राजकारण

एसटी’ कर्मचाऱ्यांच्या पगारी होणार ५५० कोटी रूपयांचा निधी मंजूर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पैसा नसल्याने पगारी देणेही महामंडळाला शक्य होत नव्हते. यापार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून वित्तीय मदत मिळावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत होते. त्यास यश येत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाला (एसटी) ५५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा …

Read More »

नगरविकास सचिव परदेशी निघाले संयुक्त राष्ट्रसंघात तर पुणे जिल्हाधिकारी पंतप्रधान कार्यालयात दोन्ही अधिकाऱ्यांसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून पदमुक्तीचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महापालिका आयुक्त पदावर तडकाफडकी बदली करण्यात आलेले नगरविकास विभागाचे सचिव प्रविणसिंह परदेशी यांची संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या ग्लोबल कोर्डीनेटर या पदावर नियुक्ती केली. त्यामुळे त्यांना नगरविकास विभागाच्या सचिव पदावरून मुक्त करून संयुक्त राष्ट्रसंघात नियुक्तीसाठी परवानगी द्यावी अशी सूचना केंद्र सररकारने राज्याच्या मुख्य सचिवांना केली. तर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी …

Read More »

भाजपाची पुन्हा राज्यपालांकडे धाव…. बिहारसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या विरोधात तक्रार यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याऐवजी मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली

मुंबई: प्रतिनिधी धार्मिक स्थळे त्वरित उघडा, गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्वरित दिलासा द्या, सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दल भाजपाच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा राजभवनावर जात राज्य सरकारच्या विरोधात तक्रार केली. मात्र भाजपाच्या या शिष्टमंडळात यंदा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नव्हते. तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा …

Read More »

शिवसेनेने दिले एक कोटी मात्र राम मंदीराचे अध्यक्ष म्हणतात देणगी मिळाली नाही राम मंदीर उभारण्याआधीच न्यासाकडून कोट्यावधींच्या अफरातफरीला सुरुवात ?

मुंबई : प्रतिनिधी अनेक हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदीराच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी १ कोटी रूपयांची देणगी शिवसेनेच्यावतीने राम मंदीर न्यासास बँकेच्या माध्यमातून हस्तांतरीत करण्यात आली. मात्र न्यासाचे अध्यक्ष गोपालदास अशी देणगी दिली नसल्याचे सांगत असल्याने हा पैसा गेला कुठे असा सवाल शिवसेना नेते अनिल देसाई …

Read More »

खासदार विनायक राऊत, काय चावटपणा चालवलाय ? भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांची शिवसेनेवर टीका, वाचा त्यांच्याच भाषेत

एकीकडे तुम्ही नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करायचा, आणि दुसरीकडे शिवसेनेच्या दै.सामना मुखपत्रात खा.संजय राऊतांनी त्याच नाणार रीफायनरी कंपनीकडुन पैसे घेऊन पहिल्या पानावर जाहिराती छापायच्या, वर बिनधडक सांगायचे की हा वर्तमानपत्राच्या उत्पन्नाचा प्रश्न आहे. हे काय चाललंय ? तुम्ही जाहिराती घेऊन शिवसेनेचे उत्पन्न वाढवायचे, कोकणातील बेरोजगारांनी मात्र उपाशी मरायचे का ? …

Read More »

लॉकडाऊनकाळात सेलिब्रेटी पार्ट्या कोणाच्या आशिर्वादाने ? चौकशीची भाजपाचा नेते अॅड. आशिष शेलार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊन काळात आईच्या अंत्यसंस्कार जायला मिळत नसताना आत्महत्या केलेल्या बॉलीवूड स्टार सुशांत सिंग राजपूतप्रकरणी सेलिब्रेटी पार्ट्यांची चर्चा सातत्याने ऐकत मिळत आहेत. या पार्ट्या कोणाच्या आशिर्वादाने सुरू होत्या ? असा सवाल उपस्थित करत या पार्ट्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपा नेते अॅड.आशिष शेलार यांनी केली. लॉकडाऊन काळात अनेकांना …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटीव्ह व्टिटरवरून दिली माहिती, रूग्णालयात भर्ती होणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा नेते अमित शाह यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने ते लवकरच भर्ती होणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरवरून दिली. दिल्लीतील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांच्याकडून करण्यात येत …

Read More »

२ वर्षे ८ महिन्याचा महागाई भत्ता कर्मचाऱी आणि सेवानिवृत्तांना मिळणार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ११ हजार ५७० कर्मचाऱ्यांना देणार- मंत्री पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्त्याची रक्कम देण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती या प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना तत्कालीन परिस्थितीमुळे दिनांक १ जुलै २०१४ ते २२ …

Read More »

नरेंद्र मोदींविरोधात आचारसंहिता भंगाचा अहवाल दिला म्हणून या अधिकाऱ्याची उचलबांगडी बलदेव सिंह यांच्या विरोधातील चौकशी अद्याप अपूर्ण का? याचे उत्तर फडणविसांनी द्यावे

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमधून सातत्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केला होता. त्यातही लातूर आणि वर्धा येथील प्रचाराच्या भाषणांमध्ये पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांच्या नावाने त्यांनी मते मागितली होती. सदर प्रकार आचारसंहितेचा भंग असल्याने तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनी त्याचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिला होता. …

Read More »

पोलिसांकडून मार्चपासून ते आतापर्यंत १८ कोटींचा दंड २ लाख १८ हजार गुन्हे -गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख १८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात  लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजे २२ मार्च ते ३१ जूलै  पर्यंत  कलम १८८ नुसार २,१८,०५९  गुन्हे नोंद झाले असून ३२,४३३ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी १८ कोटी १ लाख३९ …

Read More »