राजकारण

चिरीमिरी दिल्याशिवाय टेंडर मंजूर होत नाही अजित पवारांचा पाणी पुरवठा विभागावर आरोप

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदारांची अडचण होत असल्याने त्यांच्याकडून प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. याचा अर्थ असा नव्हे की, सारे काही आलबेल सुरु आहे, असे नसून कोणी कितीही नाही म्हणटले तरी पाणी पुरवठा विभागात चिरीमिरी दिल्याशि‌वाय टेंडरच मंजूर नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी केला. विधानसभेत …

Read More »

घोटाळेबाजांना शासन होईपर्यंत काँग्रेसकडून पाठपुरावा सुरुच ठेवणार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच चिक्की घोटाळा प्रकरणात क्लीनचीट दिली. त्यामुळे राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार हे ‘क्लीन-चीटर’ सरकार असून चिक्की खरोदीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांच्या विरोधात तक्रार केली. त्यांच्याच कडून लाचलुचपत विभागाने अभिप्राय घेत चोराच्या साक्षीवर  मंत्र्याला क्लीन चीट दिल्याचा …

Read More »

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा रणकंदन विधान परिषदेत सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी

नागपुर : प्रतिनिधी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर विधान परिषेदत सर्व पक्षिय सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर याप्रश्नावर मंत्रीमंडळाची उपसमिती चर्चा करीत असते. त्या समितीला मार्गदर्शन करण्यासाठी सदस्यांनी त्या चर्चेत भाग घ्यावा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. याप्रश्नी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने सभागृहाचे …

Read More »

जमिन नसलेल्याला आणि शिवसेनेच्या आमदाराला कर्जमाफीचा लाभ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून सरकारची पोलखोल

नागपूर : प्रतिनिधी राज्य सरकारकडून कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यालाच लाभ मिळावा यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात केल्याचा दावा राज्य सरकारने केला. तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका आमदाराचे नाव अर्ज भरलेला नसताना कर्जमाफीच्या यादीत आहे. तर उस्मानाबादमधील एक गुंठा जमिन नसलेल्या मुलाला कर्जमाफीची रक्कम मिळाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील …

Read More »

टोल मुक्त महाराष्ट्रासाठी १० हजार कि.मीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी निवडणूकीच्या कालवाधीत टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा भाजपने केली होती. या घोषणेनुसार राज्यातील लहान वाहनांबरोबरच मोठ्या वाहनांनाही टोल मुक्ती कधी देणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना राज्याला टोलमुक्त करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्रात ३० हजार कोटी रूपये खर्चुन १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते …

Read More »

राज्यातील १२ हजार शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव शिक्षणाच्या प्रश्नावर विधान परिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी राज्यात १३०० शाळांपाठोपाठ १२ हजार शाळा बंद करण्याचा घाट शालेय शिक्षण मंत्र्यांनी घातला आहे. मंत्र्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनंतर शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील असा इशारा जनता दल (युनायटेड ) चे आमदार कपिल पाटील देत शिक्षणाच्याबाबत सरकारचे दुटप्पी आणि उदासीन धोरण सरकारचे असल्याचा आरोपही त्यांनी विधान परिषदेत केला. …

Read More »

रोहयोवरील कामगारांचा असंघटीत कामगारात कधी समावेश करणार ? एकनाथ खडसे यांचा राज्य सरकारला सवाल

नागपूर : प्रतिनिधी राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेतील कामांवर मोठ्या प्रमाणात बेरोजगार लोक कामांवर जातात. त्यांना किमान वेतनही दिले जाते. त्या कामगारांना कामगार कायद्यानुसार असंघटीत क्षेत्रातील कामगार म्हणून मान्यता आणि समावेश करणार का असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला केला. विधानसभेत हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबतचा प्रश्न …

Read More »

शाहू महाराजांचे जन्मस्थळ आणि महालक्ष्मी मंदीराच्या विकास आराखड्यास मंजूरी सार्वजनिक बांधकाम मंत्री चद्रकांत पाटील यांची विधानसभेत माहिती

नागपूर : प्रतिनिधी कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ आणि पुरातन महालक्ष्मी मंदीराच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. महालक्ष्मी मंदीराच्या विकासासाठी ७८ कोटी रूपये तर शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विधानसभेत राज्यातील पुणे, कोल्हापूर आणि यवतमाळ …

Read More »

भाजपचेच आमदार सांगतात बोंडअळी-तुडतुड्याचा मुद्दा लावून धरा अजित पवारांचा विधानसभेत गौप्यस्फोट

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील विशेषत: मराठवाड्यात आणि विदर्भातील शेतींवर बोंडअळी व तुटतुड्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडा अशी मागणी सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या अनेक आमदारांनी आपल्याकडे वैयक्तीकपणे केली असून त्यावेळी भाजपचे आमदार डॉ.अनिल बोंडे हे ही उपस्थित होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी …

Read More »

विधान परिषदेत तिसऱ्य़ा दिवशीही गोंधळ सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे चार वेळा कामकाज तहकूब

नागपुर : प्रतिनिधी आज तिसऱ्या दिवसाचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू होताच विरोधकांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. तर त्यास प्रत्युतर म्हणून सत्ताधारी सदस्यांनी जय विदर्भाच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत विरोधक सभापतींच्या आसनाकडे धावले. या गोंधळात सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने …

Read More »