राजकारण

रामदेव बाबांच्या व्यावसायिक भागीदाराकडे नांदेडच्या गुरूद्वाराची जबाबदारी स्थानिकांना डावलल्याने शीख बांधवांमध्ये नाराजी

मुंबईः प्रतिनिधी योगविद्येकडून व्यवसायात उतरलेले रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीतील व्यावसायिक भागीदार भुपेंद्रसिंह मिनहास यांची नियुक्ती नांदेडच्या गुरूद्वारा सचखंड बोर्डाच्या अध्यक्ष पदी राज्य सरकारने नुकतीच केली. ही नियुक्ती करताना स्थानिक शीख बांधवाना डावलत १७ सदस्यांचे असलेले बोर्ड ९ सदस्यांवर आणल्याचा आरोप गुरूद्वारा सचखंड बोर्डाचे माजी सचिव रणजितसिंह खंडासिंह कामठेकर यांनी …

Read More »

सुजयच्या भाजप प्रवेशामागे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधील विखे-पाटील गटाचा आऱोप

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशामागे राष्ट्रवादी काँग्रेसची अडेलतट्टू भूमिका असल्याचा आरोप काँग्रेसमधील विखे-पाटील गटाने केला. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या संभावित आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा सुजय यांनी व्यक्त केली होती. मात्र सदरची जागा राष्ट्रवादी …

Read More »

भाजप खुशीत तर काँग्रेस कोमात काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांचे सुपुत्र सुजय यांचा अखेर भाजप प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने एकापक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट उंडी मारणाऱ्या आयाराम-गयारामांची सुरुवात झालेली आहे. मात्र या यादीत आता काँग्रेसचे विधानसभेतील विरोदी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांचे नाव समाविष्ट झाले असून त्यांचा आज मंगळवारी भाजपमध्ये औपचारीक प्रवेश केला. त्यामुळे भाजप जोशात तर काँग्रेस कोमात गेल्याची चर्चा राजकीय …

Read More »

पवारांच्या माघारीने महायुतीच्या नेत्यांमध्ये हर्षोल्लास युतीचा सर्वात मोठा विजय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेतल्याचा निर्णय जाहीर करताच महायुतीतील रासपचे महादेव जानकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षोल्लास व्यक्त करत पवारांची रिंगणातून माघार म्हणजे युतीचा विजय असल्याचे प्रतिपादन केले. देशात आणि महाराष्ट्रात मोदींना पाठिंबा वाढतो आहे. मोदीजी एकदा म्हटले होते की बदललेल्या हवेचा …

Read More »

पार्थसाठी कि अंतर्गत राजकारणामुळे पवारांची निवडणूकीतून माघार ? मावळमधून मात्र पार्थ पवारांची उमेदवारी निश्चित

पुणे-सोलापूरः प्रतिनिधी राज्यातील आणि देशपातळीवरील हेवीवेट नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी आतापर्यंत घेतलेला निर्णय कधी मागे फिरविल्याचे ऐकिवात नाही. परंतु यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलेली उमेदवारी शरद पवार यांनी मागे घेतल्याने केवळ पार्थच्या नावाखाली की सोलापूर जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणाचा फटका बसण्याच्या भीतीने पवारांनी मागे …

Read More »

शिवसेनाप्रमुखांच्या नातूचे प्रेरणास्थान इग्लंडचे माजी पंतप्रधान शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांची ट्वीटवरून माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशातील राजकिय पटलावर आपल्या वकृत्वशैलीमुळे जरब  बसविणारे आणि राज्यातील तमाम सर्वसामान्य शिवसैनिकांचे आराध्य दैवत असलेले शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा सर्वत्र होता. त्यांच्या या कार्यशैलीतून प्रेरणा घेत अनेकांनी बाळासाहेबांप्रमाणे स्वत:ला राजकारणात स्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी …

Read More »

२९ एप्रिलला मुंबई महानगरात आणि नंदूरबार मध्ये मतदान मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची पत्रकार परिषदेत घोषणा

मुंबई : प्रतिनिधी १७ व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून आजपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.  महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे, तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव अश्वनी कुमार यांनी …

Read More »

देशात ७ तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान २३ मे ला मतमोजणी होणार असल्याची निवडणूक आयोगाची घोषणा

नवी दिल्ली : प्रतिनिधी विद्यमान लोकसभेचा कार्यकाल जून महिन्यात संपणार असल्याने तत्पूर्वी नवी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता आज रविवारपासून लागू झाल्याचे जाहीर करत देशात एकूण ७ टप्प्यात तर महाराष्ट्रात ४ टप्प्यात निवडणूका घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी केली. तसेच यंदाच्या निवडणूकीत व्हीव्हीपँट मशिन्स …

Read More »

भ्रष्टाचारप्रकरणी महिला व बालविकास मंत्र्यांची हकालपट्टी करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी महिला व बालविकास विभागातर्फे घरपोच आहाराचे सुमारे ६ हजार ३०० कोटी रूपयांचे कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून सरकारचे तोंड काळे केले आहे. याच निर्णयाद्वारे बालकांना शिजवलेले गरम अन्न देण्याऐवजी प्रिमिक्स पाकिटे देण्याचे कंत्राट सरकारने याच माफियांना दिले होते. ते ही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रचंड …

Read More »

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष ऑगस्ट २०१९ पासून सुरु होणार आहे. या शताब्दी वर्षामध्ये विविध सामाजिक कार्यक्रम व उपक्रम आयोजन करण्याबाबत अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केली. *साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या …

Read More »