राजकारण

ड्रग्ज पार्टीतील कंभोजचा मेहुणा रिषभ सचदेवासह दोघांना ताब्यात घेऊन NCB ने का सोडले ? दिल्लीतून भाजप नेत्यांच्या दबावामुळे तिघांना NCB ने सोडले-नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत १३०० लोकांमधून ११ लोकांना NCB ने ताब्यात घेतले होते, मात्र त्यातील तीन जणांना NCB ने का सोडले असा सवाल करतानाच रिषभ सचदेवा हा भाजपाचे नेते मोहित कंभोज यांचा मेहुणा असल्याने सोडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी …

Read More »

मी बोलणार ना, पण पाहुण्यांना जावू तरी द्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

पुणे : प्रतिनिधी आज सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी संबधित कंपन्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर आणि उद्योगावर छापेमारी सुरुच ठेवली. यापार्श्वभूमीवर काही प्रसारमाध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी बोलणार ना, मला जी काही भूमिका मांडाणारच आहे. पण पहिल्यांदा सरकारी पाहुण्यांना जावू …

Read More »

पवार म्हणाले, “सत्ताधारी नेत्याने सांगितले जालियनवालाचा उल्लेख केल्याने पाहुणचार” भाजपातेर पक्षांनी एकत्र येवून लखीमपूरप्रश्नी विरोध करण्याची गरज

सोलापूर : प्रतिनिधी अजित पवार यांच्या घरी सरकारी पाहुणे आलेत. पण आपणाला सरकारी पाहुण्यांची कधी चिंता नसते. त्यामुळे त्याची चिंता करण्याचे कारण नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत त्या दिवशी मला दिल्लीत सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, तुम्ही जालियनवाला हत्याकांडाचा उल्लेख केलात. ते काही रूचले नाही …

Read More »

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत भाजपा नेत्याचा मेहुणा, तो सुटलाच कसा? समीर वानखेडे यांच्या कारवाईवर शंका; उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार भांडाफोड - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी क्रुझवरील कारवाईमध्ये जर १० लोकांना पकडलं होते मात्र त्यापैकी २ लोकांना सोडले असल्याचे समोर आले असून जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपाच्या एका नेत्याचा मेहुणा असून याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली. त्या दोन …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांना जुन २०२१ अखेर १७ तर त्यानंतर २८ टक्के महागाई भत्ता मिळणार २०२० चा महागाई भत्ता रोखीने देणार राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कोविड काळात रोखण्यात आलेला महागाई भत्ता १ ऑक्टोंबर २०२१ रोजी पासून रोखीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. विशेष म्हणजे १ जानेवारी २०२० ते १ जून २०२१ पर्यतचा महागाई भत्त्याचा दर १७ टक्के इतका निश्चिक करण्यात आला असून १ ऑक्टोंबरपासून रोखीने देण्यात येणार असल्याचा …

Read More »

प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करणार राज्यातील अमली पदार्थ विरोधी कारवाईचा आढावा-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई : प्रतिनिधी राज्यात अमली पदार्थांचे वाढते व्यवहार रोखण्यासाठी गृह विभागाने कठोर धोरण स्वीकारले असून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर ‘अमली पदार्थ विरोधी कक्ष निर्माण करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले. राज्यातील व विशेषता मुंबईतील अमली पदार्थ विरोधी कारवाईचा आढावा मंत्रालयात आयोजित …

Read More »

आमचे नेते घाबरणारे नाही… उलट सरकार अजून भक्कम होतेय राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबईः प्रतिनिधी ईडी, एनआयए आणि एनसीबीसारख्या सर्व यंत्रणांचा वापर महाराष्ट्रातील सरकार व नेत्यांविरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी केला जातोय. परंतु आमचे नेते घाबरणारे नाही उलट सरकार अजून भक्कम होतेय असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या …

Read More »

मलिकांचा भंडाफोड आणि अजित पवारांच्या नातेवाईकांवर आयकरची कारवाई हे तर खालच्या पातळीवरचे राजकारण-प्राप्तिकर विभागाच्या धाडीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे-कोल्हापूर-मुंबईः प्रतिनिधी एनसीबीने आर्यन खान, अब्बास मर्चंट यांच्यावर केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत याचा संबध भाजपाशी असल्याचा आरोप केला. यास काही तासांचा अवधी उलटत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर प्राप्तीकर खात्याने धाडी टाकल्याने राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चेला …

Read More »

लखीमपूर खेरीतील दुर्घटनेबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत खेदः घेतले हे महत्वाचे निर्णय सार्वजनिक तांदूळ, रूग्णालयाच्या खाटा वाढविणे यासह अनेक निर्णय घेतले

मुंबईः प्रतिनिधी उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेत शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने खेद व्यक्त करण्याचा ठराव केला. यावेळी मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मरण पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देखील वाहिली. यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभी निवेदन केले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अनुमोदन दिले. …

Read More »

काँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना जनतेचे चोख उत्तर जिल्हा परिषद निवडणुकीतील यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ !: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून ही तर सुरुवात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. निवडणूक …

Read More »