राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतर्गत आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) च्या अर्थसहाय्याने सुमारे ३,५०० किलोमीटर लांबीचे रस्ते व पुलांच्या कामांसाठी ६,४२९ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या योजनेसाठी एआयआयबीकडून सुमारे ५०० दशलक्ष अमेरिकी …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन आणि रायगड विकास प्राधिकरणाच्या कार्य प्रणालीचा सर्वकष आढावा
रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन तसेच रायगड विकास प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. रायगड किल्ला विकास पर्यटन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार, कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार कांद्याला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट क्रांती महामोर्चा, पुणे नाशिक महामार्ग रोखला
शेतक-यांनी रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत आहे. कांद्याला प्रति किलो दोन रुपयेही दर मिळत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव व शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष व महाविकास संघर्ष करत राहील …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती ७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम स्वच्छ, हरित आणि सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प; एसटीचा ७८ वा वर्धापन दिन
महाराष्ट्राच्या जनमानसाशी अतूट नाळ जुळलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने ‘स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि बचत करणारी सक्षम एसटी’ घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात मंत्री प्रताप सरनाईक …
Read More »महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडून आणि महायुतीतून भाजपा-शिवसेनेने यांना दिली उमेदवारी विधान परिषद निवडणूकीसाठी दिली उमेदवारी
राज्य विधिमंडळाच्या रिक्त झालेल्या १७ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापले उमेदवार जाहिर केले. या निवडणूकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेंत निवडून गेलेल्या सदस्यांकडून मतदान करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदारांना आता भलताच भाव आला आहे. त्यातच राज्यातील अनेक भागातील जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांवर भाजपा, काँग्रेस, शिवसेनाओएफसी, महाराष्ट्रवादी …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, ८० लाख लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेतून बाद राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे द्योतक आहे, शासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती
राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना ई केव्हायसी न केल्याचे कारण देत अपात्र ठरवले आहे. ८० लाख लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनातून बाद करणे राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे द्योतक आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा ‘विकसित महाराष्ट्र’ अंतर्गत एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट
‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ पर्यंत एसटी महामंडळामध्ये सन २०२९ पर्यंत ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के; तर २०४७ पर्यंत एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे. या अनुषंगाने बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या …
Read More »सुनेत्रा अजित पवार यांची माहिती, अहिल्यादेवीचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक...
स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इत्यादींच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच हे शक्य झाले असे सांगतानाच आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज चौंडी येथे व्यक्त केल्या. अखंड …
Read More »एकनाथ शिंदे यांचे मत, अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज श्रीक्षेत्र चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती महोत्सव
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही आणि समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती महोत्सवात …
Read More »आमदार रईस शेख यांची मागणी, अल्पसंख्याक विभागातील ४०६ रिक्त पदे भरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी, बोलावली मुस्लीम आमदारांची बैठक, मुस्लीम समाजाशी संबधित १२ मागण्या केल्या सादर
राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागातील ४०६ पदे अनेक वर्षे रिक्त असून त्याचा या विभागाच्या योजना राबवण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत, मार्टी संस्थेच्या कामास गती द्यावी, भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव मार्गी लावावा आदी १२ मागण्या समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री व अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री सुनेत्रा पवार …
Read More »
Marathi e-Batmya