मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र या कालावधीत सुरुवातीला रेड झोनमधील व्यवहाराला बंदी घालण्यात आली होती. मात्र आता काही प्रमाणात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या सवलतींची अंमलबजावणी २२ मे पासून ३१ मे पर्यंत करण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात …
Read More »कोरोनाकाळासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला ८ कलमी कार्यक्रम कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थितीबाबत शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थिती, आव्हाने, प्रतिबंधात्मक उपाय, विविध वर्गांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज चर्चा केली. यामध्ये वाहतूक, शिक्षण, शेती, उद्योग अशा विविध विषयांवर शरद पवार यांनी सूचना मांडल्या. १) कोविड-१९ व लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे …
Read More »जनजीवन हळुहळु पूर्वपदावर आणायचंय, घाईगर्दी करू नका भूमिपुत्रांनो संधी आहे घ्या : उद्योगाचे नवे पर्व सुरु होणार - मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी सद्या परवानगी देण्यात आलेल्या ५० हजार उद्योंगामधून ५ लाख कामगार काम करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे जास्तकाळ आपल्याला घरात बसून राहता येणार नाही. मात्र लॉकडाऊन उठवला तर ब्राझील, अमेरिका, इंग्लड आदी देशात जी परिस्थिती निर्माण झालीय. तशी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे आपण हळूहळू आपले जनजीवन पूर्व …
Read More »स्थलांतरीत मजुरांचे ८५ % रेल्वे भाडे दिल्याचा पुरावा द्या अन्यथा माफी मागा ! काँग्रेसचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना आव्हान
मुंबई: प्रतिनिधी अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने खोटे बोलण्याचा प्रघात चालू ठेवलेला असून भारत सरकार रेल्वे तिकीटाचे ८५ टक्के खर्च करत आहे याचा पुरावा चंद्रकांत पाटील यांनी द्यावा अन्यथा जनतेची माफी मागावी असे थेट आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी …
Read More »आयएएस, आयपीएस, राजपत्रित अ-बचे दोन तर क-ड चा एक दिवसाचा पगार कोविडसाठी हरकत असतील त्यांनी तात्काळ तक्रार नोंदविण्याचे आदेश
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेतील आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी, राजपत्रित अ-ब वर्गातील अधिकाऱ्यांचा दोन दिवसाचे वेतन तर क व ड वर्गातील कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कोविड विरोधी लढ्यासाठी वेतनातून कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या वेतन कपातीस कोणाची हरकत असेल तर त्यांनी तातडीने तसेच संबधित विभागाच्या …
Read More »वाधवानप्रकरणातील वादग्रस्त अधिकारी अमिताभ गुप्तांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरूंना पाठविण्याऱ्या समितीचे प्रमुख
मुंबई: विशेष प्रतिनिधी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात येस बँकेतील घोटाळ्याप्रकरणातील आरोपी एचडीआयएलचे प्रमुख वाधवान यांना खास पत्र देत महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्याचे पत्र देत संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले आयपीएस अधिकारीअमिताभ गुप्ता यांनाच आता राज्य सरकारने पुन्हा एका समितीचे प्रमुख पद दिले. विशेष म्हणजे राज्यातील स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरून त्यांच्या मूळ गावी …
Read More »लॉकडाऊनबाबत केंद्राने दिले राज्य सरकारला हे अधिकार आवश्यकता असेल तर नियम कडक करा अथवा सूट द्या
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्यासह देशातील लॉकडाऊनची मुदत ३१ मे पर्यत वाढविण्यात आली आहे. तसेच या कालावधीत अंमलबजावणीच्या अनुषंगाने नियमावलीही जाहीर कऱण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती पाहून सदर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी किंवा त्यात सूट देण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले असून यासंदर्भातील आदेश आज जारी करण्यात आले. कोरोना विषाणूला …
Read More »४ थ्या लॉकडाऊनमध्ये केंद्राने या गोष्टींना नाकारली परवानगी सार्वजनिक ठिकाणे बंदच राहणार केंद्राकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारनेही ४ थ्या लॉकडाऊनची घोषणा संध्याकाळी करत या काळात नेमके चालू राहणार काय बंद राहणार याबाबत स्पष्टता ठेवण्याचा प्रयत्न केला. ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची सुरुवात उद्या १८ मे पासून ते ३१ मे २०२० पर्यत वाढविण्यात आला आहे. संध्याकाळी जाहीर केलेल्या पत्रकानुसार बंद राहणाऱ्या गोष्टी …
Read More »कोरोना पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र अपयशी: अशोक चव्हाण
मुंबई : प्रतिनिधी कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र सरकार साफ अपयशी ठरले असून, त्यांनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ असल्याची टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. पंतप्रधानांनी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १० टक्के म्हणजे तब्बल २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज देण्याची घोषणा …
Read More »राज्यातला ४ था लॉकडाऊन पोलिसांच्या नव्हे तर पॅरामिलिटरी फोर्सेसच्या बंदोबस्तात जम्मू व काश्मीरमधील १० युनिटसह १८ पथके तैनात होणार
मुंबई:प्रतिनिधी राज्यात संभावित कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वात आधी अर्थात मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केला. राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने याबाबतची घोषणा केली. मात्र राज्यात सलग ३ वेळा लॉकडाऊन वाढविण्यात येवूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परंतु आता लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी करण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी …
Read More »
Marathi e-Batmya