Breaking News

मॅच फिक्सिंग – द नेशन ॲट स्टॅक चित्रपट प्रदर्शनास न्यायालयाचा हिरवा झेंडा मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण- चित्रपटाच्या प्रदर्शनाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणावर आधारित मॅच फिक्सिंग – द नेशन ॲट स्टॅक हा चित्रपट काल्पनिक असल्याचे स्पष्ट करून चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. हा चित्रपट काल्पनिक कथांवर आधारित आहे आणि आधीपासूनच बाजारात असलेल्या पुस्तकावर आधारित असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्याने न्यायालयाला सांगितले. तसेच चित्रपटाच्या सुरूवातीस …

Read More »

भारतात पुढील महिन्यात हायड्रोजन ट्रेन धावणार २०३० पर्यंत कार्बन शुन्य उत्सर्जनवर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न

भारत डिसेंबर २०२४मध्ये आपल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनचे अनावरण करणार आहे, जे पर्यावरणपूरक प्रवासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. डिझेल किंवा विजेशिवाय चालणारे, हे हायड्रोजन-चालित चमत्कार भारतीय रेल्वेसाठी एक प्रमुख मैलाचा दगड दर्शविते, २०३० पर्यंत “निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक” बनण्याच्या त्याच्या उद्दिष्टाशी संरेखित होते. मार्ग, वेग आणि विशेष वैशिष्ट्यांबद्दल आपल्याला …

Read More »

राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचारातून पंतप्रधान मोदी यांची एक्झिट मुंबईतल्या सभेत पंतप्रधान मोदीं यांची घोषणा, ही माझी शेवटची सभा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रवेश झाला. अद्याप चार-पाच दिवस विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला शिल्लक राहिलेले असतानाच भाजपा महायुतीच्या प्रचारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारातून एक्झिट घेत असल्याचे जाहिर केले. मुंबईत महायुतीच्या झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

आंदोलक विद्यार्थी ठामः उत्तर प्रदेश सरकारची एका दिवसात परिक्षा घेण्याची तयारी प्रांतीय परिक्षा एका दिवसात घेण्यास तयार

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी उमेदवारांनी प्रयागराजमध्ये केलेला निदर्शने गुरुवारी चौथ्या दिवशीही करण्यात आली. अखेर उत्तर प्रदेश राज्य सरकारने जाहीर केले की, ते प्रांतीय नागरी सेवा परीक्षा (पीसीएस) प्राथमिक परीक्षा एकाच वेळी एकाच दिवशी घेणार आहेत – मुख्य मागण्यांपैकी एक आंदोलक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्तक्षेपानंतर हे पाऊल …

Read More »

कॉ पानसरे हत्याप्रकरणी उच्च न्यायालयाची खंत, फरारी आरोपी वगळता तपासात काहीच नाही पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास- एटीएसचा उच्च न्यायालयात दावा

कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या सर्व पैलूंनी तपास केला असून त्यात नवे काहीच आढळले नसल्याचा दावा राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरूवारी उच्च न्यायालयात केला. त्यानंतरही, पानसरे कुटुंबीयांच्या तपासावर न्यायालयीन देखरेख ठेवण्याबाबत आग्रही भूमिकेनंतर प्रकरणातील दोन फरारी आरोपींचा मुद्दा वगळता तपास करण्यासारखे काहीच उरलेले नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. उच्च न्यायालयाच्या न्या. अजय …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचे आव्हान,… शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, दूध, कापसाच्या भावावर बोला महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचार सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधींनी पुनर्जन्म घेतला तरी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम पुन्हा लागू करु शकत नाहीत अशी दर्पोक्ती करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत ३७० कलमाचा काय संबंध? महागाई, बेरोजागारी प्रचंड वाढली आहे, महाराष्ट्रातील शेतकरी …

Read More »

मुंबईतील निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला प्रारंभ पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या सात विधानसभा मतदारसंघात सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) आजपासून टपाली मतदानाला प्रारंभ झाला. राज्यात एका टप्प्यात येत्या २० …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नांदेडच्या बसस्थानकाला भेट महिला प्रवाशांशी साधला संवाद महागाई आणि बेरोजगारी प्रश्न महिलांकडून उपस्थित

जनतेत मिसळणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे या गोष्टी आताच्या राजकिय वर्तुळात दुरापास्त झाले आहे. त्यातच १२ वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपाच्या नेत्यांना तर आता जनतेत मिसळून त्यांच्या व्यथा, त्यांचा त्रास जाणून घेण्याचे तर आता विसरूनच गेले असताना काँग्रेस नेते तर राहुल गांधी हे मात्र संधी मिळेल तेव्हा शेतकरी असो, सर्वसामान्य नागरिक …

Read More »

वरळी बीएमडब्ल्यू हिट अँण्ड रन प्रकरण : आरोपी मिहिर शहाच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने ठेवले बोट युक्तिवाद पूर्ण; निर्णय ठेवला राखून

एखाद्या व्यक्तीला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले किंवा पकडले गेल्यास (रंगेहात) त्याला अटकेच्या कारणांची माहिती देणे, ही निव्वळ एक औपचारिकता ठरते, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने गुरुवारी वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. याचिकाकर्त्याला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले गेले आहे. …

Read More »

कोणी मुर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यावी? शरद पवार यांचा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपावर शरद पवार यांची खोचक टीका

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर १८ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. हा राहिलेला कमी कालावधी पाहता प्रत्येक राजकिय पक्षाच्या नेत्याकडून प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यावर आरोपांचा धडका अद्याप सुरुच आहे. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे …

Read More »