अर्थविषयक

सप्टेंबरमध्ये राज्याचे नवे उद्योग धोरण अंमलात आणणार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासन सप्टेंबर, २०१८ मध्ये नवे उद्योग धोरण अंमलात आणणार असून याद्वारे उद्योग क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. स्मॉल मिडीयम एटंरप्राइजेस ( एसएमई) चेंबर ऑफ इंडियाच्यावतीने इकॉनॉमिक समिटमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून देसाई बोलत होते. या वेळी केंद्रीय नीती आयोगाचे …

Read More »

महाराष्ट्रातील १५ उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार गोदरेज, शापूरजी पालनजी, सुप्रीम पेट्रोकेम, कृष्णा यासह अनेक संस्थांचा समावेश

नवी दिल्ली : प्रतिनिधी बांधकाम, उत्पादन , सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात सुरक्षा विषयक उत्कृष्ट कार्य करणा-या महाराष्ट्रातील १५ उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने केंद्रीय उद्योग राज्यमंत्री  संतोष गंगवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेच्या वतीने देण्यात येणा-या सुरक्षा पुरस्काराचे वितरण आज नवी दिल्ली येथे करण्यात आले. देशातील ७२ व्यवस्थापनांना सुरक्षा विषयक केलेल्या उल्लेखनीय कामासाठी सुरक्षा पुरस्कार …

Read More »

७ लाख शिकाऊ उमेदवारांना उद्योजकांनी संधी द्यावी उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकाधिक उद्योगांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विविध उद्योगांमध्ये ॲप्रेंटिसशीप अर्थात शिकावू कामगारांचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि ७ लाख शिकावू उमेदवारांना संधी द्यावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना केल्या आहेत. तसेच ७ लाख शिकावू उमेदवारांना उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योगांनी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन ही त्यांनी केले. कौशल्य विकास व उद्योजकता …

Read More »

टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना सरकार प्रोत्साहन देणार उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे फ्रांसच्या शिष्टमंडळाला आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करण्याची भारताची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. भविष्यात अशा प्रकारचे काम करणाऱ्या कंपन्या राज्यात सक्रिय झाल्यास त्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे राज्य सरकारचे धोरण राहील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फ्रान्स येथील शिष्टमंडळास दिले. मोठ्या शहरात दिवसेंदिवस स्वयंचलित वाहनांची संख्या वाढत आहे. याचसोबत कालबाह्य झालेल्या …

Read More »

बिटकॉईन स्किम फसवणूक प्रकरणाची चौकशी ईडीकडे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची विधानसभेत माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेन बिटकॉईन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या आधारे पॉन्झी स्कीम सूरू करून गुंतवणूकदारांना आकर्षित व्याज देण्याचे अमिष दाखवले. या अमिषाला बळी पडून लाखो गुंतवणूकदारांनी कोटयावधीची गुंतवणूक करताच  ही स्किम बंद करून नागरिकांची फसवणूक केली. या प्रकरणी नांदेड आणि पुणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास …

Read More »

राज्याच्या तिजोरीत १५ हजार कोटींची तूट ३ लाख १ हजार कोटींचा खर्चाचा अर्थसंकल्प सादर

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासाचा आणि आर्थिक परिस्थितीचा आरसा दाखविणाऱ्या अर्थसंकल्पाचे वाचन करत ३ लाख १ हजार ३४२ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आज राज्याच्या विधिमंडळात सादर करण्यात आला. विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर तर विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी राज्याच्या तिजोरीत १५ हजार ३७४.९० कोटी रूपयांची …

Read More »

अर्थसंकल्पीय लाईव्ह अपडेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करताना....

*विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनांसाठी १ हजार ६८७ कोटी ७९ लक्ष रू. निधीची तरतूद *अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत आरोग्य सेवा, घरकुल, शासकीय वसतीगृहे, निवासी शाळा ह्यासाठी ९९४९. २२ कोटींची भरीव तरतूद *अकाष्ठ वनौपज व औषधी वनस्पतींचे संकलन, पॅकेजिंग, ब्रँडिंग करून विक्री केंद्र स्थापन करण्याचा शासनाचा मानस. …

Read More »

राज्यावर ४२ हजार कोटींनी कर्ज वाढले तर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर ३६ हजार रुपयांचे कर्ज

मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षी राज्यावर तीन लाख ७१ हजार ४७ कोटींचे कर्ज होते. यावर्षी या कर्जात ४१ हजार ४७ कोटींची वाढ झाली आहे. एकूण कर्जाचा आकडा हा अर्थसंकल्पाच्या आधीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावर ३६ हजार रूपयांचे कर्ज असल्याचे राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात नोंदविण्यात आले …

Read More »

जगापेक्षा महाराष्ट्राचा विकास दर जास्त अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जगातील १९३ देशांचा सध्याचा विकास दर हा ३ टक्के आहे. तसेच देशाचाही विकास दर कमी आहे. मात्र महाराष्ट्राचा यंदाचा विकास दर ७.३ टक्के इतका असून हा दर सध्याच्या काळात सर्वाधिक असल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. विधानसभेत अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी राज्याचा आर्थिक सर्व्हेक्षण …

Read More »

बिहार, मध्य प्रदेशपेक्षा महाराष्ट्राला मिळणार कमी निधी निधीतील सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेशला

मुंबई : प्रतिनिधी एक देश एक कर या घोषणेनुसार संपूर्ण देशभरात जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली. या कराच्या रूपाने केंद्राच्या तिजोरीत जमा होणाऱ्या रकमेचे वाटप लवकरच देशातील सर्व राज्यांना करण्यात येणार असून महाराष्ट्राच्या वाट्याला बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशपेक्षा कमी रक्कम येणार असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. जीएसटी करप्रणातील …

Read More »