मुंबई

खासदाराचे नेमके काम काय? जीव धोक्यात आल्याने मतदाराने लिहिले खासदारांना पत्र राहुल शेवाळे यांना पत्र पाठवित करून दिली जबाबदारीची जाणीव

देशाच्या धोरणाला दिशा मिळावी म्हणून निवडून दिलेले खासदार निवडल्यानंतर जनतेच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करतात परंतु आता निवडणूक जवळ आल्याने प्रसिद्धीसाठी गटारावर अनधिकृतरित्या उभ्या राहिलेल्या मंदिराची उभारणी करताहेत, हे बेकायदेशीर काम केल्याने जीव धोक्यात आलेल्या नागरिकांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांना अनावृत्त पत्र लिहिले असून ते सध्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईसाठी घेतले हे निर्णय मुंबईतील रस्ते प्रकल्पांना स्वा. सावरकर आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव तर जेजेला विद्यापाठीचा दर्जा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ११ हजार ३३२ कोटी रुपये खर्चाचा हा सागरी सेतू ९.६ किमीचा असा असून तो आठपदरी आहे. तसेच याला ७.५७ किमी …

Read More »

बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी झोपडीधारक, स्टॉलधारक यांची पात्रता निश्चित राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बीडीडी चाळ परिसरातील अनिवासी झोपडीधारक, स्टॉलधारक यांची पात्रता निश्चित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मुंबईतील वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग व शिवडी येथे एकूण २०७ चाळी आहेत. या चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये एकूण १५ हजार ५८४ भाडेकरूंचे पुनर्वसन …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन, वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकण पर्यटनाला चालना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत

मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर – दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी मडगाव ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर काल सायंकाळी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महा हब’ साकारणार ५०० कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी

राज्यातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महा हब’ ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज मंत्रालयात महा हब संदर्भातील बैठक पार पडली. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञान …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, … संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा राष्ट्रपित्याचा अपमान करणारी ‘गोडसेची औलाद’ सदारवर्तेवर कारवाई कधी करणार ?

मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या …

Read More »

भरदिवसा पुण्यात मुलीवर तरूणाचा कोयत्याने हल्ला सदाशिव पेठेतील घटना घडली, सुदैवाने तरूणीचे प्राण वाचले, दोन तरूणांनी हल्लेखोराला पकडले

काही दिवसांपूर्वी दर्शना पवार या एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या तरुणीची राजगडाच्या पायथ्याशी हत्येच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ही घटना काही दिवस उलटत नाही तोच पुण्यात अजून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील सदाशिव पेठ भागात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. तरुणीवर वार करत असताना तिथं उपस्थित असलेल्या …

Read More »

शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई पालिकेवर मोर्चा काढत केला राडा

मुंबई महापालिकेकडून काही भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. याविरोधात आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला. आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या एच पूर्व कार्यालयात पोहोचल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला मारहाण करत राडा केल्याचा प्रकार समोर आला …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव…

राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणातून सामाजिक उन्नतीकडे जाण्यावर भर दिला होता. आजच्या लोकार्पण सोहळ्यातून आपण त्याच दिशेने प्रयत्न करीत आहोत. मुंबई शहरामध्ये आपण २५० विद्यार्थिनी क्षमतेच्या वसतिगृहाचे लोकार्पण करीत आहोत. या वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, ठाणे ते बोरिवली अंतर अवघ्या दहा मिनिटांत…

केवळ टोलेजंग इमारतींमुळे शहराचा विकास होत नाही तर, शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी, विरंगुळ्यासाठी उद्याने, खेळासाठी मैदाने या महत्त्वाच्या बाबींची गरज आहे. त्यातूनच ठाणे शहरातील चित्र बदलते आहे. रस्ते मोठे झाले, शहराचे सौंदर्यीकरण झाले, शहराचा विकास झपाट्याने होत आहे. ठाणे –बोरिवली टनेलला मंजुरी दिली असून येत्या काही काळात ठाणे …

Read More »