षाच्या नेते आणि पदाधिकारी यांच्याकडे दोन तीन दिवसांचा अवधी मागितला असल्याने याबाबतचा निर्णय नंतर होईल, अशी माहिती जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल …
Read More »जयंत पाटील यांनी ‘त्या’ प्रकरणावरून नाराजी व्यक्त करत वज्रमुठ सभेबाबत केले भाष्य बैठकीला न बोलविण्याबाबत व्यक्त केली नाराजी
राज्यात काहीही करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे सातत्याने पक्ष संघटना बांधणीसाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. तसेच त्यासाठी महिना-दोन महिन्यात पक्षाचा कार्यक्रमही घेत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्तीचा निर्णय जाहिर करण्याच्या आधी पवार कुटुंबियांची बैठक झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसेच इतक्या मोठ्या निर्णयाची …
Read More »सारथीच्या शैक्षणिक सवलती, सुविधांसंदर्भात लवकरच सर्वंकष समान धोरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि सुविधाबाबत सर्वंकष समान धोरण ठरविण्याबाबत बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी या संस्थांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील …
Read More »शहरांमध्ये आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवणार सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य
राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ५७८ कोटी ६३ रुपये किंमतीचा हा प्रकल्प असेल. शहरांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, …
Read More »जितेंद्र आव्हाड यांची साद, ज्याचं बोट धरून … तर संपल आमचं राजकारण उद्यापासून महाराष्ट्रात तीव्र आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते आज …
Read More »कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ शिष्यवृत्ती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती देणार वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृती देण्यात येणार असून …
Read More »
Marathi e-Batmya