राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत राज्यात घरेलू कामगार म्हणून काम करणाऱ्या आणि ५५ वर्ष पूर्ण केलेल्या घेरलू कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार असल्याची माहिती, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी यावेळी दिली. जागर मुंबईचा या अभियानांतर्गत कामगारांसाठी चेंबूर येथे भाऊबीज मेळाव्याचे आयोजन …
Read More »काँग्रेसची स्पष्टोक्तीः सावरकरांबद्दल काँग्रेस, शिवसेनेची मते वेगळी; पण मविआवर परिणाम नाही
भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठे प्रतिसाद व प्रेम दिलेले आहे हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुलजी गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटांशासमोर झुकले नाहीत हे सांगताना त्याची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही …
Read More »ऐतिहासिक भारत जोडो यात्रेत गांधी-नेहरू उतरले रस्त्यावर ..
भारत जोडो यात्रेने आज इतिहास रचला. महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा वारसा जपणारे दोन माननीय व्यक्तिमत्व, महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतु राहुल गांधी हे दोघे आज भारत जोडो यात्रेत देश वाचवण्याच्या ऐतिहासिक कार्यात एकत्र सहभागी झाले. देशाचे संविधान व लोकशाहीवर …
Read More »खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील ६० हजार कर्मचाऱ्यांना वेतन मंजूर
राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबतचा प्रलंबित प्रश्न शासनाने सोडवला असून घोषित, अघोषित, 20 टक्के अनुदान घेणाऱ्या, 40 टक्के अनुदान घेणाऱ्या तसेच त्रुटींची पूर्तता केलेल्या शाळांना यापुढे पुढील टप्प्यातील वेतन अनुदान लागू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याचा सुमारे 60 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना …
Read More »सभासद नसलेला शेतकरीही आता निवडणूकीच्या रिंगणात उतरणार सर्वसामान्य शेतकरी देखील आता बाजार समितीच्या निवडणूक लढवू शकणार
आता सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतील. यासंदर्भात महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणेमुळे कृषि उत्पन्न बाजार समितीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व तसेच कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे. या अधिनियमाच्या 13 (1)(अ) …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेतले “हे” महत्वाचे निर्णय
दर आठवड्याला होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मागील आठवडाभरात झाली नाही. त्यामुळे गतवेळी प्रस्तावित असलेले विषय आणि सध्याच्या चालू आठवड्यातील नवे विषय घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरूवारी झाली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळपास १४ हून अधिक निर्णय घेण्यात आले. ते निर्णय खालीलप्रमाणे नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी …
Read More »शिंदे-फडणवीसांचा मोठा निर्णयः या स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ
राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे. या …
Read More »महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता दर जैसे थे
आगामी मुंबई महापालिका निवडणूका नजरेसमोर ठेवत मुंबईतील मालमत्ता दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ या वर्षा करीता सुधारीत केला जाणार नसल्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम …
Read More »शेतमजूर महिला म्हणतात, राजकारणाशी संबध नाही राहुल गांधींसाठी आलोय
गरिबाला स्वस्त धान्य मिळायला पाहिजे. स्वस्तात गॅस पाहिजे. मदत मिळायला पाहिजे, नाहीतर आम्ही जगायचे कसे? आमची पोरं कशी शिकणार ? हा प्रश्न आहे मेडशीच्या पद्मिनी सुरेश थोरात यांना पडलेला. त्या शेतमजूर आहेत. अशिक्षित आहेत. राजकारणाशी संबंध नाही. पण राहुल गांधीचे भाषण ऐकायला उपस्थित होत्या. रोज दोनशे रुपये हजेरीवर शेतात मजुरीला …
Read More »मुख्यमंत्री शिंदेचे आदेश, अर्ज निकाली काढण्याची मोहिम सुरूच ठेवा सेवा पंधरवडा काळात ९५ टक्के अर्ज निकाली
राज्यात १७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा कालावधीत विविध १४ सेवा आणि पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांचा ९५ टक्के निपटारा करण्यात आला आहे. या मोहिमेत एकूण ८३ लाख ५७ हजार २१८ प्रलंबित अर्जांपैकी ७९ लाख ४५ हजार २२ अर्ज निकाली काढण्यात आले. याबद्दल आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत …
Read More »
Marathi e-Batmya