राजकारण

सुजय पाठोपाठ पिता विखे-पाटील आणि गोरेही कमळ हातात घेणार मोहीते-पाटील पितापुत्रांचा दोन दिवसांच्या अंतराने भाजप प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभेची राजकिय गणिते डोळ्यासमोर ठेवत लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजण भाजपचे कमळ हातात घेत आहेत. यात सुजय विखे-पाटील यांचे पिताश्री विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपच्या वाटेवर असून काँग्रेसचे जयकुमार गोरे हेही हातात कमळ घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे सुपुत्र …

Read More »

मित्र पक्षांनी कमळाच्या चिन्हावर लोकसभा लढवावी मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत

मुंबईः प्रतिनिधी भाजप मित्रपक्षांच्या पदरात लोकसभेची जागा पडणार नसून बारामतीत ही कमळ चिन्हांवरच निवडणूक लढवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत युतीच्या महाआघाडीतील मित्रपक्षांना स्वतंत्र जागा देणार नसल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मीडिया रूम चे उदघाटन झाले यावेळी ते …

Read More »

उच्च न्यायालयाने काढलेले वाभाडे मुख्यमंत्र्यांसाठी लज्जास्पद काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांकडून होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे संतापून उच्च न्यायालयाने राज्यातील पोलीस यंत्रणेचे वाभाडे काढले आहेत. उच्च न्यायालयाने आपल्या १४ मार्च २०१९ च्या आदेशात सरकारवर आसूड ओढलेले आहेत. राज्यातील पोलीस यंत्रणेची कामगिरी पूर्णपणे निराशाजनक असून उच्च न्यायालयाने वापरलेल्या प्रत्येक शब्दातून उद्वेग दिसून येत …

Read More »

महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार सर्वात जास्त मतदार ठाण्यात तर रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची सर्वाधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरूषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून १४ लाख ४० हजार एकूण मतदारांमध्ये …

Read More »

दाऊदची भीक मागणाऱ्यांनीच आलेली संधी गमावली प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

मुंबईः प्रतिनिधी 1993 च्या मुंबईत बॉम्बस्फोट आणि दंगलीचा मास्टरमाइंड असल्याचा संशयित आरोपी दाऊद भारताला द्या अशी भीक मागणाऱ्यांनी यापूर्वी आलेली संधी गमावलेली आहे. यापूर्वी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाऊद समर्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेतदेखील सहभागी होऊ इच्छितो असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे अध्यक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार …

Read More »

वंचित आघाडीची स्थापना भाजपच्या पराभवासाठी की विजयासाठी ? आंबेडकरांच्या विरोधातील वाढत्या नाराजीने वंचित आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्रित करण्याच्या हालचाली सुरु असतानाच भाजपबरोबरच, काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही विरोध करत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची स्थापना केली. परंतु त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या राजकारणावर वंचित आघाडीतील सहकाऱ्यांकडून संशय व्यक्त करत आंबेडकरांच्या विरोधात नाराजीचा सुर वाढत असून ही आघाडी …

Read More »

यंदा भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राकाँला मतदान करू नका ओबीसी समाज बांधवांना संघटनेचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी राज्यात जातीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत मराठा समाजाला आरक्षण दिले. हे आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांवर अन्याय झाला असून मराठा आरक्षणाचा निर्णय घेणाऱ्या सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी समाजाने मतदान करू नका असे आवाहन महाराष्ट्र इतर मागासर्गीय संघटनेचे अध्यक्ष श्रावण देवरे यांनी केले. …

Read More »

भाजपच्या ‘मै भी चौकीदार’ ची सोशल मिडीयावर टींगल-टवाळी सोशल मिडीयातील ट्वीटर, व्हॉट्सअपवरून लघुकथा आणि उपरोधिक टोल्यांना महापुर

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा भाग म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘चौकीदार चोर है’ चा आरोप केला. मात्र या आरोपातील हवा काढून घेण्यासाठी भाजपकडून अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ची घोषणा करत चौकीदार हा शब्द नावाआधी वापरण्यास सुरुवात केली. मात्र सोशल …

Read More »

राज्यातील ४६ लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र मतदानासाठी ईपिक कार्डाशिवाय आणखीही ११ दस्तावेज चालणार

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) वाटप करण्यास सुरूवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे ४६ लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे. ऊर्वरित ओळखपत्रे मतदानापूर्वी मतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष …

Read More »

गोव्याचे ‘मनोहर‘ यांचे निधन दिर्घ आजारने वयाच्या ५५ व्या वर्षी शेवटचा श्वास

पणजी : प्रतिनिधी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने रविवारी (दि.१७) निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेल्या पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या एक वर्षापासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. …

Read More »