Breaking News

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सरकारच्या आश्वासनाने कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे प्रलंबित मागण्यांवर अंलबजावणी करण्यास दाखविली सरकारची तयारी, पत्रकार परिषदेत दिली माहिती

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि आंदोलक व आयोजकांवरील एफआयआर मागे घेण्याच्या सरकारच्या आश्वासनानंतर, कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) दिल्लीच्या जंतर मंतरवरील आपले ४९ दिवसांचे आंदोलन अधिकृतपणे मागे घेतले आहे. सीजेपीचे प्रतिनिधी मंडळ आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा व जितेंद्र सिंह यांच्यासह सरकारच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर हा …

Read More »

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, “सुबह हो गयी मामू” राजीनाम्याच्या वृत्तानंतर अभिजीत दीपके म्हणाले की, येस वी हॅव डन इट

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर काही क्षणांतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी शनिवारी ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस.’ मधील प्रसिद्ध डॉयलॉग वापरत, “सुबह हो गई मामू.” अशी पहिली प्रतिक्रिया दिल्लीच्या जंतर मंतर येथील मंचावरून दिली. त्यांच्या या वक्तव्याचे …

Read More »

अखेर केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाः कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश राष्ट्रविरोधी शक्तींना रोखणे या उद्देशाने निर्णय घेतल्याचे सांगितले

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या तरुणांच्या मोठ्या आंदोलनाचा गैरफायदा घेण्यापासून “राष्ट्रविरोधी शक्तींना” रोखणे, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. मोदी सरकारमधील एखाद्या वरिष्ठ मंत्र्याने सततची रस्त्यावरील आंदोलने …

Read More »

बाबासाहेब पाटील यांची माहिती, शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि आधार प्रामाणित करण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. पुढे बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, या योजनेअंतर्गत राज्यातील …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टोक्ती, संकटातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. संकटांमध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी देण्याचा शब्द राज्यशासनाने पाळला असून देशातली ही सर्वात मोठी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुलींवर अत्याचार व लाठीचार्ज, देवाभाऊ म्हणवून घेणाऱ्याची कृती मात्र दुर्योधनाची विद्यार्थ्यांच्या मागण्या व समर्थनासाठी निघणाऱ्या मोर्चांना काँग्रेसचा पाठिंबा

आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या तरुण मुला-मुलींवर देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस अत्यंत राक्षसी पद्धतीने वागत आहेत. मुलांना ड्रग्जच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्यानंतर आता दादरमध्ये एका मुलीचा विनयभंग करण्यापर्यंत फडणविसांच्या पोलिसांची मजल गेली आहे. तरुण मुलांवर लाठीहल्ला केला जात आहे. विद्यार्थ्यांवर दडपशाही करणारे पोलीसराज महाराष्ट्राला कलंक असून स्वतःला …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? शाळेतल्या शिक्षकांवर कारवाई होते मग पोलिसांवर का कारवाई होत नाही

मला एक प्रश्न पडला आहे. जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पोलिसांना केला. नवी दिल्लीतील जंतरमंतर येथील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. …

Read More »

अभिनेते प्रकाश राज यांचा सवाल, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला उशीर का? सोनम वांगचुक राष्ट्राचा विवेक

अभिनेते प्रकाश राज यांनी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांचा उपवास सोडल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना, त्यांना ‘राष्ट्राचा विवेक’ असे संबोधले. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला होणाऱ्या विलंबावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘एक्स’ (X) वरील पोस्टमध्ये, प्रकाश राज यांनी सोनम वांगचुक यांच्या उपवास सोडण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आणि स्वतंत्रपणे …

Read More »

सौदी अरेबियाचे राजकुमार अब्दुल्ला यांचा लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये मृत्यू दारू, ड्रग्जच्या अतिसेवनानंतर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याची माहिती

लंडनच्या एका आलिशान हॉटेलमध्ये दारू, पार्टी ड्रग्स आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या घातक मिश्रणाचे सेवन केल्याने एका २९ वर्षीय सौदी राजकुमाराचा मृत्यू झाला, असे यूकेच्या शवपरीक्षण चौकशीत समोर आले आहे. ‘द सन’ आणि ‘डेली मिरर’ सारख्या अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अब्दुल्ला बिन फहद बिन अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज बिन जलावी अल …

Read More »

मुंबईत साध्या वेषातील पोलिसाकडून आंदोलक महिलेशी गैरवर्तनः पोलिसांकडून मात्र सारवासारव पुरुष आंदोलकाला रोखण्याच्या नादात म्हणे महिला मध्ये आली

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेला एक साध्या वेषातील पोलीसाने आंदोलनादरम्यान एका महिलेला अत्यंत चुकीच्या पद्धतीने पकडून रोखण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत असून यासंदर्भात विविध राजकिय पक्षाच्या नेत्यांकडून यासंदर्भात आवाज उठवताच पोलिसांनी मात्र दावा फेटाळून लावला. पोलिसांनी स्पष्ट केले की, तो पोलीस एका पुरुष आंदोलकाला रोखण्याचा प्रयत्न …

Read More »