राजकारण

पोलीस शिपाई भरतीत एसईबीसी (SEBC) उमेदवारांना दिलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात पोलीस भरती २०१९ करीता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे, त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून गृह विभागाने  ४ जानेवारी २०२१ रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस शिपाई भरती २०१९ करीता ज्या …

Read More »

सरकारचा मोठा निर्णय: घर खरेदी करणाऱ्यांचे मुद्रांक शुल्क भरणे बिल्डरला बंधनकारक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रिमियमवर (अधिमुल्य) ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट देण्याचा तसेच जे प्रकल्प या सवलतीचा लाभ घेतील त्यांना ग्राहकांतर्फे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल असा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे बांधकाम प्रकल्पांना अधिमूल्यामध्ये जी सवलत …

Read More »

“औरंगाबाद नामकरणा” वरून मुख्यमंत्र्यांनी भाजपाला पकडले पेचात औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची अधिसूचना काढा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्राला पत्र

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून मागील काही दिवसांपासून भाजपा विरूध्द शिवसेना असा वाद रंगलेला असतानाच आता त्यात काँग्रेस, मनसे हे ही सामील झाले आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या रणनीतीला सडतोड उत्तर देण्यासाठी औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात …

Read More »

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला राज्यातील ‘आयटीआय’च्या अद्ययावतीकरणातून ‘जागतिक दर्जाच्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती

मुंबई : प्रतिनिधी जागतिक औद्योगिक क्षेत्राची गरज भागवू शकतील असे कुशल मनुष्यबळ महाराष्ट्रातून उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारण अकरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यापैकी ८८ टक्के निधी उद्योग क्षेत्राकडून तर राज्य शासनाकडून १२ टक्के निधी उपलब्ध करण्यात येणार …

Read More »

भाजपा २ ऱ्यांदा राम मंदिरासाठी घरोघरी जावून निधी गोळा करणार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी अयोध्या येथील राम मंदिर जन्मभूमी उभारणीसाठी १९९० साली भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली रथ यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळीही यात्रेच्या दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात घरोघरी, व्यापारी, दुकानदारांकडून निधी गोळा करण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा या भव्य मंदिरासाठी ट्रस्टतर्फे होणाऱ्या निधी संकलनात भारतीय जनता पार्टी सक्रीय सहभागी होणार …

Read More »

कायद्याच्या सशक्तीकरणासाठी महिला, वकील संघटनासोबत करणार चर्चा गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावी आणि गतिमान पद्धतीने कार्यवाही व्हावी या दृष्टीने प्रस्तावीत शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्यासाठी राज्यातील निमंत्रित महिला तसेच वकील संघटनांसोबत शक्ती कायद्यासंदर्भातील विधीमंडळ समितीच्या बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मुंबई, औरंगाबाद व …

Read More »

शिक्षकांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी शिक्षण विभागाने ही अट काढून टाकली रेशनकार्डची अट नसल्याबाबत शिक्षण विभागाचा खुलासा - शिक्षक भारतीचा यशस्वी पाठपुरावा

मुंबई : प्रतिनिधी वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी सुरुवातीला शिक्षण विभागाने रेशन कार्ड असण्याची अट शिक्षकांना बंधनकारक केले. मात्र याप्रश्नी शिक्षक भारती संघटनेने पाठपुरावा सातत्याने करून रेशनकार्डची अट काढून टाकण्यास राज्य सरकारला बाध्य केले. त्यानुसार अखेर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सदरची अट काढून टाकण्याचे आदेश दिल्याने अखेर शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपुर्ती …

Read More »

घर कामगार महिलांच्या कल्याणासाठी सूचना मागविणार घरकामगार महिलांना सामाजिक, आर्थिक सुरक्षा मिळणे आवश्यक - ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई : प्रतिनिधी असंघटित क्षेत्रामध्ये घर कामगार महिला मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या कल्याणासाठी घरकामगार कल्याण मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावे, अशी सूचना महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मांडली. यासंदर्भात सकारात्मक असल्याचे सांगून घर कामगार महिलांच्या कल्याणासाठी योजनांचा आराखडा तयार करण्यासाठी या क्षेत्रात …

Read More »

ईड्ब्ल्यूएस आरक्षणावरून विनायक मेटेंची पुन्हा पलटी मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर भाजपा नेत्यांकडून होणारे राजकारण दुर्दैवी!: सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणासंदर्भात एके ठिकाणी राज्य सरकार न्यायालयीन पातळीवर निकराने लढा देत असताना भाजपा नेते मात्र त्यावर हीन पातळीचे राजकारण करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपा नेते जाणीवपूर्वक आपल्या भूमिकांमध्ये एकवाक्यता ठेवत तर नाहीतच परंतु भूमिकामंध्ये सातत्याने बदल हा राजकीय स्वार्थ कसा साधता येईल या उद्देशाने केला जात …

Read More »

महिला व बालविकास विभागात कंत्राटी पदांवर अनाथांना विशेष प्राधान्य ॲड. यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांच्या संवेदनशीलतेमुळे अनाथांना दिलासा

मुंबई : प्रतिनिधी अनाथ उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाने काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात प्रशासनाला गतिमान कार्यवाहीचे …

Read More »