राजकारण

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रशासक किंवा यांच्या हस्ते करा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतुद करण्यात आली आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी संबंधीत गावांमध्ये प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पण एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी येत्या स्वातंत्र्यदिनी एकाच गावात ध्वजारोहण करावे, इतर गावात स्वातंत्र्य सैनिक किंवा तंटामुक्ती समिती अध्यक्ष किंवा ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी यांनी …

Read More »

लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी निसर्ग वादळ आणि ५ ऑगस्टच्या पावसामुळे १५६५ कोटीहून अधिकचे नुकसान

मुंबई : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने आणि ५ ऑगस्टरोजी झालेल्या पावसामुळे राज्यात १ हजार ०६५ कोटी आणि ५०० कोटी असे मिळून १५६५ कोटी रूपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्याला केंद्र सरकारने जास्तीत जास्त मदत जाहीर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. देशात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

१२ ऑगस्टला ‘वंचित’कडून लॉकडाऊन विरोधात डफली बजाव वंचित आघाडी प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

पुणे : प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित …

Read More »

१९४२ च्या लढ्याला विरोध करणाऱ्या विचारधारेचे सरकार संविधानाला पायदळी तुडवतेय प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी आपल्या पूर्वजांनी प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. काँग्रेस पक्षाने या देशात लोकशाही रूजवली मात्र केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी १९४२ च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळ आली आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यासाठी सज्ज रहावे. असे आवाहन …

Read More »

महाराष्ट्र सप्ताहातील उत्कृष्ट स्टार्टअप्सना मिळणार १५ लाखपर्यंतची शासकीय कामे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नुकताच महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सपैकी उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली असून त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा ही संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे विविध शासकीय कामाचे कार्यादेश देण्यात येतील, अशी घोषणा कौशल्य विकास …

Read More »

मंत्र्यांनी पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना परंतु पदोन्नतीप्रश्नी सामाजिक न्याय विभाग गप्प का? महाविकास आघाडीत सुरुवातीला एकमत आता मात्र फक्त बघण्याचा कार्यक्रम

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील अनुसूचित जाती-जमातीसह सर्वच मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र याप्रश्नी राज्य सरकारची बाजू कोण मांडणार यासाठी अद्यापपर्यंत ज्येष्ठ विधिज्ञाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या प्रश्नी राज्याचे सामाजिक न्याय विभाग आणि त्या विभागाचे मंत्री धनंजय …

Read More »

मुख्यमंत्री महोदयांनी वाहतूक सेनेच्या मागणीची केंद्राकडे शिफारस करावी कर्जफेडीसाठी अतिरिक्त ४ महिन्याचा कालावधी वाढवून देण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारीने देशभरातील सर्वच उद्योगक्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला असून मार्चअखेर सरकारने टाळेबंदीचे कडक आदेश दिल्याने जवळपास सर्वच उद्योग व्यवसाय हे आजतागायत पूर्णत ठप्प आहेत. या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या उद्योगक्षेत्रांना काही अंशी दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कर्जफेडीसाठी अतिरिक्त ४ महिन्यांची (डिसेंबर २०२० पर्यंत) मुदतवाढ देण्याची …

Read More »

५० जणांचे बलिदान, स्मारक गैरव्यवहार प्रकरणी शांत राहणारे मेटेंचे आरोप म्हणजे कटाचा भाग? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या छुप्या विरोधकांनी कट-कारस्थाने सुरू केल्याचा संशय असून, विनायक मेटेंनी राज्य सरकारविरूद्ध सुरू केलेले धादांत खोट्या आरोपांचे सत्र हा त्याच कटाचा भाग असू शकतो, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडण्याबाबत राज्य सरकारने चांगली …

Read More »

पदवी- पदव्युत्तरची वेगळी शाखा असली तरी एससीच्या विद्यार्थ्यांना परदेशी स्कॉलरशीप परदेशी शिष्यवृत्तीस पात्र - मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी अनुसूचित जातीतील परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या शाखेतील पदवी त्याच शाखेचे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असाल तरच परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत होता. आता हा अडसर दूर केला आहे. आता परदेशी विद्यापीठात विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असेल आणि त्या विद्यार्थ्यांने आधी घेतलेले पदवी …

Read More »

सफेद चिप्पी’ महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित अकोला- खांडवा पर्यायी ब्रॉडगेज व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून निवडण्याचे राज्य वन्यजीव मंडळाकडून समर्थन

मुंबई : प्रतिनिधी या शासनासाठी विकास म्हणजे केवळ बांधकामे नसून वन, वन्यजीव आणि जंगल संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे राज्य वन्यजीव मंडळाच्या यापुढील बैठकीत सादर होणाऱ्या प्रस्तावासाठी यापुढे ड्रोन सर्व्हे बंधनकारक राहील, ज्या विभागाचा प्रस्ताव असेल त्या विभागाने त्या प्रकल्पाचे छायाचित्र सादर करणे, प्रकल्पाची वस्तुस्थितीजन्य माहिती देणे आणि त्याचा पर्यावरणीय परिणाम विशद …

Read More »