औरंगाबादः प्रतिनिधी पोलिस यंत्रणा आदेशानुसार काम करते कोणाच्याही दबावाखाली नाही.असे स्पष्टीकरण पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत दिले. गेल्या काही महान्यांपूर्वी ए.टी.एस आणि सी.बी.आय. ने औरंगाबादेत संयुक्त कारवाई करत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन प्रकरणी काही संशयित अटक केले होते. यावर भाष्य करतांना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. मराठवाड्यात निवडणूकांच्या …
Read More »पवारांच्या त्या वक्तव्यामुळे सुजयचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा खुलासा
मुंबईः प्रतिनिधी अहमदनगरच्या जागेबाबत आघाडीचा कुठलाही निर्णय झाला नव्हता, अशा वेळी शरद पवारांनी आमचे वडील बाळासाहेब यांच्याबाबत केलेले विधान दुर्देवी होतं. याचं मला व्यक्तिशः वाईट वाटलं. आघाडीत सदस्य असताना आणि आमचे वडील हयात नसताना त्यावर टिपण्णी करणे पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभणारं नव्हतं. पवारांचे हे विधान आल्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय …
Read More »कबड्डी लीगसाठी १८० खेळाडूंची निवड आणि लिलाव प्रक्रिया इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगची लवकरच सुरुवात
मुंबईः प्रतिनिधी भारतीय कबड्डीला आंतरराष्ट्रीयस्तरावर लोकप्रियता आणि गेल्या तीन दशकांपासून पाहिलेल्या ऑलिम्पिक प्रवेशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग सुरू होणार आहे. या लीगची भव्य आणि दिव्य तयारी सध्या सुरू असून येत्या १५ ते १७ मार्चदरम्यान नवीन कबड्डी महासंघच्या (एनकेएफ) माध्यमातून कबड्डी प्रीमियर लीगसाठी फ्रेंचायझीजच्या संघांची अंतिम …
Read More »गतवेळच्या पराभवामागे मतदान यंत्रातील गडबड मतदान यंत्रावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे शरद पवार यांचे आवाहन
ठाणे : प्रतिनिधी गणेश नाईक यांनी नवी मुंबईला विकसीत केले आहे. त्यांनी अखंड काम केले आहे. तरीही त्यांचा मागील निवडणुकीमध्ये पराभव झाला. त्यामुळे त्यांचा पराभव हा मतदान यंत्रातील गडबडीमुळेच झाला असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मतदान प्रतिनिधीसह मतदान यंत्रावर बाराकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद …
Read More »सरकारी जाहीरातींमुळे आचार संहितेचा भंग होतोय जाब विचारून गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १० मार्च रोजी पासून लागू झालेली असतानाही राज्यभरातील एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोल पंपासहित इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकारी प्रचाराच्या जाहिराती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारला जाब विचारून संबधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी …
Read More »राज्यातील जागा वाटप आणि परिस्थितीचा काँग्रेस आढावा घेणार गुरूवारी गांधी भवन येथे होणार बैठक
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत असलेली परिस्थिती आणि संभावित विजयी जागांचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी सकाळपासून प्रदेश काँग्रेस कार्यकारणीची बैठक होणार आहे. ही बैठक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. ऐन लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेली …
Read More »लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा आमदार काँग्रेसच्या वाटेवर आमदार सतीश चव्हाण हाताच्या पंजावर लढविणार निवडणूक
औरंगाबाद : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून, मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण हे काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.अब्दुल सतार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच इतर उमेदवारांची नावे म्हणून जालना मतदारसंघातून डॉ. कल्याण काळे किंवा मी स्वतः यांच्यापैकी एक उमेदवार …
Read More »गांधीजींची सत्य व अहिंसा ही तत्वे मोदी पाळतात का? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल
मुंबईः प्रतिनिधी महात्मा गांधीजींच्या सत्य व अहिंसा या दोन तत्त्वाने मोदी वागत नाही तोपर्यंत तुम्हाला महात्मा गांधीजींच्या नावाने राजकारण करण्याचा अधिकार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दांडी यात्रेच्या स्मरण दिनानिमित्त महात्मा गांधीजींवर ब्लॉग …
Read More »रामदेव बाबांच्या व्यावसायिक भागीदाराकडे नांदेडच्या गुरूद्वाराची जबाबदारी स्थानिकांना डावलल्याने शीख बांधवांमध्ये नाराजी
मुंबईः प्रतिनिधी योगविद्येकडून व्यवसायात उतरलेले रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीतील व्यावसायिक भागीदार भुपेंद्रसिंह मिनहास यांची नियुक्ती नांदेडच्या गुरूद्वारा सचखंड बोर्डाच्या अध्यक्ष पदी राज्य सरकारने नुकतीच केली. ही नियुक्ती करताना स्थानिक शीख बांधवाना डावलत १७ सदस्यांचे असलेले बोर्ड ९ सदस्यांवर आणल्याचा आरोप गुरूद्वारा सचखंड बोर्डाचे माजी सचिव रणजितसिंह खंडासिंह कामठेकर यांनी …
Read More »सुजयच्या भाजप प्रवेशामागे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधील विखे-पाटील गटाचा आऱोप
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशामागे राष्ट्रवादी काँग्रेसची अडेलतट्टू भूमिका असल्याचा आरोप काँग्रेसमधील विखे-पाटील गटाने केला. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या संभावित आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा सुजय यांनी व्यक्त केली होती. मात्र सदरची जागा राष्ट्रवादी …
Read More »
Marathi e-Batmya