Breaking News

पियुष गोयल यांची स्पष्टोक्ती, भारत दबावाखाली व्यापारी करारांवर स्वाक्षरी करत नाही युरोपियन युनियनशी सक्रिय संवाद साधत आहोत

भारत घाईघाईने किंवा दबावाखाली व्यापार करारांवर स्वाक्षरी करत नाही, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. शुक्रवारी जर्मनीमध्ये बर्लिन संवादात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की भारत केवळ त्याच्या दीर्घकालीन हितांशी जुळणारे व्यापार करार करेल. पुढे बोलताना पियुष गोयल म्हणाले की, आम्ही युरोपियन युनियनशी सक्रिय संवादात आहोत. आम्ही …

Read More »

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी नौकांचे उद्घाटन माझगाव डॉक येथे २७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रम

केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर २०२५ रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे खोल समुद्रातील दोन मासेमारी नौकांचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील समुद्री मत्स्य व्यवसायाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. खोल समुद्रातील मासेमारी नौका प्रकल्प पंतप्रधान मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत राबविण्यात आला …

Read More »

तेज प्रताप यादव यांचा निर्धार, परत जाण्यापेक्षा मृत्यू निवडेन लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत परत जाण्यास नकार

बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी शुक्रवारी राष्ट्रीय जनता दलात (राजद) परतण्याची कोणतीही शक्यता फेटाळून लावली आणि ते म्हणाले की ते त्यांचे वडील लालू प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील पक्षात “परत जाण्यापेक्षा मृत्यू निवडेन. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, जनशक्ती जनता दल (जेजेडी) चे प्रमुख असलेले तेजप्रताप यादव म्हणाले की, ते सत्तेने …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा विश्वास, नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूका सर्व रेकॉर्ड मोडेल जंगलराजला दूर ठेवण्यासाठी बिहार मतदान करेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२४ ऑक्टोबर २०२५) असे प्रतिपादन केले की “मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए” बिहार विधानसभा निवडणुकीत मागील सर्व निवडणूक विक्रम मोडेल, तसेच विरोधी भारत गटावर जोरदार टीकास्त्र सोडले, ज्याचे नेतृत्व “जामिनावर सुटलेले लोक” करत होते. पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहार आता गुंतवणुकीचे एक …

Read More »

राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, हवामान बदल संकटावर ‘नैसर्गिक शेती’ हाच उपाय राजभवन येथे नैसर्गिक शेती परिषदेत राज्यपाल बोलत होते

नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित आहे. ही शेतीपध्दत पाण्याचा वापर ५० टक्क्यांनी कमी करते आणि भूजलपातळी वाढवते. नैसर्गिक शेती हा हवामान बदलाच्या संकटावर उपाय असून या शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन चांगले येते. जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या रक्षणाबरोबरच पर्यावरण, प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य, पाणी आणि माती या तिन्हींचे रक्षण करण्याची …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महिला डॉक्टरच्या आत्महत्येने गृह विभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला पोलिसांच्या अनन्वीत छळाला कंटाळून आत्महत्या कारावी लागली ही घटना पोलीस विभागाला लाज आणणारी आहे. गृहविभागावर फडणवीस यांचे नियंत्रण नाही, फलटणची घटना गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटावी आणि तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन …

Read More »

साखरवाडी आणि कुंजीरवाडी गावांना केंद्र सरकारकडून निधी सातारा आणि पुणे जिल्ह्याला जैवविविधता संवर्धनासाठी निधी

भारताच्या समृद्ध जैविक वारशाचे संरक्षण आणि स्थानिक समुदायांना त्यांच्या योगदानाचे फायदे मिळवून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील जैवविविधता संवर्धनासाठी १ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी जारी केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी आणि पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी या गावांना विशेष महत्त्व देण्यात …

Read More »

छट पूजा स्थळांवर अपुऱ्या सुविधांबाबत पालिका अधिकाऱ्यांना विचारला जाब सुविधा उपलब्ध करण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले निर्देश

मुंबई परिसरात येत्या २७ आणि २८ ऑक्टोबर दरम्यान छट पूजा उत्सव होणार असून निश्चित केलेल्या पूजा स्थळांवर अपुऱ्या सुविधांबाबत मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असून त्वरित आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा दावा, नैसर्गिक शेती हीच भविष्यातील क्रांती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राज्यपाल देवव्रत यांच्या उपक्रमाला पाठिंबा

नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी क्रांती घडेल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन आपण सर्वांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याचा संकल्प करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राजभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या नैसर्गिक शेती परिषदेत एकनाथ शिंदे बोलत होते. या …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, बूथप्रमुखांचे एक लाख व्हाट्सअप ग्रुप पार्टी वॉररुमसोबत जोडलेले कार्यकर्त्यांशी संवाद व्हाट्सअप ग्रुपमधूनच, प्रत्येक जिल्ह्यात तीन नेत्यांची समिती

भाजपा बूथप्रमुखांचे एक लाख व्हाट्सअप ग्रुप पार्टीच्या वॉररुमसोबत जोडलेले आहेत. याबाबत ते सर्वजण अवगत आहेत. यामाध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोचवत असतो. पक्षामध्ये कार्यकर्त्यांसोबतचा संवाद याच व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होतो, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ग्रूपवर त्यावर आलेल्या कमेंट्स वाचून भूमिका ठरविली …

Read More »