Breaking News

जयंत पाटील यांचा दावा, पिपाणी चिन्हाचा आम्हाला फटका तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही

देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतपेटीच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा अभिप्राय जनतेने दिला अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांमध्ये आमची तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्हं होते. तर त्या चिन्हांशी काहीसे साम्य असलेल्या पिपाणी देखील चिन्हं होती. या दोन चिन्हांतील गोंधळाचा फटका आम्हाला बसला आहे. परिणामी, पिपाणीला दीड लाख मतं गेली असून साताऱ्याची सीट पडण्यास हे चिन्हंच कारणीभूत आहे. पिपाणीला दीड लाख मतं गेली आहेत. तर साताऱ्याची सीट ४५ हजारांनी पडली, यात ३७ हजार मतं पिपाणीला गेली आहेत अशी माहिती दिली.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, बारामती, बीड मधला माणूस उभा राहिला, त्याला बीएसपीपेक्षाही अधिक मतं मिळाली. आम्ही भाषण करायचो, तुतारी चिन्हं सांगायचो. पण लोकांमध्ये संभ्रम झाला आणि तुतारी समजून अनेकांनी पिपाणीवर बटन दाबले. याचा आम्हाला सर्वाधिक फटका बसला. मात्र, ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचार केल्याने महाविकास आघाडीला मोठं बळ मिळालं. ३२ जागा आम्हाला मिळतील अशी अपेक्षा होती, एक दोन जागा सोडल्या तर जवळपास आकडा आम्हाला मिळाला आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी आणि आमचे युवा अध्यक्ष आम्ही गेलो होतो. दरम्यान, आम्हाला अडीच जिल्ह्यांचा पक्ष म्हणून हिणवले जायचं, मात्र आज आम्ही ८ जागा निवडून आणल्या आहेत. तर भाजपाला ९ जागा मिळाल्या आहेत. तरीही आम्हीही त्यांना म्हणणार नाही की तो अडीच जिल्ह्यांचा पक्ष आहे असेही उपरोधिक पणे म्हणाले.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आमचे ८ खासदार राज्याचे प्रश्न ठामपणाने मांडतील. कांदा, कपाशी, ऊसाचा अथवा शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही लावून धरु. आता एक टप्पा झाला आहे. यात ८० टक्के स्ट्राइक रेट आम्ही दाखवलेला आहे. राज्यातले सरकार उखडून लावण्यासाठी आम्ही आमचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम उद्या जाहीर करु, अशी माहितीही यावेळी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्याबाबत जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी उद्विग्न होऊन असे उद्गार का काढलेत हे माहिती नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. दिल्लीत बसलेले लोकं त्यांचे भविष्य ठरवू शकतात. मात्र, महाराष्ट्रातली परिस्थिती, दोन पक्ष फोडल्यामुळे, सोबतच महागाई, बेकारी, जीएसटी यामुळे लोकं त्रस्त झाली होती. महाराष्ट्रातली कहाणी याच्याही पुढे आहे. राज्याच्या कारभाराला लोकं कंटाळली आहे. अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागल्या आहेत. लोकसभेसाठी देखील फडणवीस यांनी पूर्णपणे काम केलंय. मात्र आता तो त्यांचा तो निर्णय असल्याचे सांगत अधिक भाष्य करण्याचे टाळले.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यामुळे आमचा ८० टक्के स्ट्राईक रेट होता. आम्ही दोन जागा अधिक लढवल्या असत्या तर अधिक जागा मिळाल्या असत्या. १८० पेक्षा अधिक आमदार आमचे निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे विधानसभेला आता साडे तीन महिने आहेत. सुप्रिया सुळे यांना बारामतीत ४८ हजारांचा लीड मिळाला आहे. कालच निकाल लागला आहे. त्यामुळे लोकांच्या वेगळ्या भावना आहेत. अजित पवार गटासोबत गेलेले बरेचसे नेते, आमदार, मंत्री म्हणत आहेत, आम्हाला परत पवार साहेबांसोबत काम करायचं आहे. मात्र, यासंदर्भात निर्णय झालेला नाही. जे तिकडे गेले, त्यांच्या मानसिकतेत बदल होताना दिसतोय, असं काल संध्याकाळपासून दिसतंय, असेही यावेळी सांगितले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *