मराठी भाषेतल्या साहित्य निर्मितीबद्दल राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार २०२५ साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात ३० जानेवारी २०२६ पर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे …
Read More »वर्षा गायकवाड यांचा विश्वास, काँग्रेस पक्ष नेहमीच उत्तर भारतीयांच्या पाठीशी सक्षमपणे उभा मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलचा जाहीरनामा प्रसिद्ध
मुंबई महानगरपलिका निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलने सात कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये उत्तर भारतीयांच्या सन्मानाचे आणि स्वयंरोजगाराचे रक्षण करण्यासह अनेक प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत. शारदा ज्ञानपीठ इंटरनॅशनल स्कूल, दत्त मंदिर रोड, मालाड (पूर्व) येथे आयोजित जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय …
Read More »भूपेंद्र यादव यांची माहिती, न्यायालयाच्या निर्णयानंतर अरवली खाण प्रकरणी भूमिका स्पष्ट इकोलॉजी आणि इकॉनॉमीचा एकत्रित विचार आणि भूमिका
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोमवारी सांगितले की, अरवली पर्वतरांगेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल गैरसमज पसरवला जात आहे, आणि सरकारने देशातील सर्वात जुन्या पर्वतरांगेच्या संरक्षणाला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. आपण या निकालाचा सविस्तर अभ्यास केला असल्याचे सांगून भूपेंद्र यादव म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानमधील …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, माणिकराव कोकाटे यांची आमदारकी अबाधित पण इतर लाभाचे पद स्विकारता येणार नाही
आर्थिक दुर्बल घटकातून घर घेण्यासाठी केलेल्या कागदपत्रांच्या हेराफेरी प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा आणि आमदाराकीवर टांगती तलवार असलेले आमदार माणिकराव कोकाटे यांच्याबाबत मात्र सर्वोच्च न्यायालयाने चांगलाच दिलासा दिला आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भात दिलासा देत नव्याने लाभाचे पद सध्या स्विकारता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. आज सर्वोच्च न्यायालयाचे …
Read More »काँग्रेसच्या AICC नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व यश
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत वंचित बहुजन आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले असून फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या एकत्रित मेहनतीमुळे ७० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात येत असून, हा विजय …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची असते हे मतदारांनी दाखवून दिले
राज्यातील २८८ नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्षाने विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला. कोणतीही आर्थिक रसद नसताना, केवळ लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून सत्ताधा-यांच्या धनशक्तीविरोधात संघर्ष केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर या निवडणुकांत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक राज्यातील मतदारांनी निवडून दिले. या निकालावरून पैशांपेक्षा विश्वास …
Read More »एकनाथ शिंदे यांचा टोला, खरी शिवसेना कोणाची हे जनतेने दाखवून दिले घरात बसवणाऱ्यांना जनतेने घरीच बसवले
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्येही शिवसेनेचा स्ट्राइक रेट भक्कम राहिला असून, आम्ही जनतेसमोर विकासाचा अजेंडा घेऊन गेलो, स्थानिक प्रश्नांवर भर दिला आणि कोणावरही टीका केली नाही, त्यामुळेच जनतेने आम्हाला भरभरून यश दिले, असे ठाम मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना …
Read More »रविंद्र चव्हाण म्हणाले, विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला दणदणीत यश देऊन मतदारांनी विकास, सेवा, सुशासनला कौल दिला आहे. १२५ पेक्षा अधिक जागांवर भाजपाचा विजय आणि ११०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून दिले आहेत. भाजपावर मोठा विश्वास दाखविल्याबद्दल जनतेचे आभार मानतो असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी रविवारी केले. भाजपा …
Read More »रामदास आठवले यांची माहिती, रिपब्लिकन पक्षाला नगरपालिका निवडणुकीत राज्यभरात घवघवीत यश वर्धा ; सोलापूर; सातारा; रायगड; यवतमाळ; कोल्हापूर आदी जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विजयी
राज्यात नगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला राज्यभरात घवघवीत यश प्राप्त झाले आहे. कोल्हापुरातील हुपरी नगराध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे मंगलाराव माळगे हे बहुमताने विजयी झाले आहेत. हुपरी मध्ये शीतल कांबळे; पन्हाळा नगर परिषद मध्ये प्रतीक्षा योगेश वराळे; आजरा नगर परिषद मध्ये कलावती कांबळे हे रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. सातारा जिल्ह्यात प्रतीक …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, राष्ट्रवादीच्या विकासात्मक भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट...
आज जाहीर झालेल्या नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुक निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे राष्ट्रवादीच्या विकासात्मक, सर्वधर्मसमभावाच्या भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब झाल्याचे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जनतेने केवळ आश्वासनांना नाही, तर प्रत्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya