Breaking News

मराठा- कुणबी आरक्षणासाठीचा शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला अहवाल आज राज्य शासनास सादर करण्यात आला. विधानभवनाच्या मंत्रिमंडळ कक्षात हा अहवाल न्या. शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

संसद सुरक्षा प्रश्नी चर्चेची मागणी करणारे विरोधी पक्षाचे ७८ खासदार निलंबित

१३ डिसेंबर रोजी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकूण सहा तरूणांपैकी दोन तरूणांनी लोकसभेत उड्या टाकत धूर फवारणी केली. तर बाकीच्या चार जणांनी संसदेच्या आवारात घोषणा देत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संसद सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दोन दिवस आधी याप्रश्नी चर्चेची मागणी करणाऱ्या राज्यसभा आणि लोकसभेतील १५ विरोधी …

Read More »

सलिम कुत्ता प्रकरणी अंबादास दानवे, एकनाथ खडसेंचा गिरिष महाजनांवरून सरकारवर हल्लाबोल

मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणातील सहआरोपी सलिम कुत्ता हा पॅरोलवर असताना त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नाशिकमधील नेत्याकडून नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल करत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आरोप केला. त्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटत विधान परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सलिम कुत्ता याच्यासोबत भाजपाचे आमदार गिरिष महाजन यांचे नाव …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पलटवार…मोर्चा आम्ही काढला पण सेटलमंट करायला भाजपा कुठे होती सोबत

मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा वादग्रस्त उद्योगपती अदानी समुहाला दिली. ही निविदा फक्त अदानीला मिळावी यासाठी राज्य सरकारने काही नव्याने अटी घातल्या. तसेच अदानी समुहाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होण्यासाठीच या अटींचा समावेश करण्यात आल्यावरून आरोप-प्रत्यारोप फेरी झडत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

बांग्लादेशामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसानः मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली “ही” माहिती

संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात सदस्य मोहन मते यांनी प्रश्न उपस्थित केला होता. अब्दुल सत्तार म्हणाले की, संत्रा निर्यातदारांना बांग्लादेशाने आयात शुल्क वाढवल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांना …

Read More »

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास सरकारची मान्यता

मुंबई विद्यापीठात रिक्त पदांवर मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रा. वर्षा …

Read More »

अंबादास दानवे यांची ग्वाही, तरूणीला मारहाण प्रकरण… अधिवेशनात लावून धरणार

ठाणे येथे एमएसआरडीसी व्यवस्थापकाच्या मुलाने तरुणीला मारहाण करून तिच्या अंगावर जाणीवपूर्वक गाडी घातली, त्यामुळे त्याच्या विरोधात आज रात्रीपर्यंत कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अन्यथा हिवाळी अधिवेशनात हा विषय लावून धरणार असल्याचा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला. तसेच पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, .. नोकऱ्यांमधील आमचा अनुशेष अगोदर भरा

एकीकडे ओबीसी समाजातून जातींना काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतोय तर दुसरीकडे ओबीसीत घुसण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शिंदे समिती कडून खोटे कुणबी दाखले देण्यात येत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसी समाजातील बांधवांच राजकीय आरक्षण सुध्दा धोक्यात येईल. अगदी सरपंच सुद्धा कुणी होऊ शकणार नाही. ओबीसींना आरक्षणातून बाहेर …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, ….भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद आजही

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्ताकारणात अंतिम शब्द टाकणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्यातील खेळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या शर्यतीचे उद्घटन करताना शरद पवार यांनी जाहिररित्या इशारा दिला. मात्र तो इशारा नेमका त्यांचे पुतणे अजित पवार यांना की भाजपाच्या नेत्यांना …

Read More »

राज्यघटनेतील तरतूदीनुसार विधिमंडळाची रचना व कार्ये, कार्यपध्दती नेमकी काय

संसदीय लोकशाहीत नागरिक हा सर्वोच्चस्थानी असून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी संसद तसेच विधिमंडळाच्या सभागृहात कायदे, नियम, ध्येयधोरणे निश्चित केली जातात. नागरिकांनीही आपल्या हक्क व कर्तव्यांप्रती सदैव जागरुक असणे तितकेच महत्वाचे असल्याचे प्रतिपादन विधिमंडळाचे सचिव (2) विलास आठवले यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (2) विलास आठवले यांनी …

Read More »