अजित पवार हिंजवडीच्या सरपंचाला म्हणाले, आयटी पार्क चालले पुण्यातून…सगळं वाटुळं झालं सरपंच गणेश जांभुळकरांना सुनावत ते काम झालंच पाहिजे असा दमही दिला

पुणे शहराचा विकास करताना शरद पवार यांनी जाणिवपूर्वक आयटी पार्कला पुण्यापासून हाकेच्या अंतरावर हिंजवडी परिसरात जागा देत पुणे शहराला आयटी हब मध्ये परावर्तित केले. परंतु हिंजवडीबरोबर आजूबाजूच्या भागात शहरीकरण आणि लोकवस्ती वाढली. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील कामे मार्गी लावण्याचे आदेश पुण्याचे पालकमत्री अजित पवार यांनी प्रशासनाना दिले. त्याची पाहणी करण्यासाठी आजच सकाळीच अजित पवार कामे किती झाली, मार्गी लागली का याची पाहणी करण्यासाठी सकाळी ६ वाजताच हिंजवडी परिसरातून दौरा करत होते.

तसेच रस्त्यावर उतरून अजित पवार विविध ठिकाणांची पाहणी करत होते. यावेळी हिंजवडीच्या क्रोमा चौकातून त्यांनी दौऱ्याला सुरूवात केली. यावेळी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना अजित पवार यांनी चांगलंच सुणावल्याचं पाह्यला मिळालं.

यावेळी अजित पवार यांच्याकडे या परिसरातील मंदिर न पाडण्याबाबत आग्रह धरत होते. त्यावर अजित पवार म्हणाले की, धरणं बांधताना मंदिर जातातच, तुम्हाला जे सांगायचं आहे ते सांगा मी ऐकून घेतो, मी काय करायचे ते करतो. आपलं वाटोळं झालं. हिंजवडीचं सगळं आयटी पार्क पुण्यातून बाहेर जात आहे. तुम्हाला काही पडलेलं नाही. कशाला सकाळी सहाला आलो आहे. ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही असं सांगत चांगलंच खडसावलं.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *