राजकारण

मुख्यमंत्री आणि पवारांमुळे अखेर बिहार, प.बंगालचे कामगार पोहोचले घरी गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात अडकून पडलेल्या बिहार आणि पश्चिम बंगालच्या कामगारांना ठाम नकार देण्यात येत होता. मात्र यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्तीशं बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधल्याने या कामगारांना त्यांच्या मुळ घरी जाता आले. …

Read More »

परदेशी शिक्षण: मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्या आणि उत्पन्न वाढीचा विचार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जातीच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व गरजू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार आता परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी नामांकित विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा ६ लाख आहे. मात्र आता ही मर्यादा ८ लाख करण्यासह लाभार्थींची संख्या ७५ वरून २०० करणे विचाराधीन …

Read More »

संभावित संकटे-परिस्थितीवर शरद पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, मंत्र्यांची चर्चा लॉकडाऊनमधली आव्हाने, अर्थचक्र गतिमान करण्याला प्राधान्य

लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य …

Read More »

सोने जमा करणे ही जुनीच योजना – भाजपाच्या दोन पंतप्रधानांनी राबविली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

कराड : प्रतिनिधी कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व धार्मिक संस्थांकडून सोने परतीच्या बोलीवर कर्जरूपाने घ्यावे आणि त्या बदल्यात १ ते २% व्याज देखील द्यावे अशी सूचना मी काल केली होती. काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मी केलेली सूचना …

Read More »

खडसेंनी व्यक्त केली नाराजी फायदा झाला पंकजा मुंडे गटाला डमी उमेदवाराचे रमेश कराड झाले आमदार

मुंबई: विशेष प्रतिनिधी सत्तेत असताना खोट्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला आणि विधानसभे पाठोपाठ परिषदेच्या निवडणूकीत उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या नेत्यांविरोधात टिकेची तोफ डागली. मात्र त्यांच्या तोफ डागण्यामुळे पंकजा मुंडे यांच्या गटाचे रमेश कराड यांच्या गळ्यात अचानक अधिकृत उमेदवारीची माळ पडून ते बिनविरोध निवडूण आले. त्यामुळे …

Read More »

दोन पक्षाच्या त्या चौघांनी माघार घेतल्याने मुख्यमंत्र्यांसह ९ जण बिनविरोध शिवसेनेच्या शिष्टाईला यश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये या विषाणूची बाधा विधिमंडळ सदस्यांनाही होवू नये यासाठी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रयत्नाला यश आले. त्यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईमुळे भाजपाचे चार, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार विधान परिषदेतवर बिनविरोध …

Read More »

कोरोना लढ्यासाठी देवस्थानातील १ ट्रिलियन किंमतीचे सोने ताब्यात घ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. त्याचा फटका अनेकत कष्टकरी, कामगार आणि उद्योजकांना बसत असून सरकारची तिजोरीही रिकामी होत चालली आहे. यापार्श्वभूमीवर निधीची आवश्यकता भासणार असल्याने देशातील सर्व देवस्थानात पडून असलेले १ ट्रिलियन अर्थात ७६ लाख कोटी रूपये किंमतीचे …

Read More »

सरपंच, उपसरपंचांची निवड होणार, पण ग्रामसभा नाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतींच्या या बैठका घेण्यास संमती देण्यात आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात याव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला करत ग्रामसभा घेण्यास त्यांनी परवानगी नाकारत असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन …

Read More »

२० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजसोबत ४ था लॉकडाऊन १८ मेपासून सर्वस्तरातील घटकांचा विचार पॅकेजमध्ये केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील तीन टप्प्यात लॉकडाऊन होता. मात्र त्या सर्वांपेक्षा वेगळा आणि नवा लॉकडाऊनचा ४ था टप्पा सुरु होणार आहे. देशातील रस्त्यावर विक्री करणारा, फुटपाथवरचा ठेलेवाला यांच्यासह कुटीरोद्योग, लघु उद्योग, गृह उद्योग, छोटे-मोठे उद्योग यासह संपूर्ण उद्योग जगातासाठी २० लाख कोटी रूपयांचे विशेष आर्थिक पॅकेज भविष्यकाळात देशाला आत्मनिर्भर …

Read More »

कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा: फक्त अंतिम सत्राची परिक्षा होणार १५ जून पूर्वी परिक्षा तर १५ जुलैपूर्वी निकाल- कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परिक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृति आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहिर केला. कृषि पदविका (दोन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाव्दारे १०० टक्के गुण देऊन व्दितीय वर्षात प्रवेश देण्यात येईल. तर व्दितीय …

Read More »