मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्रित करण्याच्या हालचाली सुरु असतानाच भाजपबरोबरच, काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही विरोध करत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची स्थापना केली. परंतु त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या राजकारणावर वंचित आघाडीतील सहकाऱ्यांकडून संशय व्यक्त करत आंबेडकरांच्या विरोधात नाराजीचा सुर वाढत असून ही आघाडी …
Read More »यंदा भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राकाँला मतदान करू नका ओबीसी समाज बांधवांना संघटनेचे आवाहन
मुंबईः प्रतिनिधी राज्यात जातीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत मराठा समाजाला आरक्षण दिले. हे आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांवर अन्याय झाला असून मराठा आरक्षणाचा निर्णय घेणाऱ्या सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी समाजाने मतदान करू नका असे आवाहन महाराष्ट्र इतर मागासर्गीय संघटनेचे अध्यक्ष श्रावण देवरे यांनी केले. …
Read More »भाजपच्या ‘मै भी चौकीदार’ ची सोशल मिडीयावर टींगल-टवाळी सोशल मिडीयातील ट्वीटर, व्हॉट्सअपवरून लघुकथा आणि उपरोधिक टोल्यांना महापुर
मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा भाग म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘चौकीदार चोर है’ चा आरोप केला. मात्र या आरोपातील हवा काढून घेण्यासाठी भाजपकडून अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ची घोषणा करत चौकीदार हा शब्द नावाआधी वापरण्यास सुरुवात केली. मात्र सोशल …
Read More »राज्यातील ४६ लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र मतदानासाठी ईपिक कार्डाशिवाय आणखीही ११ दस्तावेज चालणार
मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) वाटप करण्यास सुरूवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे ४६ लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे. ऊर्वरित ओळखपत्रे मतदानापूर्वी मतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष …
Read More »गोव्याचे ‘मनोहर‘ यांचे निधन दिर्घ आजारने वयाच्या ५५ व्या वर्षी शेवटचा श्वास
पणजी : प्रतिनिधी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने रविवारी (दि.१७) निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेल्या पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या एक वर्षापासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. …
Read More »नावाअगोदर चौकीदार लावणा-या चोरांपासून सावधानतेचा इशारा पोलिसांकडून त्याची चारित्र्यतपासणी करून घेण्याचे काँग्रेसचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी अनेक चोर, गुन्हेगार हे स्वतःला चौकीदार म्हणवू लागल्याने देशात अभूतपूर्व असुरक्षिततेचे वातावरण तयार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या पहारेक-यांकडेही लोक संशयाने पाहू लागल्यामुळे प्रामणिक पहारेक-यांची मनस्थिती ही भांबावल्यासारखी झाली आहे. जनतेने कोणालाही पहारेक-याची नोकरी देण्याआधी पोलिसांकडून त्याची चारित्र्य तपासणी करून घ्यावी …
Read More »दानवेंच्या विरोधातील खोतकरांची तलवार अखेर म्यान मुख्यमंत्री फडणवीस उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पडला पडदा
औरंगाबाद : प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी व त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात एका हॉटेलमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत हवा तसा तोडगा न निघाल्याने खोतकर यांनी काहीशा नाराजीनेच आपली तलवार म्यान करत …
Read More »भाजप उधार उसनवारीवर चालणारा पक्ष काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी भाजपमध्ये आणखी आवक होणार असल्याची सुवार्ता राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऐकवली आहे. त्याचे काय व्हायचे ते होईल पण या निमित्ताने भारतीय जनता पक्ष हा उधार उसनवारीवर चालणारा पक्ष आहे हे मात्र सिद्ध झाले आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन …
Read More »जालन्यात मैत्रीपुर्ण लढतीबाबत आग्रही शिवसेनेचे अर्जुन खोतकर दानवेंच्या विरोधावर ठाम
मुंबईः प्रतिनिधी जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारीला आजही विरोध आहे. यासंदर्भात शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमोर माझ्याकडून जालन्यात मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याबाबत निर्णय झालेला नसला तरी यावर उद्याच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगत अन्यथा…असा सूचक इशाराही शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला. …
Read More »वंचित आघाडीच्या ३७ उमेदवारांची यादी जाहीर सोलापूर-अकोला येथील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात
मुंबई: प्रतिनिधी राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वंचित बहुजन आघाडीच्या एकूण ३७ उमेदवारांच्या नावांची घोषणा आज वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली असून धनगर समाजाला आजच्या यादीत पाच ठिकाणी तर माळी समाजाला दोन्ही ठिकाणी आणि बौध्द समाजाला चार ठिकाणी तर वडार, होणार, कोळी, कुणबी, मुस्लिम अशा सर्वच …
Read More »
Marathi e-Batmya