Editor

संजय राऊत यांचा सवाल, जे पक्ष फोडले, त्याच पक्षांकडे मतं मागता इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन यांना पाठिंबा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना तर एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष …

Read More »

सचिन सावंत यांची टीका, खड्डे कोण बुजवणार यावरून गोंधळात गोंधळ एमसआरडीसीने मुंबईच्या उड्डाणपुलाची जबाबदारी महानगरपालिकेकडे ढकलली

मुंबईतील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून मुंबईकरांना होणारा त्रास हा महायुती सरकारच्या धोरण लकव्यातून होत असून निवडणुकीपूर्वी मतदानाचा रतीब मिळवण्यासाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले आहे हे दिसत येत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन न करता अविचाराने निवडणुकीपूर्वी लोकांना भुलवण्यासाठी घेतलेले निर्णय आता सरकारला पूर्ण करता येत नसल्याने तिकडमबाजीचा वापर …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता, पण ते आमच्या विचारांचे नाहीत निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचा अभ्यास सुरु

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत. निवडणुकीत त्यांना मतदान करण्याची विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना फोन केला. परंतु राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची विनंती अमान्य करत झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी राज्यपाल असलेल्या सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनात अटक करण्याचे आदेश दिल्याचा दाखला देत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीत महिलांचा सहभाग वाढवा महिलांच्या सहभागाने विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठणे शक्य

विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. शक्ती संवादाच्या माध्यमातून महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाबाबत चर्चा आणि विचार मंथन होत असून, यावर सकारात्मक विचार करून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय महिला आयोग व महाराष्ट्र राज्य महिला आयोग …

Read More »

आशिष शेलार यांचे आवाहन,“राज्य महोत्सवा” करिता प्रत्येक शासकीय विभागाने सहभागीता वाढवावी गणेशोत्सव सण पहिल्यांदाच सरकारकडून साजरा केला जातोय

गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” घोषित केले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी असते. आता ‘गणेशोत्सव’ प्रथमच राज्य शासन साजरा करत असल्याने हा उत्सव आता अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवावा. यासाठी प्रत्येक विभागांनी विविध उपक्रमातून आपली सहभागीता वाढवून आपापल्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, अशा सूचना सांस्कृतिक …

Read More »

न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणी एसआयटीची स्थापन तपास पथकात परभणीतील कोणताही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती नाही

परभणीतील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या चौकशी प्रकरणी अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना ८ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एसआयटीची घोषणा केली आहे. या विशेष तपास पथकात …

Read More »

कृत्रिम तलावाच्या विरोधात अष्टविनायक चौक परिसरातील नागरिकांमध्ये वाढता रोष गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कृत्रीम तलावाच्या अनुषंगाने वाढती नाराजी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ठाणे महापलिकने कृत्रिम तलावासह विविध व्यवस्था निंर्माण केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करताना ठाणे महापालिकेने ठाणे पूर्व भागातील अष्टविनायक चौकात तयार केलेल्या कृत्रिम तलावामुळे स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून, या तलावाऐवजी चेंदणी कोळीवाडा बंदरात असणाऱ्या विस्तृत …

Read More »

जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालकासोबत सहाय्यकची (क्लिनर) गरज नाही मोटार वाहन कायदा, १९८८ अन्वये मसुदा अधिसूचना जारी

जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत सहाय्यकची (क्लिनर ) गरज लागणार नाही, या बाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर २९ ऑगस्टपर्यंत सर्वसामान्यांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यातील जड मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या आंदोलनात चालकांसोबत सहाय्यक …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे शेतकऱ्यांना आवाहन, आत्महत्या करू नका; शेतकरी मेल्याचे सरकारला सोयर सुतक नाही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यास देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?

राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत. परंतु भाजपा युती सरकारला त्याचे काहीच सोयर सुतक नाही. राज्यातले सरकार फक्त गेंड्याच्या कातडीसारखे निगरगट्टच नाही तर आंधळे, मुके व बहिरे आहे. या सरकारला भ्रष्टाचारापुढे शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा युतीचे सरकार हे शेतकरीविरोधी आहे. अदानी, अंबानीच्या फाईलवर सह्या करणाऱ्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित …

Read More »

किरकोळ विक्रीला आळा घालण्यासाठी सेबीने दीर्घ मुदतीच्या डेरिव्हेटिव्ह्जसाठी पावले उचलणार सेबी प्रमुख तुहीन कांत पांडे यांची माहिती

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड अर्थात सेबी चे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी गुरुवारी बाजारात सौम्य गोंधळ निर्माण केला, जेव्हा त्यांनी सांगितले की बाजार नियामक इक्विटी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सचा कालावधी आणि परिपक्वता वाढवण्याची योजना आखत आहे. “हे सर्व सल्लामसलत करून केले जाईल, कोणत्या स्वरूपात, कसे, केव्हा… हो (एक सल्लामसलत पत्र असेल). …

Read More »