नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला सत्ता स्थापन करण्याकरीता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शिकाँराचे सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्याने राजकिय वर्तुळात विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र या भेटीनंतर पवार यांनीच राज्यातील शेतकऱ्यांना …
Read More »वारकऱ्यांच्या वारसांना भाजपातर्फे ५ लाखाची मदत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा
पुणेः प्रतिनिधी पुण्याजवळ दिवे घाटात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन वारकऱ्यांच्या वारसांना भारतीय जनता पार्टी आपल्या आपदा ट्रस्टमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करेल तसेच गंभीर जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या शस्त्रक्रियेसह सर्व उपचारांचा खर्च भाजपातर्फे करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी जाहीर केले. चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकी वारीतील अपघातामध्ये जखमी …
Read More »अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह ८ जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गासाठी चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची सोडत जाहीर
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, विधी व न्याय विभागाचे सहसचिव द. सं. पाटील, ग्रामविकास विभागाचे उपसचिव आर. ए. नागरगोजे, विमुक्त जाती, …
Read More »शिकाँरासाठी स्वाभिमानी, समाजवादी आणि रिपाई-कवाडे पक्षाला विश्वासात घेणार काँग्रेस पक्षाध्यक्षा गांधींच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती
नवी दिल्लीः प्रतिनिधी महाराष्ट्रातील राजकिय परिस्थितीची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संबधित चर्चा झाली असून या दोन्ही पक्षांच्या आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शेतकरी स्वाभिमानी पक्ष, समाजवादी पार्टी रिपाई-कवाडे गट यांना पुढील रणनीतीच्या अनुषंगाने विश्वासात घेतले जाणार असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याबाबतची भूमिका …
Read More »नवाब मलिक म्हणतात राऊतांना, ही तर आता प्रेमाची सुरुवात शिवसेनेच्या राऊतांच्या शेर ला राष्ट्रवादीच्या नवाब यांचा मीर च्या शायरीने उत्तर
मुंबईः प्रतिनिधी शिकाँरा आघाडीखालील सरकारच्या स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाटाघाटी सुरु आहेत. या आघाडीसाठी वातावरण निर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून ट्टिटरवरून शेर-शायरी करत आहेत. मात्र राऊतांच्या शायरीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पहिल्यांदाच प्रतित्तुर देत ही तर प्रेमाची सुरुवात असून …
Read More »राहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल खरेदी प्रकरणातून खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जनतेला सत्य कळलं आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी राहुल गांधींनी नरेंद्र मोदीजींची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी देशातील जनतेची जाहीर माफी …
Read More »शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची लवकरच दिल्लीवारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. शिवसेना सरकारला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची प्राथमिक तयारी झालेली असून अंतिम बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे लवकरच काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला जाणार असल्याचे शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्याच्या सत्ताकारणापासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय मार्फत चौकशीचे दिले आदेश काँग्रेस नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा माहिती
मुंबई: प्रतिनिधी राफेल प्रकरणात यशवंत सिन्हा, प्रशांत भूषण आणि अरुण शौरी या नेत्यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली असून त्यासंदर्भात पूर्ण निकालाचे वाचन न करता मोदी सरकारला पुन्हा एकदा क्लीन चीट दिल्याचे चित्र उभा केले जात आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तपशिलात जाऊन वाचन केल्यास मोदी …
Read More »सर्वाधिक जागा आणि मते भाजपाला तर दुसऱ्या नंबरवर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत सर्वात जास्त अर्थात १ कोटी ४२ लाख मते भाजपाला मिळाली आहेत. तर सर्वात जास्त १०५ आमदार निवडूण आले असून १४ अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला असल्याने ११९ आमदारांच्याशिवाय राज्यात सरकार स्थापन होवू शकत नसल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच राज्यात भाजपानंतर सर्वात …
Read More »पंचतारांकित हॉटेलमध्ये काँग्रेसची शिवसेनेबरोबर सदिच्छा भेट उध्दव ठाकरेंच्या भेटीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात, चव्हाण, ठाकरे आदी नेते
मुंबईः प्रतिनिधी शिकाँरा महाआघाडीच्यावतीने राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विशेषतः मंगळवारी काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर आज बुधवारी शिवसेनेशी पुढील चर्चा करण्यासाठी नरिमन पाँईट येथील हॉटेल ट्रायडंट येथे जावून काँग्रेस नेत्यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. तब्बल दोन …
Read More »
Marathi e-Batmya