Editor

जीआयसीएचएफएल मधील हिस्सा विकण्याच्या विचार कंपनीने दिले संकेत मोठा गुंतवणूकदार आणण्याचे

जीआयसी GIC Re, भारतातील सर्वात मोठी पुनर्विमा कंपनी, जीआयसी GIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड जीआयसीएचएफएल (GICHFL) मधील तिची हिस्सेदारी विकण्याचा विचार सुरु असल्याचा विचार करत आहे, तसेच व्यवसाय वृध्दीसाठी खाजगी गुंतवणूकदार आणणे यासारख्या पर्यायांचा विचार करत आहे. पुनर्विमाकर्ता हा जीआयसीएचएफएल GICHFL मधील एकमेव सर्वात मोठा भागधारक आहे, ज्याचा हिस्सा १५.२६ टक्के …

Read More »

बुलेट ट्रेनचे कामकाज प्रगती पथावर लवकरच पूर्ण होण्याची शक्यता

देशातील पहिल्या अहमदाबाद ते मुंबई दरम्यानच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे बांधकाम अधिक वेगाने पुढे जात आहे. अलीकडील विमानातून या कामाची हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची प्रगती दिसत असून भारताच्या वाहतूक पायाभूत सुविधांसाठी प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करते. अधिकृतपणे मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर म्हणून ओळखला जाणारा बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारतातील रेल्वे प्रवासात क्रांती घडवून …

Read More »

एनटीपीसी अणु ऊर्जाची निर्मिती करणार उपकंपनीच्या माध्यमातून ऊर्जा निर्मितीचा विचार

देशातील सर्वात मोठी उर्जा कंपनी एनटीपीसी NTPC अणुऊर्जा निर्मिती करण्याचा विचार करत आहे. तसेच एनटीपीसी NTPC अणुऊर्जा कंपनी बनवण्याची योजना आखत आहे, जी एनटीपीसी NTPC ची १००% उपकंपनी असेल आणि अनेक राज्यांमध्ये अणु युनिट्स उभारण्यासाठी जागेंचा शोध घेत असल्याची माहिती पुढे येत आहे. एनटीपीसी NTPC अणुऊर्जेचा धडाका कार्बन-तटस्थ अर्थव्यवस्थेच्या दिशेने …

Read More »

TruAlt चा आयपीओ बाजारात येणार सेबीकडे कागदपत्रे सादर

TruAlt Bioenergy ने आपला प्रारंभिक सार्वजनिक ऑफर आयपीओ IPO लाँच करण्यासाठी भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Sebi) कडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DHRP) मसुदा दाखल केला आहे. बेंगळुरूस्थित TruAlt Bioenergy ही भारतातील आघाडीच्या जैवइंधन उत्पादकांपैकी एक आहे आणि परवडणाऱ्या वाहतुकीच्या (SATAT) योजनेअंतर्गत शाश्वत पर्यायी सीबीएच CBG च्या …

Read More »

एमपीएससीने मुलाखती पुढे ढकलल्या आता ३० ऑगस्टला होणार मुलाखती

एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २३ ऑगस्ट, २०१४ रोजी होणाऱ्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखती ३० ऑगस्ट, २०२४ रोजी होणार आहेत. महाराष्ट्र आयोगातर्फे संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ पदांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखतींचे आयोजन आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी, बेलापूर येथील कार्यालयात …

Read More »

उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील पूरबाधितांविषयी निर्णय घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील नदीच्या दोन्ही बाजूच्या पूर बाधितांविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा. मात्र, त्याचवेळी भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा येणार नाही, हे सुद्धा सुनिश्चित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कुळगाव-बदलापूर उल्हास येथील नदीवरील पूर नियंत्रण रेषेबाबत निगडित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

उद्योगांकरिता एमआयडीसीला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात विविध उद्योग समूह गुंतवणूक करीत आहेत. या उद्योगांना आवश्यक असणारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) मागणी विचारात घेऊन जलसंपदा विभागाने विविध प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्याचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. उद्योगांकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांमधून अतिरिक्त पाणी …

Read More »

महेश तपासे यांचा दावा, निवडणुकीआधी महायुती फुटणार…? भाजपाने अजित पवार यांना काळे झेंडे दाखवले

सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी भाजपाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडून महायुतीचे सरकार स्थापन केले असा थेट घणाघाती हल्ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपावर करत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने काढलेल्या जनसन्मान यात्रेत भाजपाने काळे झेंडे दाखविले. तर भाजपाचे …

Read More »

रामदास कदम म्हणाले, भाजपाचे मंत्री ‘निरुपयोगी’, भाजपाचा पलटवार उपमुख्यमंत्री फडणवीस, रविंद्र चव्हाण यांचा पलटवार

शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांना निरुपयोगी मंत्री असल्याची टीका केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांच्या टीकेला प्रत्तुत्तर देताना म्हणाले की, महायुतीच्या तत्त्वांशी सुसंगत आहे का, असा सवाल करत गेली ४० वर्षे मंत्री …

Read More »

नाना पटोले यांची टीका, जरांगे पाटलांचे… आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचाच अडथळा भाजपाला इक्बाल मिर्चीशी संबंध असलेला व्यक्ती चालतो मग नवाब मलिक का चालत नाही?

“मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचा अडथळा आहे.” या मनोज जरांगे पाटील यांच्या विधानात तथ्य आहे. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राणे आयोग नियुक्त करुन मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण त्या आरक्षणाविरोधात फडणवीसांच्या जवळचे लोकच कोर्टात गेले होते. मराठा आरक्षणप्रश्नी कोर्टात बाजू मांडू नका, असे फडणवीस …

Read More »