१०० वर्षाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून आज घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली. विधानसभेत निवेदन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, …
Read More »शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, ठाकरे मगधहून आलेले, मराठीसाठी तेच लढत आहेत राज-उद्धव ठाकरे यांची युती झाली तरी फार काळ टीकणार नाही
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणि बिहार मधील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या त्रिभाषा सुत्र आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून मनसे प्रमुख आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येत राज्य सरकारच्या हिंदी निर्णयाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर राज्य सरकारने स्वतःच्या …
Read More »जयंत पाटील यांची मागणी, शासनाने शेतकर्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये अशी विधानसभेत केली मागणी
नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये व शासनाने त्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली. यावेळी सभागृहात बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी, चंदवाडी येथील शेतकर्यांनी ६.५ किलोमीटर अंतरावरून वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी २.५ कोटी …
Read More »मुद्दा मराठी माणसाच्या हक्काच्या घराचाः पण शिवसेनेच्या दोन गटात गद्दारीवरून रंगला वाद अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात गद्दारीवरून एकमेकांना धमकी
मागील काही दिवसांपासून मराठी -अमराठीचा वाद सातत्याने चांगलाच रंगला आहे. त्यातच मराठी माणसांना मुंबईतील विविध सोसायट्यांमध्ये घरे नाकारण्याचा प्रकारातही चांगलीच वाढ होत आहे. या मुद्यावरून आज विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात चांगलीच शाब्दीक वाक्ययुद्ध रंगल्याचे चित्र पाह्यला मिळाले. विधान परिषदेत यासंदर्भात शिवसेना उबाठाचे …
Read More »गिरीश महाजन यांचे आंदोलनकर्त्या शिक्षकांना आश्वासन, वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात २०% वाढीव वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा केले जाईल
पाच जुलै पासून आपल्या न्याय मागण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना आज अखेर काही प्रमाणात दिलासा राज्य सरकारने दिला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी आज आझाद मैदानावर जात शिक्षकांच्या बँक खात्यावर वाढीव वेतन पावसाळी अधिवेशन झाल्यानंतर जमा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. शिक्षकांना पाच जुलै पासून वाढीव वेतन …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, राज्यावरील कर्जाचा आणि तिजोरीवरील वित्तीय भार मर्यादेतच खर्च होणार असल्याने राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडेल
पुरवणी मागण्यांचा निधी हा पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदाने, केंद्र सरकारच्या विकास योजनांपोटी राज्याचा हिस्सा, रस्ते, रेल्वे, पुल, मेट्रो, भुयारी मार्ग आदी कारणांसाठी खर्च करण्यात येणार असल्याने त्यातून राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडणार आहे. राज्याचा कारभार आर्थिक शिस्तीचे काटेकोर पालन करीत सुरु आहे. राज्याच्या तिजोरीवरील वित्तीय भारही मर्यादेत आहे. राज्याची आर्थिक …
Read More »संजय गायकवाड यांना एकनाथ शिंदेंकडून कडक शब्दांत समज रितसर तक्रार करता आली असती, मारहाणीचे समर्थन करणार नाही
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ आमदार गायकवाड यांना समज दिली. लोकप्रतिनिधी या नात्याने रितसर तक्रार करता आली असती, पण …
Read More »३००० कोटींच्या टोल घोटाळाप्रकरणी नाना पटोले यांच्याकडून हक्कभंग दाखल खासगी कंत्राटदाराला नियमबाह्य मुदतवाढ, मंत्रिमंडळाची दिशाभूल, दोषींवर कठोर कारवाई करा
मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना व शासकीय बससेवांना टोलमाफी दिल्यामुळे खासगी कंत्राटदाराला नियमबाह्यपणे मुदतवाढ देण्यात आली. यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) अंदाजे ३,००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसचे नेते व आमदार नाना पटोले यांनी मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव, तसेच …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, देवनार एम ईस्ट वार्डात पुनर्वसन प्रकल्पात १२५१ कोटींचा घोटाळा मुंबई काँग्रेसकडून बीएमसी मधील भ्रष्टाचाराची व मुंबईकरांना लुटणाराऱ्यांची पुन्हा पोलखोल
मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार कसा बोकळला आहे व सत्ताधारी पक्षातील लोक अधिकाऱ्यांशी संगनमत मुंबईची कशी लुट करत आहेत याचा मुंबई काँग्रेसने पुन्हा पोलखोल केली आहे. देवनार एम ईस्ट वार्डातील एका पुनर्वसन प्रकल्पात बीएमसीने बिल्डरवर मेहरबानी करत सर्व नियमांन बदल देत मुंबईचा पैसा लुटला आहे. हा संपूर्ण घोटाळा १२५१ कोटी रुपयांचा असून …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, आमदार संजय गायकवाडला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो? मराठीच्या नावे राज्यात सुरू असलेली गुंडागर्दी अयोग्य, मराठी माणसाने महाराष्ट्र धर्म जागवावा
आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांचा हा काही पहिल्याच प्रकार नाही. हे महाशय वारंवार दादागिरी करतात, महापुरुषांचा अपमान करणे, शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रताप ते सतत करत असतात. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो, असा प्रश्न विचारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आमदार संजय गायकवाड यांच्यावर …
Read More »
Marathi e-Batmya