ठाणे जिल्ह्याच्या वांगणी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये बुरशी लागलेली औषधे आढळल्याप्रकरणी खरेदीशी संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करुन दोषी आढळल्यास त्यांचे निलंबन करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य मोहन मते यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य किसन कथोरे यांनी सहभाग घेतला. आरोग्य …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भांडवली बाजारातील ‘ बॉण्ड’च्या माध्यमातून विकासाला निधीचे बळ नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग
महानगरपालिकांना आपल्या विविध विकास कामांसाठी भांडवली बाजारात बॉण्ड जारी करून निधी उभारता येतो. नाशिक महापालिकेप्रमाणे ‘ इनोव्हेटिव्ह फंड’ निर्माण करून विकासाला निश्चितच निधीचे बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘ रिंगिंग बेल’ वाजवून करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश …
Read More »शेतकऱ्यांचे ७/१२ कोरा करण्याच्या मागणीप्रश्नी विरोधकांचे विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन अहिल्याबाई होळकर यांच्या नावे असलेल्या कर्जमाफी योजनेस महाविकास आघाडीची निदर्शऩे
राज्याच्या बजेट सत्राच्या तिसऱ्या आठवड्याची सुरुवात सोमवार को विधानभवनाच्या उत्तरात तीव्र राजकीय राजकारणाशी झाली. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सात-बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. या विरोधकांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणाला पूरेसे नसल्याची टीका केली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी “शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच पाहिजे” असे नारे लागवत सरकारने …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासन कृतीशील ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेचे आयोजन
जागतिक महिला दिन आणि समाजसुधारक डॉ.मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या विधानमंडळ सदस्यत्वाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत महिलांना अधिकाधिक संधी दिल्यास सक्षम नेतृत्व घडते, यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासन कृतीशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मीरा-भाईंदरजवळील उत्तन येथे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पायाभूत सुविधांच्या बळावर पुण्याच्या विकासाला गती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत
पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. …
Read More »काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय टॅलेंट हंट’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद कोकण विभागातून ८० जणांचे अर्ज
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सुरु केलेल्या टॅलेंट हंटला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टॅलेंट हंट अभियानांतर्गत नाव नोंदणी केल्यानंतर आज प्रत्यक्ष विभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्या. राज्यातील सर्व विभागात या मुलाखती घेण्यात आल्या. या अभियानामधून पक्ष प्रवक्ते, मीडिया पॅनेलिस्ट, संशोधन समन्वयक आणि प्रसिद्धी समन्वयक या पदांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील प्रतिभावान लोकांना काँग्रेस …
Read More »मनसे झाला आता २० वर्षाचा युवक, रायगडापासून सदस्य नोंदणीला सुरुवात राज ठाकरे यांच्या नावापासून सदस्य नोंदणीला होणार सुरुवात
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे योगदान रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाचे भूमिपूजन
जगातील संरक्षणाचे क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. नवा वर्ल्ड ऑर्डर तयार होत असून व्यापाराचाही शस्त्र म्हणून वापर होत आहे. अशा काळात ज्या देशाजवळ सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात आघाडीवर असेल. या दिशेने आपला देश झपाट्याने वाटचाल करत असताना देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्याचे कार्य सोलर समूह करत …
Read More »फिनलंड देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविणार -मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबईस्थित ससून मासेमारी बंदर हे मोठ्या मासेमारी बंदरांपैकी एक आहे. ससून मासेमारी बंदराचा विकास हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविण्यासाठी फिनलंड देशाच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. हॉटेल ताज पॅलेस येथे फिनलंड देशातील हेल्वर, मिरासिस आणि …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची अपेक्षा, उद्योगाचे मॅग्नेट म्हणून नागपूरच्या विकासात एक्सएसआयओने भूमिका महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन
राज्य शासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्वाची भूमिका वठवावी असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. नागपूर-अमरावती महामार्गावर स्थित लिंगा परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महाराष्ट्रातील …
Read More »
Marathi e-Batmya