Breaking News

नव्या पर्यावरण कायद्याच्या मसुद्याचे पुर्नमुल्यांकन करा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना विनंती

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (environment impact assessment – ईआयए) अधिसूचनेच्या मसुद्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. या मसुद्याचे पुनर्मुल्यांकन करण्याची त्यांनी विनंती केली. सध्या अस्तित्त्वात असलेली अधिसूचना पॅरिस कराराशी जुळत नाही आणि आपल्या …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिले हे आश्वासन १० राज्यातील कोरोना उपाययोजनांची आढावा बैठक

मुंबई: प्रतिनिधी देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविलं तर देश जिंकेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार असल्याचे सांगत राज्यात दुसरी …

Read More »

कोरोना : आतापर्यंत २८ लाख चाचण्यापैकी ५ लाख ३५ हजार बाधित ११ हजार ८८ नवे बाधित, १० हजार १४ घरी तर २५६ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले …

Read More »

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रशासक किंवा यांच्या हस्ते करा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतुद करण्यात आली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी संबंधीत गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पण एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी एकाच गावात ध्वजारोहण करावे, इतर गावात स्वातंत्र्य सैनिक किंवा तंटामुक्ती समिती अध्यक्ष किंवा ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी यांनी …

Read More »

कोरोना: दोन दिवसात बरे होणारे ३ टक्क्याने वाढले तर आतापर्यंत १८ हजार मृत्यू ९ हजार १८१ नवे बाधित रूग्ण, ६७११ बरे झाले, २९३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या बरे होण्याच्या टक्केवारीत एकाने वाढ झाली तर मृत्यूदरात .१ टक्क्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. ७ ऑगस्ट २०२० रोजी बरे होण्याचा दर ६६.७५ टक्के होता. तर ८ तारखेला ६७.२६ टक्के, ९ ऑगस्ट रोजी ६८.२५ टक्के तर १० ऑगस्ट २०२० रोजी ६८.३३ इतक्यावर स्थिर राहीला आहे. …

Read More »

पंतप्रधान किसान योजनेतही बोगस शेतकरी एका सुजाण मुंबईकरांमुळे यावर प्रकाशझोत

मुंबई: राजू झनके तेलंगना राज्याच्या धर्तीवर देशातील शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारकडून आर्थिक मदत देण्यासाठी वर्षाला ६ हजार रूपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी जाहीर केली. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या निधीत भ्रष्टाचार होवू नये यासाठी ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्याची घोषणा केली. मात्र पंतप्रधान किसान सन्मान निधई योजनेतील …

Read More »

लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी निसर्ग वादळ आणि ५ ऑगस्टच्या पावसामुळे १५६५ कोटीहून अधिकचे नुकसान

मुंबई : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने आणि ५ ऑगस्टरोजी झालेल्या पावसामुळे राज्यात १ हजार ०६५ कोटी आणि ५०० कोटी असे मिळून १५६५ कोटी रूपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्याला केंद्र सरकारने जास्तीत जास्त मदत जाहीर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. देशात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

म्हाडा उपाध्यक्ष म्हैसकर यांची पुन्हा मंत्रालयात बदली अन्य तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची तेथून बदली करण्यात आली असून त्यांच्या महसूल व विभागापैकी वन विभागाचे प्रधान सचिव म्हणून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासह अन्य तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आज राज्य सरकारने केल्या. नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे …

Read More »

१२ ऑगस्टला ‘वंचित’कडून लॉकडाऊन विरोधात डफली बजाव वंचित आघाडी प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

पुणे : प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित …

Read More »

कोरोना : आज सर्वाधिक; घरी जाणारे- मृतक आणि होम क्लारंटाईनमध्ये राहणारे १२,२४८ नवे बाधित , १३,३४८ बरे होवून घरी तर ३९० मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज सर्वाधिक अर्थात १३ हजार ३४८ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ३ लाख ५१ हजार ७१० वर पोहोचली. तर १२ हजार २४८ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण रूग्ण संख्या ५ लाथख १५ हजार ३३२ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ५५८ …

Read More »