राजकारण

शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे केले अभिनंदन भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखली

आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, …

Read More »

राज ठाकरे यांची ऑपरेशन सिंदूर बाबत खोचक प्रतिक्रिया, दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध नाही मॉक ड्रिल नाही तर दहशतवाद्यांचे कोंबिग ऑपरेशन करण्याची गरज

देशातील प्रश्न संपत नसताना आपण युद्धाला सामोरे जात आहोत, ही गोष्ट योग्य वाटत नाही. दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही नसल्याची खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरे पुढे म्हणाले की, त्याउलट ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पण ज्यांनी हल्ला केला ते दहशतवादी अजूनही सापडलेले …

Read More »

राज्यातील ९५% स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या आसपास होतील

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चार आठवड्यांच्या आत अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत राज्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या …

Read More »

महाराष्ट्रातील या १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल होणार मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह संवेदनशील ठिकाणांचा समावेश

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील १६  ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार ७ मे रोजी एकाचवेळी या मॉक ड्रिल्स केले जाणार आहे. देशातील २५९ शहरांमध्ये युद्धजन्य मॉकड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले …

Read More »

चौंडीतील मंत्री परिषदेच्या बैठकीत घेतले महत्वाचे हे निर्णय बहुतांश निर्णय पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधअयक्षतेखाली मंत्री परिषदेची बैठक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथे आज घेण्यात आली. यावेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी “आदिशक्ती अभियान” व “आदिशक्ती पुरस्कार”, राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व त्यासाठीच्या पदांना मंजूरी, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२५ साठी प्राधिकरणाचा अध्यादेश, …

Read More »

अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती चौंडीतील राज्य मंत्रिमंडळ परिषदेत निर्णय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून, त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मिती करण्यास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याची दृष्य स्वरुपात जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी, यासाठी मराठीसह विविध …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आता पळवाटा न शोधता निवडणुका घ्या चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, जुमला ठरू नये.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने आता कोणताही विलंब न करता व कोणतीही पळवाट न शोधता या निवडणुका घेऊन नगरसेवक, महापौर, सभापती पदांचे पूर्ववैभव आणावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे …

Read More »

वैभवी देशमुख हिच्या परिक्षेतील यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिचे बारावी परिक्षेत मिळविले यश

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून ८५.३३ टक्के गूण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीनं मिळविलेल्या यशानं तिच्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचं सांगून तिच्या …

Read More »

जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले मनापासून आभार लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल आभार मानले

गेली ३ वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका संपन्न झाल्या नव्हत्या. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेली ३ वर्षे प्रशासकीय अधिकारी चालवत आहेत, ही बाब लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांची घोषणा एक महिन्याच्या आत करण्याचा आणि निवडणुका प्रक्रिया चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचा अंतरिम आदेश दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आजचा निर्णय अतिशय महत्वाचा एकाच आठवड्यात ओबीसी समाजासाठी दोन महत्वपूर्ण निर्णय

राज्यातील महानगरपालिका,जिल्हा परिषदा, पंचायत समिती,नगरपालिका यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील चार महिन्यात घेण्यात याव्यात. तसेच यासाठी सन २०२२ पूर्वी लागू असलेली ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण कायम ठेऊन निवडणूक घेण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे आज विशेष आनंद होत आहे. या …

Read More »