Editor

कोरोना: बाधितांच्या संख्येत एकदम १० हजार २१८ ची एकदम घट ४ हजार ३०४ नवे बाधित, ४ हजार ६७८ बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी आज राज्यातील कोविड १९ रुग्णांचे दिनांक १२ नोव्हेंबर पर्यंतचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. केंद्र सरकारने मान्य केलेल्या बदलानुसार दुहेरी नोंद वगळणे आणि इतर राज्यांमधील पॉझिटिव्ह व्यक्ती त्या त्या राज्यात वर्ग करणे, यामुळे एकूण बाधितांच्या संख्येत १०,२१८ रुग्णांची घट झाली आहे. त्या सोबतच राज्यातील बाधित व्यक्तींच्या पत्त्यातील …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबरः मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा मंत्री वर्षा गायकवाड यांची ट्विटरद्वारे माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सरकारी सेवेत असलेल्या मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून २०१७ सालापासून रखडलेल्या या पदोन्नत्या लवकरच मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली. मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नत्याबाबत निर्णय घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची स्थापना करण्यात आली होती. या मंत्रिगटाची उपमुख्यमंत्री …

Read More »

…आणि मंत्रालयात बालनाट्य सुरु भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी बाल रंगभूमीवर बालनाट्य बंद आहेत पण सध्या मंत्रालयाच्या दारात “होय! मेट्रोचा खेळ खंडोबा करुन दाखवला!!” नावाचे सुरु असलेले बालनाट्य मुंबईकर हताशपणे पाहत आहेत, अशा शब्दात भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारवर मेट्रो कारशेडच्या विषयावरून टीका केली. ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला चपराक लावली आहे …

Read More »

अंहकार सोडून आरेमध्ये मेट्रो कारशेडचे काम सुरु करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला

मुंबईः प्रतिनिधी सौनिक समितीचा अहवाल अतिशय स्पष्ट आहे. आरे येथे मेट्रो कारडेपो केल्याने पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही. कांजुरमार्ग येथे कारडेपो केल्याने पर्यावरणाची हानी होणार आहे, हे या समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते. केवळ आणि केवळ सरकारच्या अहंकारासाठी हा निर्णय बदलण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला आरेची जागा दिली आहे. …

Read More »

कांजूर मार्ग मेट्रो कारशेडच्या महाविकासच्या प्रस्तावाला न्यायालयाचा लाल सिंग्नल राज्य सरकारच्या धोरणाला धक्का

मुंबईः प्रतिनिधी मुंबईतील पर्यावरणीय समतोल राखण्याच्या अनुषंगाने नियोजित आरेतील कार शेड कांजूर मार्गला हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने हरकत घेत पुढील सुणावनी होईपर्यत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सदरच्या जागेवर कारशेड उभारणाच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आज दिली. आरेतील मेट्रो कारशेडसाठी जंगलातील वृक्षांची …

Read More »

कोरोना : बाधित रूग्णांची संख्या स्थिर ३ हजार ४४२ नवे बाधित, ४ हजार ३९५ बरे झाले तर ७० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील १५ दिवसांपासून राज्यातील बाधित रूग्णांची संख्या ३ हजार ते ३५०० या प्रमाणात नवे बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे नव्या बाधित रूग्णांच्या संख्येवर आरोग्य विभागाला नियंत्रण मिळविण्यात यश असल्याचे दिसून येत आहे. आज २४ तासात ३ हजार ४४२ नवे बाधित आले असून एकूण संख्या १८ लाख ८६ हजार …

Read More »

पाकिस्तानी म्हणणे, ईडी मागे लावणे हे विकृत राजकारण; हे चालू देणार नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची विरोधकांना धोबी पछाड

मुंबईः विशेष प्रतिनिधी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी माओवादी म्हणणं, आणि केवळ हक्कभंग आणला म्हणून ईडी मागे लावणे हे विकृत राजकारण असून अशा पध्दतीचे राजकारण महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना देत तसेच कोणीही उठावं आम्हाला टपली मारून जावे या गोष्टीही …

Read More »

मुनगंटीवारांच्या प्रश्नावर अजित पवारांचे हे सूचक वक्तव्य मराठवाडा- विदर्भ वैधानिक महामंडळ करू मात्र वरिष्ठांची जबाबदारी घ्या

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे महत्वाचे वैधानिक विकास महामंडळ असलेल्या मराठवाडा-विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची मुदत संपलेली असून ते महामंडळ पुन्हा कधी तयार करणार अशी विचारणा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी करत कोण आहे तो झारीतील शुक्राचार्य जो प्रस्ताव रोखत असल्याचा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांना उपप्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यावर आम्ही महामंडळ …

Read More »

संसदेचे अधिवेशनच रद्द करणाऱ्या मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार ? आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भाजपा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष

मुंबईः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा ठेवल्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात बोंब ठोकत महाविकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हटले. अधिवेशनाच्या कालावधीवरून महाविकास आघाडी सरकारला हिणवणारा भाजपा हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनावर टीका करणारे हेच भाजपा नेते आता कोविडमुळे …

Read More »

याचिका न्यायालयात मात्र युक्तीवाद रंगला विधानसभेत फडणवीस विरूध्द अनिल परब रंगला सामना

मुंबईः विशेष प्रतिनिधी प्रस्तावित आरे तील कारशेड कांजूर मार्ग येथे स्थलांतरीत करण्यास प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच विरोध केला. तरीही राज्य सरकारने कारशेड तिकडेच हलविले. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मेट्रोचे काम चार वर्षे पुढे जाणार असल्याची बाब विरोधी पक्षनेते …

Read More »