Editor

मंगलप्रभात लोढा यांचे आदेश, गणेशोत्सवात रात्री लोकल आणि मेट्रो सुरु ठेवा जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार

महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात साजरा होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून रात्री उशिरापर्यंत गणेशभक्त दर्शनासाठी येत असतात अशा वेळी गणेशभक्तांसाठी लोकल आणि मेट्रो सुरु ठेवण्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. महापालिकेच्या ग्रांट रोड येथील डी विभाग …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करा मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला ३० प्रकल्पांचा आढावा

पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण व्हायला हवेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्णत्वास यायला हवेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री वॉररुमधील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, पुण्यातील… त्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करा गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ का? मुजोर पोलिसांवर अट्रॉसिटी कलामाखाली गुन्हे दाखल करा.

राज्यातील पोलीस यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि पोलीस मात्र सर्वसामान्य जनतेवर कायद्याची दंडेलशाही दाखवत आहेत. पुण्यातील कोथरूड पोलीसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले,  त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली …

Read More »

केशव उपाध्ये यांचा सवाल. हिंदूंना बदनाम करण्याच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का ? पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांवरून केला सवाल

भगवा दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हचा कट कोर्टानेच उधळून लावल्यानंतर आता काँग्रेसी संस्कृतीने सनातन हिंदू धर्माच्या नावाने पुन्हा सुरू केलेला अपप्रचार म्हणजे महात्मा गांधींचा वारसा स्वतःच्या हाताने पुसून टाकण्याची तयारी असून, हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरविण्याच्या कटात सहभागी होऊन आपलाही मुखवटा उतरविल्याचे स्पष्ट झाले असल्याची टीका  प्रदेश …

Read More »

कोल्हापूर नांदनी मठाच्या हत्ती आणि मुंबईतील कबुतरखान्याबाबत मुख्यमंत्री घेणार बैठक तज्ञांच्या उपस्थितीत चर्चा करून मध्यम मार्ग काढणार

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर हे सर्व कबुतर खाने मुंबई महापालिकेने बंद केले. त्यामुळे प्राणी मित्रांमध्ये नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. तर कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्ती उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानीच्या गुजरातमधील वनतारा प्रकल्पात स्थलांतरीत करण्यात आले. मात्र तमाम कोल्हापूरकरांकडून वनतारात स्थलांतरीत करण्यात आलेला …

Read More »

राज ठाकरे यांचे आवाहन, मी आणि उद्धव एकत्र येऊ शकतो तर… निवडणूकीच्या कामाला लागा, युतीचा निर्णय मी घेणार

मराठीच्या मुद्यावरून एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांना एक संदेश देताना म्हणाले की,  त्यांनी अंतर्गत मतभेद विसरून आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या

साधारणतः वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत चार महिन्यात महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीबाबत निकाल दिला होता. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या याचिका फेटाळून लावत २०१८ च्या स्थितीनुसार ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचा निर्णयावर …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना फटकारत कारवाईला दिली स्थगिती भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केले होते वक्तव्य

२०२२ च्या भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात विरोधी पक्षनेते (एलओपी) राहुल गांधी यांच्याविरुद्ध लखनौ न्यायालयात प्रलंबित असलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्याला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राहुल गांधी म्हणाले होते की “अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याने भारतीय सैन्याच्या जवानांना मारहाण करत आहेत” – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी कारवायांवरून केंद्र  सरकारवर …

Read More »

झारखंडचे माजी मुख्यमंत्री तथा झारखंड मुक्ती मोर्चाचे सह-संस्थापक शिबू सोरेन यांचे निधन वयाच्या ८१ व्या वर्षी दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सह-संस्थापक शिबू सोरेन यांचे सोमवारी (४ ऑगस्ट २०२५) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. शिबू सोरेने यांचे वय ८१ वर्षे होते.  मागील काही दिवसांपासून शिबू सोरेन यांना किडनीशी संबधित आजारामुळे दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच आज शिबू …

Read More »

संजीव संन्याल यांची नोकरशाहीवर टीका करत म्हणाले, नागरिकांच्या बचतीत अडथळा ९० हजार कोटी रूपयांचा निधी अडकून पडली

अर्थशास्त्रज्ञ संजीव संन्याल यांनी भारताच्या आर्थिक प्रशासनात सततच्या अकार्यक्षमतेवर भाष्य केले आहे, त्यांनी कालबाह्य नोकरशाही प्रक्रियांवर टीका केली आहे ज्यामुळे नागरिकांच्या बचतींमध्ये अडथळा निर्माण होत आहे—अगदी डिजिटलाइज्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रणालींमध्येही. मोनिका हलन यांनी आयोजित केलेल्या ग्रोइंग इंडिया पॉडकास्टमध्ये, संजीव संन्याल यांनी खुलासा केला की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत …

Read More »