Editor

मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मतदारासंघाची घोषणा, कुठे पाडणार-कुठे उमेदवार देणार मराठवाड्यातील शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा, राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार पाडणार

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी भाजपाचा सुफडा साफ करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या विरोधात उमेदवार देत निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही केली होती. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीतील विजयी होण्यासाठी लागणाऱ्या मतांचे गणित जुळवित कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार कोणत्या मतदारसंघात सत्ताधाऱ्यांचे उमेदवार पाडणार याबाबतचे मतदारसंघ …

Read More »

अपघातात जखमी झालेले नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर नवाब मलिक यांच्यावर दुःखाचा डोंगर

यंदाची दिवाळीचा सण आणि विधानसभेच्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेसचे मानखुर्द शिवाजीनगर मधील उमेदवार नवाब मलिक यांना काही धार्जिण होताना दिसत नाही. आधीच काही काळ भाजपाच्या आरोपामुळे तुरुंगवास भोगाव लागलेल्या नवाब मलिक यांना कसेतरी जामीन मिळाला. त्यास काही महिन्यांचा अवधी लोटत नाही तोच मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवारीला भाजपाने विरोध सुरु करण्यास सुरुवात …

Read More »

प्रविण दरेकर यांची माहिती, १४ तारखेला मोदींची मुंबईत सभा विषारी सापाच्या तोंडून मतांच्या लाचारीसाठी हिरवे फुत्कार येताहेत

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर देत टिका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना पातळीच राहिलेली नाही. या राज्यात सगळ्यात विकृत मानसिकतेचा राजकीय पुढारी कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहे. आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून या …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, जिथे भाजपाची सत्ता आहे त्या राज्यांची अधोगती राज्यातील गुजरातधार्जिणे व केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिकेमुळेच महाराष्ट्राची अधोगती

भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात आल्यापासून मागील १० वर्षात महाराष्ट्राची पिछेहाट होत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप नव्हता तर वस्तुस्थिती आहे यावर केंद्रातील भाजपा सरकारनेच शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेच हा अहवाल दिला असून राज्यातील शिंदे भाजपाचे गुजरात धार्जिणे सरकार व केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिके मुळेच महाराष्ट्राची …

Read More »

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज अँजीओग्राफी आणि अँजीओल्पास्टी शस्त्रकियेनंतर आज डिस्जार्ज दिला

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी अशा सर्जरी पुण्यातील एका रुग्णालयात करण्यात आल्या. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजीओप्लास्टी नंतरची काळजी घेण्यासाठी आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी बाळासाहेबांना एका वेलनेस सेंटरमध्ये …

Read More »

प्रियंका गांधी-वड्रा यांचा आरोप, पंतप्रधान मोदींचे सरकार केवळ श्रीमंत उद्योपतींसाठी काम करतय तर राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती प्रियांका गांधी यांच्या रूपाने सर्वोत्तम खासदार वायनाडला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केरळ मधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर करण्यात आली. या जागेसाठी काँग्रेसकडून प्रियंका गांधी-वड्रा यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर भाजपाकडून नवीन हरिदास महिला उमेदवाराची घोषणा केली. पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी वायनाड येथे एका जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

श्रीनगरमध्ये बाजारात दहशतवाद्यांकडून हॅण्ड ग्रेनेडचा स्फोटः १० जण जखमी सुरक्षा दलाची तातडीने घटनास्थळी घाव

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील पर्यटक स्वागत केंद्राजवळ रविवारी भरलेल्या रविवारच्या बाजारात दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्याने किमान दहा जण जखमी झाले. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या एका सर्वोच्च पाकिस्तानी कमांडरला श्रीनगरच्या खानयार परिसरात सुरक्षा दलांनी ठार केल्याच्या एका दिवसानंतर, कडक सुरक्षा असलेल्या टुरिस्ट रिसेप्शन सेंटरजवळ (टीआरसी) हा हल्ला झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिली. या स्फोटामुळे दुकानदार …

Read More »

मुंबई उपनगरातील महिलेची धमकी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १० दिवसात राजीनामा द्या अन्यथा…. पोलिसांकडून महिलेला उल्हासनगरातून घेतले ताब्यात

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी एका २४ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले. महाराष्ट्र मुंबईतील उल्हासनगर भागातील फातिमा खान असे या महिलेचे नाव आहे. तिच्याकडे माहिती तंत्रज्ञानाची पदवी आहे, परंतु ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, असे मुंबई पोलिसांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली. उत्तर प्रदेशचे …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार यांच्यावर टीका, स्वतःचा वेगळा पक्ष काढून… खोचक टीकेवरून अजित पवार समर्थकांचा आव्हाडांना प्रत्युत्तर

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच या दोन्ही बाजूच्या आमदारांकडून प्रचाराच्या निमित्तानेही प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका-टीपण्णी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंब्रा-खळव्याचे आमदार तथा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी काल एका प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले …

Read More »

नाना पटोले यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घाला कापूस आयातीचा निर्णय व्यापाऱ्यांच्या फायद्याचा, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित पहावे

कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे …

Read More »