Editor

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात मंत्रालयासमोर निदर्शने सरकारच्या नावाने भोपळा फोड आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजप सरकारने रोजगार उपलब्ध करून देणार, उद्योग आणण्याच्या घोषणा दिल्या. मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारने दिलेल्या नसल्याच्या निदर्शनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी करत भोपळा फोड आंदोलन केले. त्यामुळे प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. दरवर्षी बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणार, …

Read More »

आदीवासी विद्यार्थी आश्रमशाळा असूनही मुलभूत सुविधांपासून वंचित जव्हार, डहाणू, शहापूर तालुक्यातील आश्रमशाळांकडे सरकारचे दुर्लक्ष

मुंबई : कविता वरे ग्रामीण व आदिवासी भागात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित व शासकीय आश्रमशाळा वसलेल्या आहेत. ह्या भागात आश्रमशाळा आदिवासी विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे मुख्य माध्यम आहे. ह्या भागातील सामान्य विद्यार्थी हे ह्या शाळांमधून शिक्षण घेताना दिसून येतात. मात्र राज्य शासनाचा ह्या आश्रमशाळांमधून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आजही खेळायला क्रिंडागणे, …

Read More »

आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळणार राज्य सरकारची नवी योजना

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील अर्थात ८५ हजार ते एक लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या नागरीकांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळावेत यासाठी नवी योजना राज्य सरकारकडून आणण्यात आली आहे. ही योजना धर्मादाय रूग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या दुर्बल घटकातील नागरीकांसाठी लागू होणार असल्याची माहिती विधि व न्याय विभागातील अधिकाऱ्यांनी …

Read More »

अखेर सोलापूर विद्यापीठाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर‘ यांचे नाव उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थिती लिंगायत आणि धनगर समजाची साम्यंजसाची

मुंबई : प्रतिनिधी सोलापूर विद्यापीठाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर‘ यांचे नाव देण्यावरून सोलापूर जिल्ह्यात लिंगायत समाज आणि धनगर समाज आमने-सामने आला. तसेच विद्यापीठाला नाव देण्यावरून आणि न देण्यावरून या दोन्ही समाजाच्या नागरीकांनी धरणे आणि मोर्चे काढले. मात्र अखेर अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून ३१ मे २०१८ …

Read More »

कर्नाटकात आकड्यांच्या खेळातील अतिविश्वास भाजपला नडला येदीयुरूप्पा यांचा दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

बंगरूळू-मुंबई : प्रतिनिधी नुकत्यात झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत कर्नाटकी जनतेने सत्तेचा सोपान कोणत्याही पक्षाच्या हाती न देता ती त्रिशंकु अवस्थेत ठेवली. तरीही भाजप नेते येदीयुरप्पा यांनी सत्तेच्या सारीपटावरील आकड्यांचा खेळ जिंकण्यासाठी अतिविश्वास दाखवित सरकार स्थापनेसाठी दावा केला. त्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांनी पूरक भूमिकाही घेतली. मात्र सत्तेच्या सारीपटावरील आकड्यांचा खेळ …

Read More »

कर्नाटकात लोकशाहीचा मोठा विजयाने देशातील राजकीय चित्र पालटणार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आशावाद

मुंबई : प्रतिनिधी लोकशाही धाब्यावर बसवून बळकावलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री पद भारतीय जनता पक्षाला अखेर सोडावे लागले असून, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी केलेल्या खटाटोपातून भाजपचा लोकशाहीविरोधी चेहरा समोर आला असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन देशभरातील राजकीय चित्र पालटणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी …

Read More »

देशातील महापुरूषांच्या आदर्श शिकवणूकीचा विद्यार्थ्यांना भीम आर्मी पाठ देणार भीम आर्मी जून महिन्यापासून महाराष्ट्रभर ५०० पाठशाळा सुरु करणार

मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांविषयी जागरूकता व देशाचा आदर्श नागरिक घडविण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर मुंबईसह महाराष्ट्रात जवळपास ५०० भीम पाठशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र  प्रमुख अशोकभाऊ कांबळे  यांनी दिली. १ जूनपासून किमान ५००  पाठशाळा महाराष्ट्रभर  सुरु करण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक शिक्षकांना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधण्यात येणार असल्याचे …

Read More »

फसव्या धोरणावर टीकेची झोड उठताच राज्य सरकारला आली जाग शासनाच्या ११ विभागातील भरती ही नियमित स्वरुपाचीच असल्याचा राज्य सरकारचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३६ हजारहून अधिक रिक्त असलेल्या जागा भरण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. परंतु त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही. तोच या सर्व रिक्त पदे पाच वर्षाच्या कंत्राटी पध्दतीवर भरण्याचा शासन निर्णय आदेश वित्त विभागाकडून जारी केला. राज्य सरकारच्या या फसव्या घोषणेवर सर्वच प्रसार …

Read More »

वीरशैव-लिंगायत समाजाच्या मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी महात्मा बसवेश्वर यांनी मानवतेला भेदभाव विरहीत आणि प्रगतीकडे जाणाऱ्या समाजाचा विचार दिला. वीरशैव लिंगायत समाज त्या विचारांचा पाईक आहे. त्यामुळे या समाजाच्या मागण्यांच्या सोडवणुकीबाबत शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. महात्मा बसवेश्वर यांच्या मंगळवेढा येथील प्रस्तावित स्मारकाचे कामही लवकरच सुरु केले जाईल, असेही …

Read More »

तांत्रिक कारणाने रखडलेले शिक्षकांचे दोन महिन्याचे पगार ऑफलाईन मिळणार राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई : प्रतिनिधी शालार्थ वेतन प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे पगार मिळण्यात सतत अडचणी येणाऱ्या शिक्षकांना राज्य सरकारने दिलासा दिला असून शिक्षकांचे मे ते जुलैपर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने शुक्रवारी याबाबतचा अध्यादेश जारी केला. या अध्यादेशानुसार शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर …

Read More »