‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे भारतात …
Read More »यूएईचे राष्ट्राध्यक्ष दोन तासांच्या भारत भेटीवर पण पंतप्रधान मोदी स्वतः विमानतळावर प्रोटोकॉल तोडून गळाभेट आणि घनिष्ठ संबध असल्याचे दाखवले
यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान सुमारे दोन तासांच्या भेटीसाठी राष्ट्रीय राजधानीत दाखल झाले, यावेळी पंतप्रधान मोदींनी प्रोटोकॉल मोडून विमानतळावर त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेते एकमेकांना आपुलकीने मिठी मारताना दिसले, या कृतीने गेल्या काही वर्षांत भारत-यूएई संबंधांची ओळख बनलेल्या घनिष्ठ वैयक्तिक संबंधांना अधिक दृढ केले. ही भेट संक्षिप्त …
Read More »ब्रिक्स राष्ट्रांसाठी आरबीआयने दिला एकाच चलनाचा प्रस्ताव अमेरिकेचा मात्र ब्रिक्सच्या चलनाला विरोध
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने ब्रिक्स राष्ट्रांच्या अधिकृत डिजिटल चलनांना जोडून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पर्यटनाचे पेमेंट अधिक सुलभ करण्याचा प्रस्ताव दिला आहे, असे वृत्तसंस्था रॉयटर्सने या प्रकरणाशी संबंधित दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. वृत्तानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने -आरबीआय सरकारला हा प्रस्ताव २०२६ च्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अजेंड्यावर ठेवण्याची …
Read More »महिला शेतकऱ्यांसाठी २३ जानेवारी रोजी मुंबईत चर्चासत्राचे आयोजन कृषी विभाग आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम
महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतक-यांच्या विविध विषयाच्या अनुषंगाने २३ जानेवारी २०२६ रोजी चर्चा सत्र होणार आहे.या चर्चा सत्राचे उद्घाटन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य कृषी मंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे हॉल क्रमांक ४ येथे सकाळी १० वाजता …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, ओबीसी बहुजन व काँग्रेस आघाडी, जि.प. पंचायत समिती लढणार धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी सर्वच समाजाची फसवणूक करून फडणवीसांनी राज्यात जातीय संघर्ष पेटवला
प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे. ही एक वैचारिक आघाडी असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढू असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ओबीसी बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी …
Read More »कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला दिल्या शुभेच्छा
कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने “शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना”मधील परदेश भेटीसाठी रवाना झालेल्या पहिल्या गटातील शेतक-यांना कृषीमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सहभागी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून …
Read More »एकनाथ शिंदे यांची ग्वाही, मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होणार जिथे युतीमध्ये लढलो तिथे महायुतीचा महापौर
शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो, त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असेही सांगितले. मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, …
Read More »बॉलीवूडच्या टीकेनंतर संगीतकार ए आर रहमान यांचे वक्तव्य बदलले भारत देश प्रेरणादायी आणि घर असल्याचे केले वक्तव्य
संगीतकार ए आर रहमान यांनी एका मुलाखतीत केलेल्या टिप्पणींबद्दलच्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यांनी भारताप्रती आपली निष्ठा व्यक्त केली असून आपल्या शब्दांमागील हेतू स्पष्ट केला आहे. बॉलिवूडमधील कथित भेदभावावरून सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या या संगीतकाराने आपल्या प्रेरणा स्पष्ट करणारे एक निवेदन जारी केले. या निवेदनासोबत एका क्रिकेट सामन्यात सादर केलेल्या …
Read More »इराणमधील विरोधी निदर्शनात ५०० सुरक्षा रक्षकांसह ५ हजार लोकांचा मृत्यू १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच मोठी निदर्शने
इराणमधील एका प्रादेशिक अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, देशभरातील निदर्शनांमध्ये आतापर्यंत सुमारे ५०० सुरक्षा कर्मचाऱ्यांसह किमान ५,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी “दहशतवादी आणि सशस्त्र दंगलखोरांनी” निष्पाप नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, अधिकाऱ्याने सांगितले की हे आकडे पडताळले गेले आहेत आणि अंतिम मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाही. …
Read More »मुंबईच्या निवडणूक निकालात मुंबईचे राजकारण नेमके काय दिसले माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगलीच्या नजरेतून निवडणूकीचा निकाल
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) २०२५–२६ या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकीत मुंबईच्या राजकारणाचे स्पष्ट चित्र आकडेवारीतून समोर आले आहे. एकूण २२७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी आपली ताकद आजमावली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (भाजपा) सर्वाधिक प्रभावी ठरली. भाजपाने ८९ जागांवर विजय मिळवत एकूण …
Read More »
Marathi e-Batmya