राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून साडेसात हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कर्ज उपलब्ध होऊन प्रत्यक्ष कामे मार्गी लागल्यास राज्यात आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. राज्यात बांधकाम सुरू असलेले जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी …
Read More »उपमुख्यमंत्री पदाचा पदभार सुनेत्रा अजित पवार यांनी आज स्वीकारला अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना भावूक...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. त्या अगोदर सकाळी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह सिध्दीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक झाल्या. सिध्दीविनायक मंदिर आणि चैत्यभूमीवर गेल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जाऊन दादांच्या …
Read More »राज्य मंत्रिमंडळाचा निर्णयः तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादन–भूवाटप धोरणास मान्यता एमएमआर क्षेत्रात नियोजित शहरीकरण आणि गुंतवणुकीला गती
नवी मुंबईच्या शेजारी उभ्या राहणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी अर्थात अटलबिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतू (मुंबई पारबंदर प्रकल्प) प्रभाव क्षेत्रासाठी नियुक्त ‘नवनगर विकास प्राधिकरण’ तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन आणि भूवाटपाबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, शिवसेना (उबाठा) च्या भुमिकेप्रमाणे परभणीत काँग्रेसने वागायचे का? चंद्रपूर महापौर निवडणुकीबाबत निरीक्षकाकडून अहवाल मागवणार
चंद्रपुरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षाकडे ३१ सदस्य आहेत. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील पक्ष असल्याने काँग्रेसला पाठिंबा द्यायला हवा होता पण त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला तर एमआयएमने तटस्थ राहून भाजपला मदत केली. आमचा नवा मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक …
Read More »चंद्रपूरात भाजपाच्या महापौराला शिवसेना उबाठाचा पाठिंबा भाजपाशी अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना उबाठाने केली युती
राज्यात आणि देशात भाजपाच्या घंटा बडवणारे हिंदूत्ववादावरून आणि राजकिय हेवेदाव्यातून शिवसेना उबाठा आणि भाजपाची २५ वर्षाची युती तुटली. त्यानंतर भाजपा आणि शिवसेना उबाठा या दोघांमध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला. मात्र चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस पक्षातच सत्तेपूर्वीच दोन गटात संघर्ष सुरु झाला. त्यामुळे भाजपाने या संधीचा फायदा घेत थेट शिवसेना उबाठाशी आणि …
Read More »अजित पवार यांच्या प्लेन क्रॅशवरून रोहित पवार यांचा गौप्यस्फोट, विमान आधी गुजरातला गेलेले ऐनवेळी दोन्ही पायलटची अदला बदली, शेवटच्या काही सेंकद मुख्य पायलट शांत होता
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूच्या घटनेला आज तेरा दिवस झाले. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या जाहिर केल्या प्रमाणे आज पत्रकार परिषद घेत या विमान अपघाताचा घटनाक्रम सांगत अजित पवार यांना बारामतीला घेऊन येणारे विमान आधी गुजरातला गेले होते असे सांगत या …
Read More »राज ठाकरे यांचा मोहन भागवत यांना टोला, गुजरातमध्ये समरसतेचे धडे का नाही दिलेत? आजवर का कोणी असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत ?
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व …
Read More »आमदार रईस शेख यांची मागणी, रमजान पूर्वी भिवंडी महापौर निवडणूक लवकर घ्या महापौर निवडणुकीची तारीख कोकण विभागीय आयुक्तांकडून १८ फेब्रुवारी रोजी जाहिर
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका (बीएनसीएमसी) येथील महापौर निवडणुकीला होत असलेल्या दीर्घ विलंबाबाबत चिंता व्यक्त करत भिवंडी पूर्व मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी रमजानपूर्वी महापौर निवडणूक लवकर घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना आवाहन केले. आमदार रईस शेख पुढे बोलताना म्हणाले की, सतत होत असलेला विलंब राजकीय घोडेबाजाराला चालना …
Read More »जयंत पाटील म्हणाले, सांगलीच्या मातीने कधीही अविचारांना थरा दिला नाही मतदारांनी जिल्ह्याची ओळख अबाधित ठेवली
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तब्बल १८ ठिकाणी विजय मिळवला आहे. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने हा भव्य विजय मिळवल्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर जयंतराव पाटील यांचेच वर्चस्व कायम …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे आरएसएसचे चरित्र आता 'डी-बेस' आणि 'डी-डिफाइन'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सध्या आपल्या सोयीनुसार भूमिका बदलत असून, ज्या गोष्टींना पूर्वी तुच्छ मानले जात होते, त्यांनाच आता ‘कॅश इन’ करण्याचे काम संघ करत आहे. आरएसएसचे चरित्र आता ‘डी-बेस’ आणि ‘डी-डिफाइन’ असे झाले आहे, अशी सडकून टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे आयोजित …
Read More »
Marathi e-Batmya