मुंबई : प्रतिनिधी स्व. राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाचा कारकिर्दीनंतर डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी सकल महसूल उत्पन्न वाढ (जीडीपी) नोंदवली गेली, ज्यांच्या १० वर्षाच्या काळात भारताचा सरासरी विकास वाढीचा दर ७.५ टक्के राहिला त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धीक …
Read More »कोरोना : बऱ्याच दिवसानंतर बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक २१ हजार ६५६ नवे बाधित, २२ हजार ७८ बरे झाले तर ४०५ मृतकांची
मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसानंतर राज्यात बाधित रूग्णांपेक्षा बरे होवून ते ही आतापर्यत सर्वाधिक रूग्ण बरे होवून घरी गेले असून ही संख्या थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २२ हजार ७८ इतकी असून घरी जाणाऱ्यांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासात २१ हजार ६५६ बाधित …
Read More »एकाच दिवसात दोन मंत्र्यांना कोरोना ट्विटरवरबून दिली माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील अनेक राज्यमंत्री, मंत्री कोरोनाबाधित होत आहेत. त्यात आ एकदम दोन कॅबिनेट मंत्र्याचा समावेश झाला आहे. यात राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोघांचे कोरोना चाचणी अहवाल आज सकारात्मक आहे. यापैकी मुश्रीफ यांनी याबाबतची माहिती स्वत: ट्विटरवरून दिली. अहवाल सकारात्मक झाल्यानंतर या …
Read More »पुढील काही दिवसांत इंदू मिल येथे डॉ.आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी समारंभ राजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. त्यामुळे या स्मारकाच्या पायाभरणीचा समारंभ पुढील काही दिवसात सर्वांच्या सहकार्याने पार पाडणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. मात्र याचे राजकारण करून नका …
Read More »मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही जमावबंदी लागू ? लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात 'जमावबंदी आदेश' लागू करण्याचा निर्णय घ्या - अजित पवार
पुणे: प्रतिनिधी पुणे जिल्ह्यात ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा करुन प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली. विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »कोरोना: ३ लाखापार रूग्ण तर ८ लाख घरी गेले : मुंबई-ठाण्याची एकूण संख्या ४ लाखावर २४ हजार ६१९ नवे बाधित, १९ हजार ५२२ बरे तर ३९८ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सातत्याने वाढतच असून आज पुन्हा २४ हजार ६१९ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाख १ हजार ७५२ वर पोहोचली आहे. तर मागील २४ तासात १९ हजार ५२२ रूग्ण बरे …
Read More »अंतिम वर्षाचे परिक्षा फॉर्म भरण्यास ३ दिवसांची मुदतवाढ; बॅकलॉग परिक्षा २५ तारखेपासून अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल-उदय सामंत
मुंबई : प्रतिनिधी अंतिम वर्ष /अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी परिक्षा अर्ज भरला नाही अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून बँकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा २५ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. आज …
Read More »मुंबईत पोलिसांकडून पुन्हा लॉकडाऊन ; कलम १४४ लागू पोलिस प्रशासनाकडून अध्यादेश जारी
मुंबई: प्रतिनिधी शहरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढीस लागल्याने या संख्यावाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी मुंबईत पुन्हा एकदा एकापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येण्यावर बंदी घालत कलम १४४ लागू करण्यात आला आहे. तसेच बाजार, मंदीर आदीसह कोणत्याही परिसरात एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिस उपायुक्त शहाजी उपम यांनी …
Read More »कोविड-19 पार्श्वभूमीवर या ठिकाणी करणार १२०४ डॉक्टरांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत कोविड-19 रुग्णांची निकड लक्षात घेऊन संस्थानिहाय आणि विषयनिहाय बंधपत्रित उमेदवारांना सेवेसाठी नियुक्ती देण्यात येणार असून सध्या १ हजार २०४ बंधपत्रित उमेदवार यामुळे उपलब्ध होणार आहेत. काही विषयांमधील उमेदवार अधिक असून विषयनिहाय जागा कमी उपलब्ध आहेत अशा उमेदवारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या वरिष्ठ निवासी किंवा वैद्यकीय …
Read More »सरकारचा मोठा निर्णय : पोलिस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा बाजूला काढणार गृहमंत्री अनिल देशमुख ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी राज्यात पोलिसांच्या १२ हजार ५०० जागा भरण्यात येणार आहेत. मात्र या जागा भरताना मराठा समाजाला आरक्षणातर्गत येणाऱ्या १३ टक्के जागा वेगळ्या काढणार असून त्यातील कायदेशीर बाबी जागा भरून मराठा समाजातून त्या भरणार असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटरवरून दिली. आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून …
Read More »
Marathi e-Batmya