Breaking News

महात्मा बसवेश्वर महामंडळासह संत काशिबा गुरव महामंडळ कार्यान्वित

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित झाले आहे. या महामडळांमार्फत राज्यातील गुरव व लिंगायत समाजातील घटकांसाठी व्यापार, उद्योग, शेतीपूरक व्यवसाय तसेच व्यावसायिक व उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत. या महामंडळाच्या योजनांचा …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, उद्योगांच्या विस्तारासाठी कमी कालावधीत सर्व परवाने द्या

देशाची अर्थव्यवस्था वर्ष २०२८ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखला आहे. यामध्ये एक ट्रिलियन डॉलरचे योगदान देण्यासाठी महाराष्ट्राने कृती आराखडा तयार केला आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी उद्योग, कामगार विभागाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. नवीन उद्योगांच्या स्थापनेसह अस्तित्वातील उद्योगांच्या विस्तारासाठी लागणारे सर्व परवाने कमीत कमी वेळेत …

Read More »

रोहित पवार यांची ईडीकडून अद्यापही चौकशी सुरुच, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

देशासह राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने धाडसत्र राबविले. त्यानंतर ईडी अर्थात सक्तवसुली संचानालयाकडून आज चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले. त्यानुसार कर्जत जामखेडचे आमदार तथा शरद पवार …

Read More »

काँग्रेसचा सवाल, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नांवर पंतप्रधान एक शब्दही का बोलत नाहीत ?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा महाराष्ट्रात आले, पण राज्याला काहीच दिले नाही. पंतप्रधान मोदी प्रत्येक राज्यात तीन-चारवेळा जात आहेत पण जनतेला भेडसावत असलेल्या मुलभूत प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. देशात आज शेतकरी, कष्टकरी कठीण परिस्थितीत जगत आहे, बेरोजगार तरुण नोकरीची प्रतिक्षा करत आहेत, परंतु पंतप्रधान मोदी फक्त राम मंदिर या …

Read More »

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभासाठी २ लाखापेक्षा जास्त खेळाडू सज्ज

राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ’ स्पर्धा येत्या २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई शहरात आणि उपनगरात प्रथमच देशी खेळांना प्रोत्साहन …

Read More »

नाना पटोले यांची टीका, राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखण्याचे कृत्य सत्तेचा…

भारत जोडो यात्रेला ईशान्य भारतात प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. यात्रेला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष घाबरला असून या भितीतून भारत जोडो न्याय यात्रेवर भ्याड हल्ले करण्यात येत आहेत. आज राहुल गांधी आसाममधील मंदिरात दर्शन करण्यास जात असताना त्यांना मंदिरात जाऊ दिले नाही. मंदिरात जाण्यास आता भाजपाची परवानगी …

Read More »

अयोध्येतील राम मंदिर हे भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात

अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात राम लल्ला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असून भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे. समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण असल्यामुळे आपण सर्व राम ललाच्या दर्शनाला अयोध्येला जावूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात मुर्तीची प्रतिष्ठापना

मागील अनेक वर्षापासून भाजपाच्या जाहिरनाम्यावर असलेल्या बाबरी मस्जिदीची जागेवर राम मंदिराची उभारणी करण्याचे आश्वासन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण करत तमाम हिंदूत्ववादी मतदारांच्या मनात आश्वासनपूर्तीचा विश्वास सार्थ ठरविला. सकाळपासूनच अयोध्येतील हनुमान गढी, सीताराम मंदिरासह अनेक ऋषींच्या मंदिराचे पूजन केले. त्यानंतर जवळपास १२ वाजता राम मंदिरातील रामलल्लाच्या मुर्तीचे विधिवत पूजन …

Read More »

आसाममध्ये राहुल गांधी यांना मंदिर प्रवेश नाकारला

एकाबाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करोडो लाखो-रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या राम मंदिरात राम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सकाळपासून अयोध्येत शासकिय राजशिष्टाचाराला डावलून मग्न राहिले. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सध्या सुरु असलेल्या भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून पुढे सरकत आहे. परंतु आसाम नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री श्री शंकरदेव …

Read More »

भाजपा कार्यकर्त्ये आले राहुल गांधी यांना रोखण्यासाठी पण, घेऊन गेले फ्लाईंग किस

१४ जानेवारी रोजी मणिपूरहून निघालेली भारत जोडो न्याय यात्रा १८ जानेवारी रोजी आसाम राज्यात प्रवेशली. त्यानंतर आज पुढे मार्गक्रमण करताना सुनितपूर येथून पुढे जाताना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेला रोखण्यासाठी भाजपाचे काही कार्यकर्त्ये हाती भाजपाचे झेंडे आणि राम मंदिराची निशाणी असलेले झेंडे घेत राहुल गांधी ज्या …

Read More »