राजकारण

मोदी मत्सर हीच राज्याची प्राथमिकता आहे काय? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी राज्यात जनहितार्थ आम्ही सरकार सोबत आहोत पण दुर्दैवाने राज्य सरकार जे निर्णय घेतले जातात त्यामध्ये दोनच बाबीं वारंवार दिसतात. एक म्हणजे मोदी मत्सरात हीच प्राथमिकता मानून निर्णय होतात की काय? आणि केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठीच निर्णय होतात की काय? असे प्रश्न आम्हाला पडतात, अशा शब्दांत राज्यातील आघाडी सरकारवर …

Read More »

एसआरपीएफ जवानांसाठी आनंदाची बातमी: बदलीकरता आता १५ वर्षांची अट रद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर …

Read More »

टास्कफोर्स स्थापून सर्वोच्च न्यायालयाकडून मोदींच्या अपयशावर शिक्कामोर्तब कोरोना प्रतिबंधक लसीचे 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करावे : नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकार कोवीड परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहिमही फसली आहे. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस …

Read More »

मराठा आरक्षण निकालाच्या अभ्यास समितीचा अहवाल ३१ मे पर्यत येणार मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून …

Read More »

मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींच्या भेटीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने दिले राज्यपालांना निवेदन

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात राष्ट्रपती व केंद्र शासनाने पावले उचलावीत, यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व केंद्र शासनाला लिहिलेले पत्र देण्यासाठी शिष्टमंडळासह आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आमच्या भावना केंद्रापर्यंत पोचविण्याची विनंती यावेळी त्यांना केली आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती …

Read More »

भाजपची भाषा रामराज्याची आणि आता उत्तरप्रदेश – बिहार रामभरोसे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये भाजपाने रामराज्याची भाषा केली होती. परंतु दोन्ही राज्यांना भाजपाने रामभरोसे सोडले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये नदीमध्ये प्रेते टाकलेली आढळली आहेत. यमुना नदीत आणि हमिदपूरच्या नदीत तर गंगा नदीत ४० च्यावर प्रेते …

Read More »

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या मागे सीबीआय पाठोपाठ आता ईडीही राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडीचे सत्र सुरु

मुंबई: प्रतिनिधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपावरून न्यायालयाने दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आता ईडीनेही गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीकडून आता देशमुखांची पुढील चौकशी होणार आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेही गुन्हा दाखल …

Read More »

रोज सकाळी असत्याशी ‘सामना’! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांना टोला

मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर लिहिताना किंवा बोलताना एखादी व्यक्ती इतकी उथळपणा कसा करू शकते, तेही न्यायालयात झालेल्या सुनावणीचे ‘प्रोसेडिंग’ न वाचता आणि न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा एक भक्कम स्तंभ असताना असे सांगत रोज सकाळी असत्याशी ‘सामना’! दुर्लक्षितपणा की, ठरवून केलेली बदनामी? असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना …

Read More »

महासत्तेचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी दुसऱ्या देशासमोर हात पसरविण्याची वेळ आणली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे करण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा राहिला आहे. जगात भारत ताठ मानेने उभा राहिला तो पंडित नेहरूंपासून काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या विकासकामामुळे. परंतु दुर्दैवाने मागील सात वर्षात देशाच्या लौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. कोरोनाच्या महामारीत तर मोदी सरकारने देशातील जनतेला वाऱ्यावर …

Read More »

… नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा पंतप्रधानांना टोला

मुंबई: प्रतिनिधी कोरोना परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शव दाहिन्यांमध्ये जात नाहीय तर नदीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत …

Read More »