मुंबई : प्रतिनिधी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील तुळजापूर मध्ये राहोत किंवा कोल्हापूरमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आमच्याकडे आहे असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले. भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर आणि कोल्हापूरमध्ये निवडून येण्याचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाला …
Read More »विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! ठाकरे सरकारची कार्यपद्धती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार
मुंबई: प्रतिनिधी आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हलविण्यासंदर्भात ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय हा म्हणजे विकास प्रकल्प लटकवा, अटका आणि भटकवा अशी ठाकरे सरकारची कार्यपध्दती असल्याची टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज केली. मेट्रो कारशेड आरेतून कांजुरमार्ग येथे आणण्याबाबात निर्णय ज्या दिवशी ठाकरे सरकारने घेतला त्याच दिवशी आम्ही त्यातील …
Read More »राज्याच्या विकासात केंद्राचा हस्तक्षेप निंदनीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करतेय हे त्यांच्या कृतीतून दिसत असून हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करतेय हे निंदनीय आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रसरकारवर जोरदार हल्लाबोल करत टीका केली. मेट्रो कारशेडबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांवर …
Read More »कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्यासाठी भाजपचे कट कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी कांजूरमार्ग कारशेड हा मुंबईच्या दोन लाईनला जोडणारा प्रकल्प असून २० लाख लोकांना त्याचा फायदा मिळवून देणारा असल्याने हे काम कसं थांबवायचं यासाठी भाजपकडून कट कारस्थान सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्राच्या इंडस्ट्री मंत्रालय खात्याकडून राज्याच्या मुख्य …
Read More »त्या चार महिन्यातील वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णयाची शक्यता डॉ. नितीन राऊत यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सोमवारी ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांच्या एका …
Read More »पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच रिक्त जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर आचारसंहिता आजपासून लागू १ डिसेंबरला होणार मतदान
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत पदवीधर मतदारसंघातून ३ पैकीपैकी एक विधान परिषद सदस्य विजयी झाल्याने तर २ शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या पाच जागांसाठीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणूकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १ डिसेंबर २०२० रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेवर औरंगाबाद …
Read More »सुशांतसिंह प्रकरणी महिना झाला तरी ‘इतना सन्नाटा क्यूँ है भाई? सीबीआय बिहारच्या आदर्श आचारसंहितेचे पालन करत आहे का? काँग्रेसचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी निधनावर काही मंडळींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला पण ते कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत. मुंबई पोलीस व कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर शंका उपस्थित करत एम्सकडे ते तपासासाठी पाठवण्यात आले पण सुशांतने आत्महत्याच केल्याचा अहवाल एम्सच्या पॅनलनेही दिला. या अहवालाला …
Read More »कोरोनावर मात करून उपमुख्यमंत्री अजित पवार रुग्णालयातून घरी उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा... प्रार्थना करणाऱ्या सर्वांसह राज्यातील जनतेचे उपमुख्यमंत्र्यांनी मानले जाहीर आभार
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा… कार्यकर्त्यांची प्रार्थना तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे, अशा …
Read More »११ वीचे ऑनलाईन क्लासेस सुरु: जॉंईनींगसाठी या संकेतस्थळावर नाव नोंदवा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत असले तरी शाळा, कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस सुरु करण्यात आले. त्याचधर्तीवर आता ११ वीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेसच्या मार्फत शिक्षण सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या …
Read More »जळगांवकडे येताना एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात सर्वजण सुखरूप असल्याची खडसेंची माहिती
जळगांव : प्रतिनिधी भाजपातून नुकतेच राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगांवकडे येताना धरणगांव नजिक गाडीला अपघात झाला. मात्र सर्वजण सुखरूप असल्याची माहिती खडसे यांनीच ट्विटरवरून माहिती दिली. आज जळगांवकडे येताना धरणगांव येथे गाडीला किरकोळ स्वरूपात अपघात झाला. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने आणि ड्रायव्हरच्या प्रसंगावधनाने आम्ही …
Read More »
Marathi e-Batmya