राजकारण

टाळेबंदी आणि निर्बंधांशिवाय सूचत नाही? सहनशक्ती संपत चाललीय….कडेलोट होईल किमान दोन लसीचे डोस घेतलेल्यांसाठी तरी लोकल सुरु करण्याबाबत राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी देशात आणि महाराष्ट्रात अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्याचे पालनही सर्वजण करत आहेत. मात्र हे निर्बंध कोणासाठी लागू आहेत? असा प्रश्न सध्या पडत असल्याचा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला करत टाळेबंदी आणि निर्बंधाच्या पलीकडे काही सूचत नाही असे दिसतय. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची …

Read More »

१० वी निकाल गोंधळानंतरही आता शालेय शिक्षण विभागाची ही वेबसाईट पडली बंद विद्यार्थी झाले हवालदिल ११ वी च्या प्रवेशासाठी अर्ज कसा भरायचा?

मुंबई: विशेष प्रतिनिधी नुकताच १० वी परिक्षेचा निकाल जाहिर झाल्यानंतर ज्या वेबसाईटवरून निकाल जाहिर ती वेबसाईटच ५ ते ६ तास बंद पडल्याने विद्यार्थी-पालकांना सोसाव्या लागलेल्या मनस्तापानंतर आता ११ वी प्रवेशासाठी सीईटीची परिक्षेसाठी अर्ज भरण्यासाठीची वेबसाईट कालपासून बंद पडल्याची नवी माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण …

Read More »

सुप्रिया सुळेंच्या पुढाकाराने राष्ट्रवादीची अजित पवारांना वाढदिनाची अशीही भेट कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी राष्ट्रवादीची 'राष्ट्रवादी जीवलग' योजना - खासदार सुप्रियाताई सुळे

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे अनेक मुलांना आपल्या पालकांना गमावावे लागले अशा ४५० मुलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही अभिनव योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज दिल्ली येथून फेसबुक लाईव्हवरुन करत आपले बंधु अजित पवार …

Read More »

आरक्षणप्रश्नी भाजपा नव्हे तर काँग्रेसचा नेता करतोय शिष्टाई आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी अशोक चव्हाणांचे नवी दिल्लीत भेटसत्र

नवी दिल्ली : प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर पुन्हा ओबीसींना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी घोषणा भाजपाच्या अनेक नेत्यांनी करत चक्काजाम आंदोलन करत आहे. मात्र याप्रश्नी भाजपाचा एकही नेता संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर दिल्लीत एकाही केंद्रीय मंत्र्याला किंवा भाजपाच्या वरिष्ठ नेत्याला भेटायला गेला नाही. मात्र …

Read More »

…अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करणार विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. दुकाने, खासगी कार्यालयं तसेच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी उपनगरीय लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप बंद आहे. परंतु कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने आठवड्याभरात निर्णय घ्यावा अन्यथा भाजपच्यावतीने …

Read More »

अजित पवारांचे आदेश, वीज तोडणी थांबवा, तोडलेल्या पुन्हा जोडा वीज बिलांच्या रिकन्सिलेशनसाठी राज्यस्तरीय समितीचा १५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करा-उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बिलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, या समितीने १५ ऑगस्टपर्यंतच्या कालमर्यादेत अहवाल सादर करावा. या समितीचा अहवाल येईपर्यंत ग्रामीण तथा स्थानिक व नागरी स्वराज्य संस्था पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांची …

Read More »

पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे, देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

पंढरपूर : प्रतिनिधी पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे, यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे, माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री …

Read More »

आपत्ती आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले हे आदेश अनपेक्षितरीत्या कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी सतर्क राहावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरीत्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. आज त्यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे …

Read More »

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण ८ शैक्षणिक वर्षातील सुमारे १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात येत आहेत. यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणे सुलभ होणार आहे. शिवाय यामुळे योग्य …

Read More »

प्रश्न करणाऱ्या ईडीलाच काँग्रेसने पाठविली प्रश्नावली तर त्या बारमालकांना अद्याप अटक का नाही? सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी बारमालकांकडून कथितरीत्या जमा केलेले पैसे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असतील तर मग लाच दिल्याच्या आरोपाखाली ईडीने अद्याप त्या बारमालकांना गजाआड का केले नाही, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत चार प्रश्ने ईडीला विचारले. गेले सात वर्षे मोदी सरकार अस्तित्वात …

Read More »