Editor

सीएससी चालकांना प्रती विमा अर्ज रु.१ पेक्षा जास्त रक्कम देऊ नये खरीप २०२४ साठी एक रुपयात पिक विमा योजना

राज्यात काही ठिकाणी काही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) केंद्र चालक हे विम्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रती अर्ज रुपये एक पेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत अशा प्रकारची घटना घडत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा सीएससी प्रमुख यांच्याकडे तक्रारी केल्यास त्याची दखल घेऊन …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पावसाळी अधिवेशनातच पेपर फुटीबाबत कायदा आणणार चालू अधिवेशनातच कायदा आणणार असल्याची जाहिर केले

स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटीसंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे. राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. पेपरफुटी व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्यात कायदा आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य राजेश टोपे, आशिष शेलार, …

Read More »

उदय सामंत यांचे आश्वासन, रेल्वे जागेवरील झोपडपट्ट्याच्या पुनर्वसनसाठी समिती अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करणार

रेल्वे जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येईल, त्यानंतर केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. याबाबत सदस्या मनीषा चौधरी यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित …

Read More »

अजित पवार यांचे आश्वासन, शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पुढील तीन महिन्यांत निर्णय विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिले उत्तर

राज्यातील निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यांच्या आत घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारच्या उपाययोजना काय? पवईच्या जयभीम नगरप्रकरणी राज्य सरकार गंभीर नाही, विधानसभा अध्यक्षांच्या आदेशांकडेही दुर्लक्ष

लोणवळा येथील भूशी धरण परिसरात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही काही पहिलीच घटना नाही, अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत आहेत परंतु अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था निर्माण केली आहे. पावसाळ्यात लोणावळ्याप्रमाणेच राज्याच्या इतर भागातही पर्यटक मोठया संख्येने भेट …

Read More »

निर्बंध असताना भारतीय कंपन्याचा रशियाशी व्यापारः परिणामांची काळजी करा अमेरिकी राजदूत एरिक गार्सेटी यांचा इशारा

रशियाविरुद्धच्या जागतिक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही भारतीय कंपनीला युरोप, अमेरिका आणि जगभरातील त्यांच्या जागतिक सहयोगी देशांसोबत व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना होणाऱ्या परिणामांची काळजी ठेवावी लागेल, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी म्हटले आहे. . “अमेरिका, डझनभर मित्र राष्ट्रांसह, या कल्पनेच्या विरोधात उभे आहे की क्रूर शक्तीने एक …

Read More »

आमिर खान आणि अमिताभ बच्चनने घेतले नवे लक्झरी घर किमान किंमत ९ कोटी

गतवर्षी लक्झरी रिअल इस्टेट डीलच्या विक्रमी संख्येनंतर, २०२४ मध्ये मुंबई प्रॉपर्टी मार्केटमध्ये सेलिब्रेटींकडून आकर्षित होत राहिले. २०२३ मध्ये, अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांसारख्या आघाडीच्या बॉलीवूड स्टार्सच्या समूहाने काही लक्झरी घरे विकत घेतली आहेत. यावर्षी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने मुंबई रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय …

Read More »

अपारंपारीक ऊर्जेतून १७ टक्के कार्बन उत्सर्जन टाळता येईल एनर्जी थिंक टॅक एम्बरचा अहवाल

एनर्जी थिंक टँक एम्बरच्या नवीन अहवालानुसार, २०३० पर्यंत भारताच्या जड उद्योगातून अपेक्षित कार्बन उत्सर्जनाच्या १७% टाळण्यात अपारंपारीक ऊर्जा निर्मिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, अशी अंदाज वर्तविण्यात आला आहे. कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम (CBAM) चे पालन करण्यासाठी भारत EU ब्लॉकशी वाटाघाटी करत असल्याने उत्सर्जन कमी करण्यासाठी हा अहवाल संभाव्य नजीकच्या आणि …

Read More »

मुंबईतील घरांची मागणी कमी असूनही किंमती चढ्या दरानेच नाईट फ्रॅकच्या अहवालातील माहिती

मुंबईत मागील काही वर्षात घरांच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. मात्र यातील अनेक घरे ही एक तर ती मध्यम आकाराची किंवा मोठ्या आकाराची असतात. तरीही या घरांच्या किंमती पाह्यल्या तर त्या जास्तच असल्याचे दिसून आले आहे. बरं या घरांच्या किंमती चढ्या जरी असल्या तरी घरांची मागणी कमी होत …

Read More »

लोकसभा उपाध्यक्ष पद सपाच्या अवधेश प्रसाद यांना द्या, तृणमूल काँग्रेसची मागणी केंद्र सरकारकडे विनंती केल्याची सूत्रांची माहिती

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्ष पदी भाजपाचे खासदार ओम बिर्ला यांची नियुक्ती सलग दुसऱ्यांदा केली. या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. मात्र अद्याप उपाध्यक्ष पद इंडिया आघाडीला देण्यात आले नाही. यापार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने रविवारी केंद्राकडे समाजवादी पक्षाचे फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद यांना लोकसभेचे उपसभापती बनवण्याची विनंती केल्याची …

Read More »