गांधीजींची सत्य व अहिंसा ही तत्वे मोदी पाळतात का? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी
महात्मा गांधीजींच्या सत्य व अहिंसा या दोन तत्त्वाने मोदी वागत नाही तोपर्यंत तुम्हाला महात्मा गांधीजींच्या नावाने राजकारण करण्याचा अधिकार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दांडी यात्रेच्या स्मरण दिनानिमित्त महात्मा गांधीजींवर ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगला उत्तर देताना नवाब मलिक यांनी महात्मा गांधीजींची सत्य आणि अहिंसा ही दोन तत्वे मोदी पाळतात का ? असा सवालही केला.
महात्मा गांधी यांच्यावर ब्लॉग लिहिताना मोदी यांनी कॉंग्रेसवर टिका केली आहे. आमचा एकच प्रश्न मोदींना आहे की, महात्मा गांधीजींच्या नावाने राजकारण करता परंतु त्यांच्या विचाराचे पालन किती करता आहात असा खोचक सवालही नवाब मलिक यांनी केला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *