आसान लोन्स Aasaan Loans, किंवा AKME Fintrade India या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीने १९ जून रोजी आपला आयपीओ IPO गुंतवणूकदारांसाठी खुला केला. कंपनीला १३२ कोटी रुपये उभारायचे आहेत आणि २१ जून रोजी ती बोली बंद करेल. शेअर वाटप २४ जून रोजी रजिस्ट्रारद्वारे अंतिम केले जाण्याची अपेक्षा आहे. आयपीओसाठी अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांच्या …
Read More »आगामी अर्थसंकल्पात स्पेक्युलेटीव्ह उत्पन्नावर कराची शक्यता व्यावसायिक उत्पन्नावरून सट्टा उत्पन्न
सरकार फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) विभागातील किरकोळ सहभागाला परावृत्त करण्यासाठी विविध पर्यायांवर विचार करत आहे, ज्यात F&O ला ‘व्यावसायिक उत्पन्न’ वरून ‘सट्टा उत्पन्न’ कडे नेणे यासह केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये अपेक्षित असल्याचा मुद्दा एका अहवालाच्या आधारे सांगण्यात आले आहे. असा बदल पूर्ण वर्षाच्या अर्थसंकल्पात सादर केल्यास, F&O व्यवहारांना कराच्या रूपात …
Read More »“फ्लिपकार्ट” चा नवा ऑनलाईन बिझनेस “मिनिट्स” १५ मिनिटात ऑनलाईन पोहोचणार
वॉलमार्ट-समर्थित फ्लिपकार्ट जुलैच्या दुस-या आठवड्यापर्यंत ऑनलाईन बाजारात, ‘फ्लिपकार्ट मिनिट्स’ लाँच करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही वर्षांतील दोन पूर्वीच्या, कमी यशस्वी प्रयत्नांनंतर झटपट वाणिज्य उद्योगात प्रवेश करण्याचा फ्लिपकार्टचा हा तिसरा प्रयत्न आहे. “फ्लिपकार्ट मिनिट्ससह, ते १५-मिनिटांच्या डिलिव्हरीला लक्ष्य करत आहेत,” या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका स्त्रोताने खुलासा …
Read More »अखेर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर सुट्टीकालीन न्यायालयाचा निर्णय
दिल्लीतील एका न्यायालयाने गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता रद्द केलेल्या दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला. आज आधी राखून ठेवल्यानंतर राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायाधीश बिंदू यांनी हा आदेश दिला. हा आदेश दिल्यानंतर ईडीने न्यायालयाला कायदेशीर उपायांसाठी ४८ तासांचा अवधी देण्याची विनंती केली. मात्र, न्यायाधीशांनी आदेशाला …
Read More »या खरीप पिकांना मिळणाऱ्या किमान हमी भावात वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य किंमत मिळावी यासाठी विपणन हंगाम २०२४-२५ करिता सर्व अनिवार्य खरीप पिकांच्या किमान हमी भावात (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत, कारळे (₹९८३ प्रति क्विंटल), तीळ (₹६३२ प्रति क्विंटल), आणि तूर/अरहर (₹५५० प्रति क्विंटल) …
Read More »अनिल परब यांचा आरोप, मिंधे आणि भाजपाने १२ हजार मतदारांची नावे बाद केली पदवीधर मतदारसंघातील विरोधी उमेदवारांचा पराभव करण्यासाठी निवडणूक आयोगाची मदत
मुंबई, कोकणातील विधान परिषदेवर निवडूण जाणाऱ्या निवडणूकीत आता चांगलीच रंगत निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाने नोंदविलेली १२ हजार मते मिधे अर्थात शिंदे गटाने आणि भाजपाने बाद ठरविल्याचा खळबळजनक आरोप मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब यांनी आज शिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला. …
Read More »शेतकऱ्यांनी डीएपी खतास पर्यायी खते वापरावीत कृषी विभागाचे आवाहन
चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी (Di-Ammonium Phosphate) खतावरच अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. महाराष्ट्र हे मृद परिक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरिता अग्रेसर आहे. राज्यामध्ये सध्या पेरणीला सुरुवात झाली असून …
Read More »वाढवण बंदराला विरोध असतानाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंत्री संजय बनसोडे यांनी मानले आभार
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला शिवसेना उबाठा गटाने सातत्याने विरोध केला आहे. तर तसेच काँग्रेसनेही स्थानिकांच्या प्रश्नावरून वाढवण बंदराच्या उभारणीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या वाढवण बंदराच्या उभारणीला स्थानिकांसह राजकिय पक्षांचा विरोधही वाढत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढवण (जि. पालघर) बंदर उभारणी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »नाना पटोले यांची मागणी, भर पावसात पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची राहण्याची सोय करा MPSC ने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पदांसह सर्व रिक्त पदांची जाहिरात काढून पद भरती करावी
पोलीस विभागातील १७ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी तब्बल १७ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात होत असलेल्या या पोलीस भरतीसाठी आलेल्या मुला-मुलींच्या राहण्याची काहीही सोय नाही, त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. भरपावसात पोलीस भरती सुरु असून या भरतीसाठी आलेल्या मुलांना पावसात रस्त्याच्या कडेला, उड्डाण पुलाखाली …
Read More »राज्यातील महायुती सरकार ८ टक्के दराने २७ हजार कोटींचे कर्ज काढणार आगामी निवडणूका नजरेसमोर ठेवत अर्धवट प्रकल्पासाठी कर्ज पण विभागाचा विरोध
लोकसभा निवडणूकानंतर आता जवळपास विविध निवडणूकांचा सपाटाच राज्यात सुरु झाला आहे. त्यातच आगामी दोन-तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून मात्र विकासाचा बोलबाला करत केंद्रातील महाशक्ती सोबत गेले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत या तिन्ही नेत्यांच्या पक्षाला …
Read More »
Marathi e-Batmya